शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

शेतकऱ्यांचे सोने बँकेकडे गहाण

By admin | Updated: December 20, 2014 22:37 IST

गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे.

अडचण वाढली : मुदतीत सोडवणूक न झाल्याने लिलावाचा ससेमिरागडचिरोली : गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी अनेक शेतकरी बँकांच्या सोनेतारण योजनेत आपल्या घरातील असलेले दागीणे बँकांकडे गहाण टाकून आपली अडचण भागवून घेत असल्याचे विदारक चित्र नक्षलग्रस्त गडचिरोलीसह राज्यातील अनेक भागात दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांकडून तारण योजनेत ठेवलेल्या दागिण्यांची सोडवणूक न झाल्याने बँकांनी त्यांच्या दागिण्यांचा लिलावही ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत नापिकीचा शेतकरी सामना करीत आहे. शेतमालाचे भाव दरवर्षी वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील लग्नकार्यासारखे प्रसंग आल्यास संपूर्ण शेतकरी कुटुंब खचून जाते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्वी खासगी सावकारांकडे शेतकरी धाव घेत होता. मात्र आता खासगी सावकाराविरोधातील कायदे कडक झाल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कुणीही रोख स्वरूपात मदत करण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची अडचण वाढत चालली आहे. बँकेकडे कर्जासाठी जावे तर जुने कर्ज फेडले नसल्याने नवे कर्ज बँक देत नाही, वा नाहरकत प्रमाणपत्र आठ ते दहा बँकांचे आणण्यासाठी सांगितले जाते. यात किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी निघून जातो व कर्ज मिळेलच याची शाश्वतीही नसते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी घरी असलेले सोने आता राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांकडे तारण ठेवून त्यावर मिळेल तेवढे पैसे घेण्यासाठी धडपडत आहे. साधारणत: १ लाखापर्यंत आर्थिक रक्कम तारण योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाते. सातबारा जोडल्यास व्याजदरात इतरांपेक्षा १ टक्का कमी व्याजदरही आकारले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी तारण योजनेतून सोने गहाण ठेवून कर्ज उचलत आहे. एका दिवसात तासाभरात हे कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा अशा कर्जाकडे ओढा आता वाढला आहे. मात्र काही शेतकरी कुटुंबाकडून तारण योजनेत ठेवलेल्या सोडवणूक करणे शक्य झाले नसल्याने त्यांच्या दागिण्याचा लिलाव या वर्षाअखेर होणार आहे. याबाबत बँकेने कायदेशिर प्रक्रियाही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचे प्रमाण ५ हजाराच्यावर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)