शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

शेतकरी ठाम ! माघार घेणार नाहीत, विमानतळाला इंचभरही जमीन देणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:19 IST

Gadchiroli : आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनाला कळविण्यात येतील, अशी ग्वाही तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रस्तावित विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाविरोधात चंद्रपूर मार्गावरील मुरखळा येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने अकराव्या दिवशी तात्पुरते स्थगित झाले. मात्र, लढा सुरूच राहील, माघार घेणार नाहीत, बापजाद्यांनी कमावलेली इंचभरही जमीन देणार नाहीत... या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.

विमानतळासाठी शहराजवळील नवेगाव, मुरखळा, पुलखल, मुडझा बु, व मुडझा तु या गावांमध्ये भूसंपादनाचा घाट घातलेला आहे. ग्रामसभांनी विमानतळाविरोधात ठराव घेतल्यानंतरही प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटीस धाडल्या. त्यामुळे मुरखळाचे शरद ब्राम्हणवाडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी २८ एप्रिलपासून मुरखळा येथे बेमुदत उपोषण सुरू केले. ६ मे पासून शेती बचाव संघर्ष समितीसह महिलांनीही साखळी उपोषण सुरू करून आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, ८ मे रोजी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, माजी पं. स. सभापती मारोतराव इचोडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणताडे, काँग्रेस शहराध्यक्ष सतीश विधाते यांच्यासह तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्या उपस्थितीत सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले. 

१० वर्षापूर्वी विमानतळासाठी चामोर्शी रोडवरील शासकीय विज्ञान कॉलेजलगतच्या झुडपी जंगलाचे सर्वेक्षण झाले होते, तेथेच विमानतळ उभारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणारयावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी विकासाला विरोध नाही, पण झुडपी जंगल असताना सुपीक जमिनीचे अधिग्रहण करणे व्यवहार्य नाही, अशी भूमिका मांडली. आमदार रामदास मसराम यांनी येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे नमूद केले.

जमीन नाही म्हणजे नाही, आजीबाईंनी ठणकावलेआमच्या जमिनी घेणार आणि आम्हाला कुठे पाठविणार, असा सवाल ८० वर्षीय मीरा अर्जुन गेडाम यांनी केला. पोटतिडकीने बोलणाऱ्या आजीबाई पुढे म्हणाल्या, पुराच्या पाण्यात जमिनी गेल्या, तरीही नव्या जोमाने मेहनत करून आम्ही धान पिकवतो. आमच्या जमिनी घेऊन भूमिहीन करणार का, असा प्रश्नही त्यांनी केला. उद्योग, विमानतळ तुम्हाला लखलाभ, पण जमीन मिळणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAirportविमानतळ