शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

राज्य शासनामुळे शेतकरी उद्ध्वस्त हाेण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

विद्यमान महाविकास आघाडी शासनाने विमा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतील अशा अटी टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी कंपन्यांचा फायदा करण्यात सरकार मग्न आहे. अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त झाली आहेत. हजाराे हेक्टर जमीन खरडून निघाली आहे. असे असतानाही राज्य शासनाने काेणतीही मदत केली नाही. केवळ केंद्र शासनाकडे बाेट दाखविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्य शासन राबवित असलेल्या चुकीच्या धाेरणांमुळे मागील दाेन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे, असा आराेप माजी आ. अतुल देशकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विद्यमान महाविकास आघाडी शासनाने विमा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतील अशा अटी टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी कंपन्यांचा फायदा करण्यात सरकार मग्न आहे. अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त झाली आहेत. हजाराे हेक्टर जमीन खरडून निघाली आहे. असे असतानाही राज्य शासनाने काेणतीही मदत केली नाही. केवळ केंद्र शासनाकडे बाेट दाखविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. पूर्वीच्या तुलनेत विजेचे दर वाढले आहेत. त्यामुळे वीजबिल भरणे शेतकरी व सामान्य नागरिकांना अशक्य झाले आहे. अशातच ज्या नागरिक व शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही, अशांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला जात आहे. वीजपुरवठा कापल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान करपले आहे. आता ताे शेतकरी वीजबिल कसा भरणार, असा प्रश्न देशकर यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला खा.अशाेक नेते, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपचे महामंत्री तथा नगरसेवक प्रमाेद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, संजू गजपुरे, अनिल पाेहणकर, शेख आदी उपस्थित हाेते.

-  विदर्भात मागील आठ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. हातात आलेले पीक नष्ट हाेताना बघून शेतकरी चिंतातूर झाला असल्याचे दिसून येत आहे. मात्र मुंबईत बसून शासन चालविणाऱ्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांनी अजुनही पंचनामे केले नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहण्याचा धाेका आहे. जगाचा पाेशिंदा असलेल्या शेतकऱ्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करून फार माेठे पाप करीत आहे, असा आराेप खासदार अशाेक नेते यांनी पत्रकारपरिषदेला केला आहे.

 

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते