शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

अखेर ४३ दिवसानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे, ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर

By दिगांबर जवादे | Updated: June 7, 2023 18:16 IST

तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन 

गडचिराेली : तेलंगणा सरकारच्या वतीने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा बॅरेजमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा, यासाठी सिरोंचा तहसील कार्याालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. ४३ दिवसांपासून आंदोलन सुरूच होते. राज्य सरकारने यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बुधवारी आंदोलन मागे घेण्यात आले.

तेलंगणा सरकाने गोदावरी नदीवर पाच वर्षांपूर्वी बॅरेज बांधले आहे. या बॅरेजमध्ये सिरोंचा तालुक्यातील १२ गावांमधील शेतकऱ्यांची १२८ हेक्टर जमीन गेली आहे. मात्र याचा मोबदला देण्यात आला नाही. तेलंगणा सरकार जर नुकसान देणार नसेल तर महाराष्ट्र शासन याचा मोबदला देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते. मात्र अनेक दिवस होऊनही मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून आंदोलन सुरू केले होते. पैसे देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे, असे सांगीतले जात होते. मात्र जोपर्यंत मोबदला मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. 

या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ११ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. उर्वरित २६ कोटी रुपये लवकरच दिले जाणार आहेत. माजी मंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी सिरोंचा येथे जाऊन आंदोलकांना लिंबू पाणी पाजले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या इतरही अडचणी जाणून घेतल्या, त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शोभाताई फडणवीस यांनी दिले.

टॅग्स :agricultureशेतीGadchiroliगडचिरोलीShobha Fadnavisशोभाताई फडणवीसDamधरण