शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

गावातच उपलब्ध होणार खत व बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर खत व बियाणांची मागणी वाढते. खत व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच खते व बियाणे उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देगर्दी टाळण्याचा प्रयत्न : शेतकऱ्यांकडून गोळा केले वाहतुकीसाठी लागणारे पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांची खत व बियाणांच्या दुकानामध्ये गर्दी होऊ नये, यासाठी गाव पातळीवर खत व बियाणे उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली कृषी विभाग नियोजन करीत आहे.पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर खत व बियाणांची मागणी वाढते. खत व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच खते व बियाणे उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत.कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी हे शेतकºयांना ग्रामस्तरावरच खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली जाईल. गावस्तरावरील शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी तर्फे गावातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खत व बियाणांची मागणी समितीकडे नोंदवेल. तालुका कृषी अधिकारी खताची किंमत निश्चित करतील. खत व बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून गोळा केलेले पैसे शेतकरी गट आरटीजीएस किंवा डीडीद्वारे खत विक्रेत्याला देतील. व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यासाठी पैसे डीडी किंवा आरटीजीएसने देणे सक्तीचे राहणार आहे. गावात एकाच ठिकाणी खत उतरविले जाईल. तेथून शेतकरी आपल्या घरी खत घेऊन जातील. खताची मूळ किंमत वाहतूक खर्च, हमाली या सर्वांचा खर्च शेतकऱ्यांना भरावा लागेल. या सर्व प्रक्रियेमुळे दुकानात गर्दी होणार नाही. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीतच खत व बियाणांचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आर्थिक व्यवहार शेतकरी गटच सांभाळेलशेतकऱ्यांकडून पैसे गोळा करणे, या पैशाची डीडी बनविणे हे सर्व व्यवहार गावातील शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच करेल. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हस्तक्षेप करणार नाही. खताची मूळ किंमत, वाहतूक खर्च, हमालीसह खताची एकूण किंमत ठरविली जाईल. तेवढे पैसे डीडी किंवा आरटीजीएस स्वरूपात दुकानदाराला दिले जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती