शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

शेतकऱ्यांचे सोने बँकेकडे गहाण

By admin | Updated: December 20, 2014 22:37 IST

गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे.

अडचण वाढली : मुदतीत सोडवणूक न झाल्याने लिलावाचा ससेमिरागडचिरोली : गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी अनेक शेतकरी बँकांच्या सोनेतारण योजनेत आपल्या घरातील असलेले दागीणे बँकांकडे गहाण टाकून आपली अडचण भागवून घेत असल्याचे विदारक चित्र नक्षलग्रस्त गडचिरोलीसह राज्यातील अनेक भागात दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांकडून तारण योजनेत ठेवलेल्या दागिण्यांची सोडवणूक न झाल्याने बँकांनी त्यांच्या दागिण्यांचा लिलावही ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत नापिकीचा शेतकरी सामना करीत आहे. शेतमालाचे भाव दरवर्षी वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील लग्नकार्यासारखे प्रसंग आल्यास संपूर्ण शेतकरी कुटुंब खचून जाते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्वी खासगी सावकारांकडे शेतकरी धाव घेत होता. मात्र आता खासगी सावकाराविरोधातील कायदे कडक झाल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कुणीही रोख स्वरूपात मदत करण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची अडचण वाढत चालली आहे. बँकेकडे कर्जासाठी जावे तर जुने कर्ज फेडले नसल्याने नवे कर्ज बँक देत नाही, वा नाहरकत प्रमाणपत्र आठ ते दहा बँकांचे आणण्यासाठी सांगितले जाते. यात किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी निघून जातो व कर्ज मिळेलच याची शाश्वतीही नसते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी घरी असलेले सोने आता राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांकडे तारण ठेवून त्यावर मिळेल तेवढे पैसे घेण्यासाठी धडपडत आहे. साधारणत: १ लाखापर्यंत आर्थिक रक्कम तारण योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाते. सातबारा जोडल्यास व्याजदरात इतरांपेक्षा १ टक्का कमी व्याजदरही आकारले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी तारण योजनेतून सोने गहाण ठेवून कर्ज उचलत आहे. एका दिवसात तासाभरात हे कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा अशा कर्जाकडे ओढा आता वाढला आहे. मात्र काही शेतकरी कुटुंबाकडून तारण योजनेत ठेवलेल्या सोडवणूक करणे शक्य झाले नसल्याने त्यांच्या दागिण्याचा लिलाव या वर्षाअखेर होणार आहे. याबाबत बँकेने कायदेशिर प्रक्रियाही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचे प्रमाण ५ हजाराच्यावर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)