शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनामुळे शेतकरी उद्ध्वस्त हाेण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

विद्यमान महाविकास आघाडी शासनाने विमा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतील अशा अटी टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी कंपन्यांचा फायदा करण्यात सरकार मग्न आहे. अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त झाली आहेत. हजाराे हेक्टर जमीन खरडून निघाली आहे. असे असतानाही राज्य शासनाने काेणतीही मदत केली नाही. केवळ केंद्र शासनाकडे बाेट दाखविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्य शासन राबवित असलेल्या चुकीच्या धाेरणांमुळे मागील दाेन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे, असा आराेप माजी आ. अतुल देशकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विद्यमान महाविकास आघाडी शासनाने विमा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतील अशा अटी टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी कंपन्यांचा फायदा करण्यात सरकार मग्न आहे. अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त झाली आहेत. हजाराे हेक्टर जमीन खरडून निघाली आहे. असे असतानाही राज्य शासनाने काेणतीही मदत केली नाही. केवळ केंद्र शासनाकडे बाेट दाखविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. पूर्वीच्या तुलनेत विजेचे दर वाढले आहेत. त्यामुळे वीजबिल भरणे शेतकरी व सामान्य नागरिकांना अशक्य झाले आहे. अशातच ज्या नागरिक व शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही, अशांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला जात आहे. वीजपुरवठा कापल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान करपले आहे. आता ताे शेतकरी वीजबिल कसा भरणार, असा प्रश्न देशकर यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला खा.अशाेक नेते, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपचे महामंत्री तथा नगरसेवक प्रमाेद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, संजू गजपुरे, अनिल पाेहणकर, शेख आदी उपस्थित हाेते.

-  विदर्भात मागील आठ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. हातात आलेले पीक नष्ट हाेताना बघून शेतकरी चिंतातूर झाला असल्याचे दिसून येत आहे. मात्र मुंबईत बसून शासन चालविणाऱ्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांनी अजुनही पंचनामे केले नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहण्याचा धाेका आहे. जगाचा पाेशिंदा असलेल्या शेतकऱ्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करून फार माेठे पाप करीत आहे, असा आराेप खासदार अशाेक नेते यांनी पत्रकारपरिषदेला केला आहे.

 

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते