शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अनुमुलबोईना यांनी केली आहे.

ठळक मुद्देमेडीगड्डा प्रकल्प : प्रकल्पग्रस्तांचे अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्याचा महत्त्वकांशी मेडीगड्डा प्रकल्प पूर्णत्त्वास आला. परंतु या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या अनेक जमीन मालकांना मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त महसूल विभाग कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. ही अडचण जाणून प्रकल्पग्रस्तांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली.निवेदनात म्हटले आहे की, वडिलोपार्जीत वारसा हक्काने मिळालेली पोचमपल्ली रै. येथील शेतजमीन प्रकल्पात गेली. या जमिनीव्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारची शेतजमीन नाही. या शेतजमिनीवरच उपजीविका चालविली जात होती. तेलंगणा राज्यातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३० जानेवारी २०१८ मध्ये रितसर रजिस्टर्ड विक्री पत्रान्वये जमीन हस्तांतरित केली. या जमिनीचा मोबदला प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात किंवा धनादेशामार्फत एका आठवड्यात देण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी कबूल केले होते. परंतु पोचमपल्ली येथील एका व्यक्तीने काही खोट्या व बनावटी दस्तावेजांच्या आधारे आपल्या विरूद्ध अवैैध आक्षेप घेतला आहे, असे कारण सांगून प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोबदला अद्यापही दिला नाही.प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अनुमुलबोईना यांनी केली आहे.अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्नमोबदल्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयाला भेट देऊन मागणी केली. परंतु संबंधित कार्यालयाचे अधिकारी मोबदला देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असता तेलंगणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्याचे धनादेश सिरोंचा तहसीलदारांकडे वितरित करण्यास पाठविले. परंतु तहसीलदारांसुद्धा याबाबत माहिती घेऊनही पोचमपल्ली येथील काही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून धनादेश देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी