शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:14 IST

भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देभारतीय किसान संघाचे नेतृत्त्व : वनहक्क पट्ट्यांचे दावे तात्काळ मंजूर करा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.वनजमिनीचे पट्टे मिळण्यासाठी हजारो नागरिकांनी प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावामध्ये थोड्याफार त्रुट्या आहेत. मात्र या त्रुट्या लक्षात आणून देऊन त्या दूर करण्यासाठी सूचना दिल्या जात नाही. परिणामी हजारो प्रस्ताव तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्रुट्या दूर करून वनपट्ट्यांचे वाटप करावे, शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीज पुरवठा करावा, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची किंमत संबंधितांना देण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यातील तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना लाभ देण्यात यावा, शेताच्या कुंपनासाठी मोफत तार उपलब्ध करून द्यावा, रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतीतून उत्पादन घेणे अशक्य झाले आहे. रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले जाते. त्यामुळे रानडुकरांना मारण्याची परवानगी द्यावी. सर्व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट किंमत द्यावी, कृषीसाठी स्वतंत्र बजट सादर करावे, स्वतंत्र कृषी न्यायालय स्थापन करावे, शेतीवर आधारित लघु उद्योग तालुकापातळीवर सुरू करावे, गोवंश हत्यावर पूर्णपणे बंदी लावावी, शेतकरी गायी पाळतील, यादृष्टीने नियोजन करावे, आणेवारी पद्धतीचा फेर विचार करावा, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.भारतीय किसान संघाच्या या मोर्चात अहेरी उपविभागातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यातील जवळपास ५०० नागरिक सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गाने मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, विदर्भ प्रांत संघटन मंत्री रमेश मंडाळे, अहेरी तालुकाध्यक्ष संजय यमसलवार, तालुकामंत्री सुधाकर मुलकरी, उपाध्यक्ष लालसू पुंगाटी, रवी कुळमेथे, मुलचेरा तालुका मंत्री हनमंतू वेलादी, मिलन बिश्वास, संतोष जोशी यांनी केले.शासनाच्या दृष्टीने येथील जनतेच्या विकासाच्या दृष्टीने या मागण्यांकडे शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चा