शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

गावकऱ्यांच्या विरोधापुढे अखेर एफडीसीएमची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:04 IST

कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, देऊळगाव, वाढोणा, सावलखेडा या गावातील ग्रामसभांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी १३ मार्चपासून जंगलातच उपोषण करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देआमदारांची मध्यस्थी : वनमंत्री घेणार ग्रामसभेची बैठक

आॅनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, देऊळगाव, वाढोणा, सावलखेडा या गावातील ग्रामसभांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी १३ मार्चपासून जंगलातच उपोषण करण्याचा इशारा दिला. याबाबत सोमवारी शिरपूर येथील श्रीराम मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी वृक्षतोडीला विरोध केला. या विरोधापुढे एफडीसीएमने माघार घेतली. पुढील निर्णयापर्यंत वृक्षतोड बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या विषयाबाबत आमदार कृष्णा गजबे यांनी सदर बैठकीत मध्यस्थी केली.शिरपूर, भगवानूपर, वाढोणा येथील नागरिकांनी एकत्र येऊन एफडीसीएम मार्फत होणारी वृक्षतोड थांबविली. तसेच तीन ट्रॅक्टरही जप्त केले. त्यानंतर एफडीसीएमच्या अधिकाºयांना बोलविण्यात आले. मात्र ते आले नाही. आ. कृष्णा गजबे यांनी बैठक घेऊन सदर विषयावर मध्यस्थी केली. या बैठकीला एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक एम. डी. राजपुते, वडसाचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे, कुरखेडाचे ठाणेदार पडळकर आदी उपस्थित होते. शिरपूर, भगवानपूर, वाढोणा येथील ग्रामसभा व ग्रामस्थांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत येत्या आठ दिवसात बैठक होणार आहे. जोपर्यंत एफडीसीएमच्या वृक्षतोडीच्या मुद्यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत एफडीसीएमतर्फे वृक्षतोड होणार नाही. तसेच लाकडाचे वाहतुकही करण्यात येणार नाही, असा निर्णय आमदार कृष्णा गजबे यांच्या मध्यस्थीने सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, वाढोणा, सावलखेडा हे गाव पेसा अंतर्गत येतात. येथे ग्रामसभेची कोणतीही परवानगी न घेता एफडीसीएमने या गावांच्या हद्दित येणारे जंगल पूर्णपणे नष्ट केले. वनहक्कानुसार वने, वन्यप्राणी, जैवविविधता यांना हानी पोहोचणारी कृती राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणेला करता येत नसतानाही एफडीसीएमने मनमानी करीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. तेथील गौणवनोपज देखील नष्ट केले. येथील स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतल्याने ‘एफडीसीएम हटाव, जंगल बचाव’ असा नारा देत सोमवारी पाच गावातील नागरिक मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित झाले होते. एफडीसीएमकडून होणारी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी आहे.