शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दीड वर्षांपासून शेतकरी सौरपंपाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST

धानोरा तालुक्यातील जानू गणू हीचामी रा फासिटोला (दुधमाळा) व वासुदेव गुरनुले दुधमाळा यांच्या शेतात दीड वर्षापूर्वी सौर प्लेट लावून ...

धानोरा तालुक्यातील जानू गणू हीचामी रा फासिटोला (दुधमाळा) व वासुदेव गुरनुले दुधमाळा यांच्या शेतात दीड वर्षापूर्वी सौर प्लेट लावून ठेवण्यात आले आहेत. तालुक्यात अशी आणखी प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सोय आहे त्यांना सरकारने इलेक्ट्रिक बिलाचा खर्च लागू नये याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी योजना अंतर्गत विहिरीवर सोलर पंप बसवून देण्याची योजना सुरू केली आहे. सदर काम खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. कंपनी निवडण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आला. या शेतकऱ्यांनी मुद्रा कंपनीची निवड करून सोलर पंप बसविण्याकरिता ८ हजार २८० रुपये डिमांड भरले. त्यानंतर कंपनीने ऑगस्ट २०१९ मध्ये काही सामान आणून १५ सप्टेंबर २०१९ ला या शेतकऱ्यांच्या शेतात सोलर प्लेट उभे करण्यात आले. त्याकरिता लागणारा सिमेंटचा खर्चही शेतकऱ्यांनीच केला. परंतु तेव्हापासून दीड वर्षाचा कालावधी उलटूनही फक्त सौर फ्लॅटच उभे आहेत. बॅटऱ्या व इतर साहित्य लावण्यात आले नाही. त्यामुळे पंप सुरू झाले नाही. शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२० ला धानोरा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालयात तक्रार दाखल केली. परंतु अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. शेतकऱ्यांनी कंपनीने दिलेल्या मोबाइलवर फोन लावले असता आठ दिवसात बॅटरी लावून देतो असे सांगितले जाते परंतु ते लावून दिले नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊ नये तक्रारींचे निरसन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.