शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

गावकऱ्यांच्या विरोधापुढे अखेर एफडीसीएमची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:04 IST

कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, देऊळगाव, वाढोणा, सावलखेडा या गावातील ग्रामसभांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी १३ मार्चपासून जंगलातच उपोषण करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देआमदारांची मध्यस्थी : वनमंत्री घेणार ग्रामसभेची बैठक

आॅनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, देऊळगाव, वाढोणा, सावलखेडा या गावातील ग्रामसभांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी १३ मार्चपासून जंगलातच उपोषण करण्याचा इशारा दिला. याबाबत सोमवारी शिरपूर येथील श्रीराम मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी वृक्षतोडीला विरोध केला. या विरोधापुढे एफडीसीएमने माघार घेतली. पुढील निर्णयापर्यंत वृक्षतोड बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या विषयाबाबत आमदार कृष्णा गजबे यांनी सदर बैठकीत मध्यस्थी केली.शिरपूर, भगवानूपर, वाढोणा येथील नागरिकांनी एकत्र येऊन एफडीसीएम मार्फत होणारी वृक्षतोड थांबविली. तसेच तीन ट्रॅक्टरही जप्त केले. त्यानंतर एफडीसीएमच्या अधिकाºयांना बोलविण्यात आले. मात्र ते आले नाही. आ. कृष्णा गजबे यांनी बैठक घेऊन सदर विषयावर मध्यस्थी केली. या बैठकीला एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक एम. डी. राजपुते, वडसाचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे, कुरखेडाचे ठाणेदार पडळकर आदी उपस्थित होते. शिरपूर, भगवानपूर, वाढोणा येथील ग्रामसभा व ग्रामस्थांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत येत्या आठ दिवसात बैठक होणार आहे. जोपर्यंत एफडीसीएमच्या वृक्षतोडीच्या मुद्यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत एफडीसीएमतर्फे वृक्षतोड होणार नाही. तसेच लाकडाचे वाहतुकही करण्यात येणार नाही, असा निर्णय आमदार कृष्णा गजबे यांच्या मध्यस्थीने सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, वाढोणा, सावलखेडा हे गाव पेसा अंतर्गत येतात. येथे ग्रामसभेची कोणतीही परवानगी न घेता एफडीसीएमने या गावांच्या हद्दित येणारे जंगल पूर्णपणे नष्ट केले. वनहक्कानुसार वने, वन्यप्राणी, जैवविविधता यांना हानी पोहोचणारी कृती राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणेला करता येत नसतानाही एफडीसीएमने मनमानी करीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. तेथील गौणवनोपज देखील नष्ट केले. येथील स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतल्याने ‘एफडीसीएम हटाव, जंगल बचाव’ असा नारा देत सोमवारी पाच गावातील नागरिक मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित झाले होते. एफडीसीएमकडून होणारी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी आहे.