शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

'जलतारा' योजनेचा अर्ज भरा अन् ४,८०० रुपये मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:02 IST

रोहयो विभाग राबवणार योजना : शेतीला मिळणार भरपूर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. शेतातील विहीर, कूपनलिकांची पाणीपातळी खालावू नये तसेच भूजल पातळीत वाढ व्हावी आणि अधिकाधिक जमीन लागवडीखाली यावी म्हणून राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलतारा हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे.

शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या धरणाचे बांधकाम सरकारला शक्य नाही. त्यामुळे मागेल त्याला विहीर हे धोरण सुरू केले आहे. विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे एक दिवस विहिरींनासुद्धा पाणी राहणार नाही. जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच पाण्याचा भराव निर्माण होईल, यासाठीसुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. 

दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदावा लागणार योजनेंतर्गत शेतकऱ्याने आपल्या शेतातील विहीर, बोअरच्या परिसरात अथवा नेहमी पाणी साचणाऱ्या भागाजवळ दीड बाय दीड मीटरचा शोषखड्डा खोदावा. त्यानंतर त्यात दीड इंचाची गिट्टी भरावी लागणार आहे. त्यासाठी एकूण ४ हजार ८०० रुपये मिळणार आहेत.

रोहयो अंतर्गत केले जाणार काम

  • जलतारा' या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रोजगार हमी योजना विभागावर सोपविण्यात आली आहे. आपल्या परिसरातील कृषीसहायक, रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेता येईल.
  • गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती आहे. या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडते. पूर परिस्थिती निर्माण होते. मात्र पावसाळ्यातील संपूर्ण पाणी वाहून जाते व उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी जमिनीत मुरल्यास ही स्थिती निर्माण होणार नाही.

भूजल पातळीत होणार वाढ

  • शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या धरणाचे बांधकाम सरकारला शक्य नाही. त्यामुळे मागेल त्याला विहीर हे धोरण सुरू केले आहे. विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे एक दिवस विहिरींनासुद्धा पाणी राहणार नाही.
  • जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच पाण्याचा भराव निर्माण होईल, यासाठीसुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. ग्रामीण भागात या योजनेबाबत जागृती होणे आवश्यक आहे.

नेमकी काय आहे 'जलतारा' योजनाशेतातील पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलतारा योजना हाती घेण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

कोणता विभाग राबविणार ही योजना ?महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या हाताला कामही मिळणार आहे.

कोणती कागदपत्रे ?योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याच्या मालकीचे शेत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचा ७/१२, ८ अ उतारा, आधारकार्ड, मग्रारोहयो अंतर्गतचे जॉबकार्ड गरजेचे आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीgovernment schemeसरकारी योजना