शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

11 केव्हीची विद्युतवाहिनी शेतातून टाकण्यास शेतकऱ्यांचा विराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

ही विद्युत वाहिनी कृषीपंपासाठी वेगळी केली जात असून कृषीपंपासाठी फक्त आठ तास वीज मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांची उन्हाळी फसल होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभागीय अभियंता सार्वे, कनिष्ठ अभियंता बागडे यांनी बोडधा येथे जाऊन शेतकऱ्यांची समजूत घातली. दरम्यान,  शेतकऱ्यांनी त्यांना वीज पोल टाकू देण्यास नकार दर्शवला. त्यानंतर अधिकारीसुद्धा हताश होऊन तिथून परतले.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव/चोप : देसाईगंज तालुक्यात बोडधा येथील शेतकऱ्यांनी नवीन ११ केव्हीची विद्युत वाहिनी शेतातून टाकण्यास शनिवारला आलेल्या ठेकेदाराला विरोध दर्शविला. लोडशेडिंग विषयावरून शेतकरी यावेळी आक्रमक झाले हाेते. ही विद्युत वाहिनी कृषीपंपासाठी वेगळी केली जात असून कृषीपंपासाठी फक्त आठ तास वीज मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांची उन्हाळी फसल होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभागीय अभियंता सार्वे, कनिष्ठ अभियंता बागडे यांनी बोडधा येथे जाऊन शेतकऱ्यांची समजूत घातली. दरम्यान,  शेतकऱ्यांनी त्यांना वीज पोल टाकू देण्यास नकार दर्शवला. त्यानंतर अधिकारीसुद्धा हताश होऊन तिथून परतले. लोडशेडिंग होणार नाही याची हमी आम्हाला द्या तरच नवीन वाहिनी टाका, अशी मागणी शेतकऱ्यांनी वीज विभागाकडे केली. यापूर्वी आम्हाला या वाहिनीसंदर्भात काही कळविले नाही आणि एकाएकी वीजवाहिनी वेगळी करून नवीन वाहिनी टाकल्याने शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविल्याची माहिती आहे.

कृषिपंपाच्या वीज जोडण्या अजूनही अपूर्णच

-    गडचिरोली जिल्ह्यात कृषिपंपाच्या बऱ्याच वीज जोडण्या अजूनही अपूर्णच आहेत. पीक घेण्यासाठी शिल्लक वीज जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून आकारण्यात येत असलेले अवाजवी वीज शुल्क कमी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागासह शासनाकडे केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. वन कायद्यामुळे जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प होऊ शकले नाहीत. सिंचनाचे मोठे प्रकल्प नसल्याने तलाव, विहिरी, नाले व बोडी यावर कृषिपंपाने सिंचनाची सोय केली जाते. शासनाच्या वतीने कृषिपंपाची वीज जोडणी करून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणी करून देण्यात आली असली तरी आजघडीला दीड हजारवर कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. 

कृषीपंपांना कमी दाबाचा वीजपुरवठा हाेत असल्याने आम्हाला ही नवीन वाहिनी टाकावी लागत आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पूर्वसंमतीची गरज नाही. - एन. एम. बागडे, कनिष्ठ अभियंता विद्युत विभाग, देसाईगंज.

 

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज