शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

सातबाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक व अहेरी उपप्रादेशिक कार्यालय मिळून एकूण ८९ खरेदी केंद्र सुरू आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत सहा लाख क्विंटलवर धानाची खरेदी झाली आहे. अद्यापही आविका संस्थेच्या केंद्रांवर अनेक शेतकºयांचे धानाचे पोते काट्याविना पडून आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एका शेतकºयाला एकरी १२ क्विंटल धान एका सातबाºयावर विकता येते.

ठळक मुद्दे महामंडळाची धान खरेदी वाढतीवर : हेक्टरी ३० क्विंटल धान्य विक्रीची मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थेच्या वतीने तसेच मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरेदी-विक्री सहकारी संघाच्या वतीने आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धानाची खरेदी सुरू आहे. मात्र धान विक्रीची मर्यादा कमी असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना सातबारा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक व अहेरी उपप्रादेशिक कार्यालय मिळून एकूण ८९ खरेदी केंद्र सुरू आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत सहा लाख क्विंटलवर धानाची खरेदी झाली आहे. अद्यापही आविका संस्थेच्या केंद्रांवर अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पोते काट्याविना पडून आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एका शेतकऱ्याला एकरी १२ क्विंटल धान एका सातबाऱ्यावर विकता येते. तसेच प्रतीहेक्टरी ३० क्विंटल धान विक्रीची मर्यादा आहे. यावर्षी काही शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन भरघोस झाले. हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल धान बऱ्याच शेतकऱ्यांना झाल्याची माहिती आहे. मात्र या शेतकऱ्यांकडे एका हेक्टर शेतीचा एकच सातबारा असल्याने त्याला महामंडळाच्या आधारभूत केंद्रांवर केवळ ३० क्विंटल धानाची विक्री करता येत आहे. उर्वरित ५ ते १० क्विंटल धान विक्रीसाठी त्या शेतकऱ्याला लगतच्या शेतकऱ्याचा सातबारा मिळवावा लागत आहे. मात्र सातबारा सहजासहजी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. काही खासगी व्यापारी आपले धान आविका संस्थेच्या केंद्रांवर विकत आहेत. असे व्यापारी शेतकऱ्यांकडून सातबारे आपसात गोळा करीत असल्याची माहिती आहे.शासनाच्या वतीने साधारण धानाला यावर्षी प्रती क्विंटल १८१५ रुपये भाव दिला जात आहे. क्विंटल मागे ५०० रुपयांचा बोनस व महाविकास आघाडीने प्रती क्विंटल २०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अडीच हजार रुपये भाव क्विंटलमागे पडत आहे. परिणामी आवक वाढली आहे.बोनसची मर्यादा वाढविण्याची मागणीराज्य शासनाच्या वतीने आविका संस्थेच्या आधारभूत केंद्रांवर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस दिला जातो. मात्र एका शेतकऱ्याला ५० क्विंटल धान विक्रीपर्यंत बोनस दिला जातो. त्यापेक्षा अधिक धान विकूनही बोनस मिळत नाही. केवळ ५० क्विंटलपर्यंतच बोनस दिला जातो. जिल्ह्यात सदन शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बोनसची धान मर्यादा वाढविण्याची मागणी होत आहे. मर्यादेपेक्षा अधिकच्या धानाला बोनस मिळविण्यासाठी दुसºया शेतकऱ्यांचे सातबारा मिळवावा लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी