शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे आजारांची भीती

By admin | Updated: July 23, 2014 23:37 IST

मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात आजाराची

गडचिरोली : मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात आजाराची लागण होऊ नये व नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायत, नगर पालिका प्रशासनाने तशा उपाययोजनाही आखल्या आहेत. मात्र गर्दीचे ठिकाण असलेल्या बस स्थानक, रेल्वे स्थानक व रुग्णालय येथे पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने साथीच्या आजारांची भीती बळावली आहे. पावसाळ्यात विविध आजारांची लागण होत असते. यात साथीचा आजार हा पाण्याच्या माध्यमातून होत असतो. या आजारावर खबरदारी म्हणून तशा उपाययोजनाही आरोग्य विभागाने आखल्या आहेत. पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. परंतु सर्वाधिक गर्दीचे सार्वजनिक ठिकाण असलेल्या बसस्थानक, रेल्वे स्थानक, व रुग्णालयात शुध्द पिण्याचे पाणी मिळणे कठीणच झाले आहे. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र टाकीची नियमीत सफाई केली जात नाही. टाक्या स्वच्छ ठेवल्या जात नाही. पाणी शुध्द करण्यासाठी केलेल्या उपाययोजना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे कुचकामी ठरत आहेत. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी घाण पसरली आहे. रुग्णालयाच्या छतावर पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. परंतु या टाक्यांची नियमीत स्वच्छता केली जात नाही. तर रूग्णालय परिसरात असलेल्या सिमेंटच्या टाक्याजवळही घाण पसरली आहे. येथील घाण स्वच्छ करण्याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. येथील एसटी आगारातही प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. मात्र येथे सुध्दा शुध्द पाणी प्यायला मिळेल याची शाश्वती नाही. हीच स्थिती देसाईगंज येथील रेल्वे स्थानकाची आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असलेल्या देसाईगंज स्थानकावर पाण्यासाठी प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी झाल्या आहेत. दिवसभरात या स्थानकावरुन हजारो प्रवाशी जात असतात. येथे असलेल्या पाण्याच्या टाक्या इंग्रजकाळात बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे टाक्यांची स्वच्छता करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)