शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेततळ्यांचा पशूंना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:42 IST

रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते.

ठळक मुद्देउन्हाचा तडाखा : तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निर्माण करण्यात आलेले शेततळे व वनतलाव पाळीव व रानटी जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदून दिले जाते. या शेततळ्यांचा उपयोग शेतकरी पावसाळ्यात अंतिम टप्प्यात पीक असताना विशेषत: करतात. कारण या कालावधीत पावसाने दगा दिला असतो. पिकाच्या अंतिम टप्प्यात हे तलाव उपयुक्त ठरतात. याशिवाय उन्हाळ्यात पाळीव जनावरांसाठी या शेततळ्यांचा उपयोग होतो. याशिवाय जलयुक्त शिवार योजनेतून जंगलालगत अथवा गावाच्या बाहेर निर्माण करण्यात आलेल्या वनतलावातील पाणी जनावरांसाठी उपयोगी ठरतो. अशा प्रकारचे अनेक शेततळे व वनतलाव सध्या उपयुक्त ठरत आहेत. गावागावांतील अनेक विहिरी व हातपंपाने तळ गाठला असताना जिल्ह्यातील अनेक शेततळे व वनतलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक असल्याने जनावरांचा त्याचा उपयोग होत आहे.पंधरवड्यात पडणार कोरडेउन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विहिरी व हातपंप कोरडे पडत आहेत. अशा स्थितीतही शेततळे व वनतलावातील थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु हा पाणीसाठा जास्तीत जास्त पंधरा दिवसांपर्यंत राहू शकतो. पंधरवड्यानंतर वनतलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणी