शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

'जलतारा' योजनेचा अर्ज भरा अन् ४,८०० रुपये मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:02 IST

रोहयो विभाग राबवणार योजना : शेतीला मिळणार भरपूर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. शेतातील विहीर, कूपनलिकांची पाणीपातळी खालावू नये तसेच भूजल पातळीत वाढ व्हावी आणि अधिकाधिक जमीन लागवडीखाली यावी म्हणून राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलतारा हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे.

शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या धरणाचे बांधकाम सरकारला शक्य नाही. त्यामुळे मागेल त्याला विहीर हे धोरण सुरू केले आहे. विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे एक दिवस विहिरींनासुद्धा पाणी राहणार नाही. जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच पाण्याचा भराव निर्माण होईल, यासाठीसुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. 

दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदावा लागणार योजनेंतर्गत शेतकऱ्याने आपल्या शेतातील विहीर, बोअरच्या परिसरात अथवा नेहमी पाणी साचणाऱ्या भागाजवळ दीड बाय दीड मीटरचा शोषखड्डा खोदावा. त्यानंतर त्यात दीड इंचाची गिट्टी भरावी लागणार आहे. त्यासाठी एकूण ४ हजार ८०० रुपये मिळणार आहेत.

रोहयो अंतर्गत केले जाणार काम

  • जलतारा' या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रोजगार हमी योजना विभागावर सोपविण्यात आली आहे. आपल्या परिसरातील कृषीसहायक, रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेता येईल.
  • गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती आहे. या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडते. पूर परिस्थिती निर्माण होते. मात्र पावसाळ्यातील संपूर्ण पाणी वाहून जाते व उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी जमिनीत मुरल्यास ही स्थिती निर्माण होणार नाही.

भूजल पातळीत होणार वाढ

  • शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या धरणाचे बांधकाम सरकारला शक्य नाही. त्यामुळे मागेल त्याला विहीर हे धोरण सुरू केले आहे. विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे एक दिवस विहिरींनासुद्धा पाणी राहणार नाही.
  • जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच पाण्याचा भराव निर्माण होईल, यासाठीसुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. ग्रामीण भागात या योजनेबाबत जागृती होणे आवश्यक आहे.

नेमकी काय आहे 'जलतारा' योजनाशेतातील पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलतारा योजना हाती घेण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

कोणता विभाग राबविणार ही योजना ?महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या हाताला कामही मिळणार आहे.

कोणती कागदपत्रे ?योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याच्या मालकीचे शेत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचा ७/१२, ८ अ उतारा, आधारकार्ड, मग्रारोहयो अंतर्गतचे जॉबकार्ड गरजेचे आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीgovernment schemeसरकारी योजना