शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

गावातच उपलब्ध होणार खत व बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर खत व बियाणांची मागणी वाढते. खत व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच खते व बियाणे उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देगर्दी टाळण्याचा प्रयत्न : शेतकऱ्यांकडून गोळा केले वाहतुकीसाठी लागणारे पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांची खत व बियाणांच्या दुकानामध्ये गर्दी होऊ नये, यासाठी गाव पातळीवर खत व बियाणे उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली कृषी विभाग नियोजन करीत आहे.पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर खत व बियाणांची मागणी वाढते. खत व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच खते व बियाणे उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत.कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी हे शेतकºयांना ग्रामस्तरावरच खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली जाईल. गावस्तरावरील शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी तर्फे गावातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खत व बियाणांची मागणी समितीकडे नोंदवेल. तालुका कृषी अधिकारी खताची किंमत निश्चित करतील. खत व बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून गोळा केलेले पैसे शेतकरी गट आरटीजीएस किंवा डीडीद्वारे खत विक्रेत्याला देतील. व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यासाठी पैसे डीडी किंवा आरटीजीएसने देणे सक्तीचे राहणार आहे. गावात एकाच ठिकाणी खत उतरविले जाईल. तेथून शेतकरी आपल्या घरी खत घेऊन जातील. खताची मूळ किंमत वाहतूक खर्च, हमाली या सर्वांचा खर्च शेतकऱ्यांना भरावा लागेल. या सर्व प्रक्रियेमुळे दुकानात गर्दी होणार नाही. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीतच खत व बियाणांचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आर्थिक व्यवहार शेतकरी गटच सांभाळेलशेतकऱ्यांकडून पैसे गोळा करणे, या पैशाची डीडी बनविणे हे सर्व व्यवहार गावातील शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच करेल. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हस्तक्षेप करणार नाही. खताची मूळ किंमत, वाहतूक खर्च, हमालीसह खताची एकूण किंमत ठरविली जाईल. तेवढे पैसे डीडी किंवा आरटीजीएस स्वरूपात दुकानदाराला दिले जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती