शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

शेततळ्यांचा पशूंना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:42 IST

रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते.

ठळक मुद्देउन्हाचा तडाखा : तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निर्माण करण्यात आलेले शेततळे व वनतलाव पाळीव व रानटी जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदून दिले जाते. या शेततळ्यांचा उपयोग शेतकरी पावसाळ्यात अंतिम टप्प्यात पीक असताना विशेषत: करतात. कारण या कालावधीत पावसाने दगा दिला असतो. पिकाच्या अंतिम टप्प्यात हे तलाव उपयुक्त ठरतात. याशिवाय उन्हाळ्यात पाळीव जनावरांसाठी या शेततळ्यांचा उपयोग होतो. याशिवाय जलयुक्त शिवार योजनेतून जंगलालगत अथवा गावाच्या बाहेर निर्माण करण्यात आलेल्या वनतलावातील पाणी जनावरांसाठी उपयोगी ठरतो. अशा प्रकारचे अनेक शेततळे व वनतलाव सध्या उपयुक्त ठरत आहेत. गावागावांतील अनेक विहिरी व हातपंपाने तळ गाठला असताना जिल्ह्यातील अनेक शेततळे व वनतलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक असल्याने जनावरांचा त्याचा उपयोग होत आहे.पंधरवड्यात पडणार कोरडेउन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विहिरी व हातपंप कोरडे पडत आहेत. अशा स्थितीतही शेततळे व वनतलावातील थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु हा पाणीसाठा जास्तीत जास्त पंधरा दिवसांपर्यंत राहू शकतो. पंधरवड्यानंतर वनतलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणी