शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

गडचिरोलीतील कारली दलालांच्या दावणीला; लॉकडाऊनचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:41 IST

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते.

ठळक मुद्देमोहटोला-किन्हाळा येथील शेतकऱ्यांचा माल पडत्या भावात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते. तालुक्याच्या मोहटोला-किन्हाळा परिसरात कारल्यांचे भरपूर प्रमाणात उत्पादन होत आहे. मात्र त्यांना बाहेर माल नेता येत नसल्याने दलालांमार्फत व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे येथील कारले दलालांच्या दावणीलाच बांधले असल्याचे दिसून येत आहे.मोहटोला-किन्हाळा गाव कारल्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अवघ्या चार-पाच वर्षात या भागात व्यापाऱ्यांनी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली. परिसरातील संपूर्ण कारले सदर बाजारपेठेत येत असल्याने व्यापारी हा माल दूरवरच्या भागात नेऊन विक्री करायचे; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर जिल्ह्यात मालाची वाहतूक करता येत नाही. कारल्यांची विक्री जिल्ह्यांतर्गतच करावी लागत आहे. यासाठी माल खरेदीकरिता व्यापाºयांना गावाच्या वेशीवरच थांबावे लागत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार मोहटोला-किन्हाळा ग्रामपंचायतने ठराव घेऊन गावातील कारले बाजारावर लक्ष ठेवत बाजारपेठ बंद पाडली. येथील बाजारपेठ बंद पडल्याने कारले खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपला ठिय्या गावाच्या वेशीवर मांडला. ते कारल्यांची खरेदी करीत आहेत. त्यांनी कारल्यांची खरेदी सुरुच ठेवली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील वस्तंूच्या नावावर खरेदी केलेले कारले कुठे जातात, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवर कर्मचारी नेमून गावात येणाºया वाहनाची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. येथे प्रवेश करणाऱ्यांचे वाहन क्रमांक, परवाना क्रमांक, चालकाचे नाव, सोबत येणारे खरेदीदार व दलालांचे नाव खरेदीदार दलालांचे नाव, माल विक्रीला नेण्याचे ठिकाण आदी माहितीची नोंद घेत आहेत. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुण्यासाठी पाणी व साबन वापरणे आवश्यक केले आहे. सध्या हे खरेदीदार वेशीवरच थांबून मालाची खरेदी करीत आहेत. मात्र याठिकाणी मास्कचा वापर व सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस