शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सातबाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक व अहेरी उपप्रादेशिक कार्यालय मिळून एकूण ८९ खरेदी केंद्र सुरू आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत सहा लाख क्विंटलवर धानाची खरेदी झाली आहे. अद्यापही आविका संस्थेच्या केंद्रांवर अनेक शेतकºयांचे धानाचे पोते काट्याविना पडून आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एका शेतकºयाला एकरी १२ क्विंटल धान एका सातबाºयावर विकता येते.

ठळक मुद्दे महामंडळाची धान खरेदी वाढतीवर : हेक्टरी ३० क्विंटल धान्य विक्रीची मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थेच्या वतीने तसेच मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरेदी-विक्री सहकारी संघाच्या वतीने आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धानाची खरेदी सुरू आहे. मात्र धान विक्रीची मर्यादा कमी असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना सातबारा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक व अहेरी उपप्रादेशिक कार्यालय मिळून एकूण ८९ खरेदी केंद्र सुरू आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत सहा लाख क्विंटलवर धानाची खरेदी झाली आहे. अद्यापही आविका संस्थेच्या केंद्रांवर अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पोते काट्याविना पडून आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एका शेतकऱ्याला एकरी १२ क्विंटल धान एका सातबाऱ्यावर विकता येते. तसेच प्रतीहेक्टरी ३० क्विंटल धान विक्रीची मर्यादा आहे. यावर्षी काही शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन भरघोस झाले. हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल धान बऱ्याच शेतकऱ्यांना झाल्याची माहिती आहे. मात्र या शेतकऱ्यांकडे एका हेक्टर शेतीचा एकच सातबारा असल्याने त्याला महामंडळाच्या आधारभूत केंद्रांवर केवळ ३० क्विंटल धानाची विक्री करता येत आहे. उर्वरित ५ ते १० क्विंटल धान विक्रीसाठी त्या शेतकऱ्याला लगतच्या शेतकऱ्याचा सातबारा मिळवावा लागत आहे. मात्र सातबारा सहजासहजी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. काही खासगी व्यापारी आपले धान आविका संस्थेच्या केंद्रांवर विकत आहेत. असे व्यापारी शेतकऱ्यांकडून सातबारे आपसात गोळा करीत असल्याची माहिती आहे.शासनाच्या वतीने साधारण धानाला यावर्षी प्रती क्विंटल १८१५ रुपये भाव दिला जात आहे. क्विंटल मागे ५०० रुपयांचा बोनस व महाविकास आघाडीने प्रती क्विंटल २०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अडीच हजार रुपये भाव क्विंटलमागे पडत आहे. परिणामी आवक वाढली आहे.बोनसची मर्यादा वाढविण्याची मागणीराज्य शासनाच्या वतीने आविका संस्थेच्या आधारभूत केंद्रांवर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस दिला जातो. मात्र एका शेतकऱ्याला ५० क्विंटल धान विक्रीपर्यंत बोनस दिला जातो. त्यापेक्षा अधिक धान विकूनही बोनस मिळत नाही. केवळ ५० क्विंटलपर्यंतच बोनस दिला जातो. जिल्ह्यात सदन शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बोनसची धान मर्यादा वाढविण्याची मागणी होत आहे. मर्यादेपेक्षा अधिकच्या धानाला बोनस मिळविण्यासाठी दुसºया शेतकऱ्यांचे सातबारा मिळवावा लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी