शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

रेल्वेत जाणाऱ्या जागेच्या दराने शेतकरी हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

आरमोरी नगर परिषद झाल्याने वाढीव गावठाण क्षेत्र नियोजित जागेपर्यंत आले आहेत. त्या कारणाने नियोजित जागेचे बाजारमूल्य शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवेदनाद्वारे प्रतिएकर २ काेटी  ५० लाख  रुपये द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याला ४ वर्षे उलटून गेल्याने आता जागेचे दर प्रतिएकर ३ काेटी ५० लाख रुपयापर्यंत द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग व रेल्वे स्टेशनसाठी पालोरा, शेगाव व आरमोरी शहर परिसरात अनेक जमिनींच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, भूसंपादनाचा दर निश्चित करण्याची पद्धत योग्य नसल्याचे सांगत जमिनीला योग्य दर देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी तहसीलवर धडक दिली. या प्रकल्पात जमिनी जाणाऱ्या काही शेतकऱ्यांना भूसंपादनाबाबतचे पत्र  मिळाले. पण, त्यातील जमिनीचे दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा बरेच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेऊन शेतजमिनीची केलेली दर निश्चिती बदलून आजच्या बाजारभावापेक्षा पाचपट अधिक रक्कम द्यावी, अशी मागणी केली  आहे. निवेदन देताना हरीश मने, दीपक हेडवू, अनिरुद्ध मने, केशव बारापात्रे, रामभाऊ कुकडकर, यादव बोरकर, खेमजी गोन्नाडे, पुंडलिक जुआरे आदी शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची झाली दिशाभूल?प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता थेट घरपाेच संमतीपत्र पाठविण्यात आले. ज्या संमतीपत्रामध्ये अनेक जाचक अटींचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर शासनाकडून भूसंपादनाची दर निश्चिती शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. आरमोरी तालुक्यातील शेगाव व पालोरा येथील खासगी जमीन नवीन रेल्वेमार्ग, रेल्वे स्टेशनसाठी शासनाने खरेदी करण्यासाठी ११ जानेवारी २०१८ रोजी  बैठक घेतली होती. मात्र, शेतजमिनीचा दर निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खासगी दरापेक्षा कमी दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अनेक शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नाहीत. वेळप्रसंगी न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वच जमीन रेल्वेत जाईल तर जगायचे काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

प्रतिएकर ३.५० कोटीपर्यंत दर द्यारेल्वेमार्गासाठी शासनाने नमूद केलेल्या दरात शेगाव-पालोरा गावाजवळील शेतीला प्रतिएकर ४ लाख, वडसा मार्गावरील शेतीला १३ लाख, बागायती शेतीला ८० लाख ते १ कोटीपर्यंत दर निश्चित केले आहेत. त्यासंबंधीचे पत्र शेतकऱ्यांना मिळाले असल्याचे शेतकरी दीपक हेडाऊ यांनी सांगितले. मात्र, आता आरमोरी नगर परिषद झाल्याने वाढीव गावठाण क्षेत्र नियोजित जागेपर्यंत आले आहेत. त्या कारणाने नियोजित जागेचे बाजारमूल्य शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवेदनाद्वारे प्रतिएकर २ काेटी  ५० लाख  रुपये द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याला ४ वर्षे उलटून गेल्याने आता जागेचे दर प्रतिएकर ३ काेटी ५० लाख रुपयापर्यंत द्यावे अशी मागणी त्यांनी केली. भूसंपादनाच्या संदर्भात शेतकऱ्यांशी दुजाभाव का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :railwayरेल्वे