शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अनुमुलबोईना यांनी केली आहे.

ठळक मुद्देमेडीगड्डा प्रकल्प : प्रकल्पग्रस्तांचे अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्याचा महत्त्वकांशी मेडीगड्डा प्रकल्प पूर्णत्त्वास आला. परंतु या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या अनेक जमीन मालकांना मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त महसूल विभाग कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. ही अडचण जाणून प्रकल्पग्रस्तांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली.निवेदनात म्हटले आहे की, वडिलोपार्जीत वारसा हक्काने मिळालेली पोचमपल्ली रै. येथील शेतजमीन प्रकल्पात गेली. या जमिनीव्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारची शेतजमीन नाही. या शेतजमिनीवरच उपजीविका चालविली जात होती. तेलंगणा राज्यातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३० जानेवारी २०१८ मध्ये रितसर रजिस्टर्ड विक्री पत्रान्वये जमीन हस्तांतरित केली. या जमिनीचा मोबदला प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात किंवा धनादेशामार्फत एका आठवड्यात देण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी कबूल केले होते. परंतु पोचमपल्ली येथील एका व्यक्तीने काही खोट्या व बनावटी दस्तावेजांच्या आधारे आपल्या विरूद्ध अवैैध आक्षेप घेतला आहे, असे कारण सांगून प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोबदला अद्यापही दिला नाही.प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अनुमुलबोईना यांनी केली आहे.अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्नमोबदल्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयाला भेट देऊन मागणी केली. परंतु संबंधित कार्यालयाचे अधिकारी मोबदला देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असता तेलंगणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्याचे धनादेश सिरोंचा तहसीलदारांकडे वितरित करण्यास पाठविले. परंतु तहसीलदारांसुद्धा याबाबत माहिती घेऊनही पोचमपल्ली येथील काही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून धनादेश देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी