शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
3
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
4
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
5
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
9
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
10
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
12
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
13
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
14
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
15
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
16
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
17
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
18
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
19
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
20
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

स्वच्छतेचं कंत्राट ठरलं एसटीसाठी पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 10:26 PM

आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक

- दिगांबर जवादेगडचिरोली : बसस्थानक आणि एसटी बसगाड्यांची स्वच्छता करण्यासाठी महामंडळाने ऑक्टोबर २०१७ मध्ये एका खासगी कंपनीला कंत्राट दिले. यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे स्वच्छतेवरील खर्च वाढला. हा खर्च एसटी महामंडळाच्या आवाक्याबाहेर झाल्याने एसटीने कंपनीला पैसे देणे बंद केले आहे. परिणामी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत असल्याने राज्यातील बहुतांश बस स्थानकांमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे बसस्थानकांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.बसस्थानक, आगाराची स्वच्छता करणे, बसगाड्या धुणे या कामांसाठी पूर्वी एसटी महामंडळाने स्वच्छता कर्मचाºयांची नेमणूक केली होती. हे कर्मचारी मोजकेच होते. पण एसटीच्या केंद्रीय कार्यालयाने २०१७ मध्ये स्वच्छतेचे कंत्राट काढले. २ ऑक्टोबर २०१७ पासून स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. राज्यभरातील बसस्थानकांच्या स्वच्छतेचे कंत्राट एकाच कंपनीला मिळाले आहे. विशेष म्हणजे स्वच्छता कंत्राटात अधिक कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे स्वच्छतेचा कंत्राटही महागला.मागील वर्षभरापासून एसटीची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. डिझेल व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही एसटीकडे पुरेसे पैसे नाहीत. उधारी घेऊन काम भागविले जात आहे. अशा स्थितीत बऱ्याचशा आगारांनी कंपनीला पैसे दिले नाहीत. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांना कंपनीने वेतन दिले नाही.यावर तोडगा काढण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आगार, बसस्थानक व एसटीच्या इतर कार्यालयांमध्ये कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.काही आगारांमध्ये जुन्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून एसटी गाड्यांची साफसफाई करून काम भागविले जात आहे. सदर कंपनीचे कंत्राट ऑक्टोबर २०२० पर्यंत आहे. मात्र एसटीचे  केंद्रीय कार्यालय यावर कोणता तोडगा काढते याकडे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

६ कर्मचाऱ्यांच्या कामासाठी जुंपले ३० कर्मचारीगडचिरोली बसस्थानकात पूर्वी सहा स्वच्छता कर्मचारी होते. नवीन कंत्राटानुसार ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. कर्मचारी वाढल्याने एसटीचा खर्चसुद्धा वाढला. ऑगस्ट २०१९ पर्यंत एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत संबंधित कंपनीला पैसे दिले जात होते. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात होते. मात्र ऑगस्टनंतर केंद्रीय कार्यालयाने कंपनीला पैसे देण्याची जबाबदारी स्थानिक बसस्थानकावर सोपविली.