शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे सोने बँकेकडे गहाण

By admin | Updated: December 20, 2014 22:37 IST

गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे.

अडचण वाढली : मुदतीत सोडवणूक न झाल्याने लिलावाचा ससेमिरागडचिरोली : गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी अनेक शेतकरी बँकांच्या सोनेतारण योजनेत आपल्या घरातील असलेले दागीणे बँकांकडे गहाण टाकून आपली अडचण भागवून घेत असल्याचे विदारक चित्र नक्षलग्रस्त गडचिरोलीसह राज्यातील अनेक भागात दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांकडून तारण योजनेत ठेवलेल्या दागिण्यांची सोडवणूक न झाल्याने बँकांनी त्यांच्या दागिण्यांचा लिलावही ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत नापिकीचा शेतकरी सामना करीत आहे. शेतमालाचे भाव दरवर्षी वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील लग्नकार्यासारखे प्रसंग आल्यास संपूर्ण शेतकरी कुटुंब खचून जाते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्वी खासगी सावकारांकडे शेतकरी धाव घेत होता. मात्र आता खासगी सावकाराविरोधातील कायदे कडक झाल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कुणीही रोख स्वरूपात मदत करण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची अडचण वाढत चालली आहे. बँकेकडे कर्जासाठी जावे तर जुने कर्ज फेडले नसल्याने नवे कर्ज बँक देत नाही, वा नाहरकत प्रमाणपत्र आठ ते दहा बँकांचे आणण्यासाठी सांगितले जाते. यात किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी निघून जातो व कर्ज मिळेलच याची शाश्वतीही नसते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी घरी असलेले सोने आता राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांकडे तारण ठेवून त्यावर मिळेल तेवढे पैसे घेण्यासाठी धडपडत आहे. साधारणत: १ लाखापर्यंत आर्थिक रक्कम तारण योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाते. सातबारा जोडल्यास व्याजदरात इतरांपेक्षा १ टक्का कमी व्याजदरही आकारले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी तारण योजनेतून सोने गहाण ठेवून कर्ज उचलत आहे. एका दिवसात तासाभरात हे कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा अशा कर्जाकडे ओढा आता वाढला आहे. मात्र काही शेतकरी कुटुंबाकडून तारण योजनेत ठेवलेल्या सोडवणूक करणे शक्य झाले नसल्याने त्यांच्या दागिण्याचा लिलाव या वर्षाअखेर होणार आहे. याबाबत बँकेने कायदेशिर प्रक्रियाही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचे प्रमाण ५ हजाराच्यावर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)