शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शेतकऱ्याने लावली धानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:26 IST

रेगडी तलावाचे पाणी न मिळाल्याने धान पीक करपले. प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या तालुक्यातील दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकºयाने आपल्या शेतातील धान पिकालाच आग लावली.

ठळक मुद्दे दोटकुलीतील घटना : चामोर्शी तालुक्यातील धान करपले

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : रेगडी तलावाचे पाणी न मिळाल्याने धान पीक करपले. प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या तालुक्यातील दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील धान पिकालाच आग लावली.दोटकुली हे गाव चामोर्शी तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव आहे. सदर गाव वैनगंगा नदीला लागून आहे. या गावापर्यंत कन्नमवार जलाशयाचा कालवा गेला आहे. मात्र सदर गाव सर्वात शेवटी आहे. त्यामुळे या गावापर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच अनेक ठिकाणी कालवा बुजला असतानाही सिंचन विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दोटकुली गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. कालवा दुरूस्त करावा तसेच पाणी शेवटच्या शेतकऱ्याला पोहोचेल या दृष्टीने नियोजन याबाबत अनेकवेळा निवेदन देऊनही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी दोटकुलीसह घारगाव या गावांमधील अनेक शेतकऱ्यांचे धान पिक करपले. हातात आलेले पाणी करपताना बघून शेतकरी हवालदील झाला आहे. मागील वर्षी तुडतुडा रोगाने धान उद्धवस्त केले तर यावर्षी पाण्याअभावी धान करले. धान रोवणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाण्याअभावी दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकऱ्याचे दोन एकरातील पीक करपले. त्यामुळे निराश झालेल्या साईनाथने उभ्या धानपिकाला आग लावली. ही बाब माहित झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, माजी पं.स. सदस्य प्रमोद भगत, पं. स. सदस्य धर्मशिला सहारे, सरपंच जानकिराम ढोबे, कवलू पुटकमवार, सतीश पुटकमवार, प्रमोद सहारे, नोमजी सातपुते, नरेंद्र पोरटे, मोरोती ढोबे यांनी शेताची पाहणी केली. ढोबे यांच्या शेताजवळीलही शेतकऱ्यांचे धान करपले आहे.चामोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील धानपीक करपले आहे. त्यामुळे चामोर्शी तालुका दुष्काळ घोषित करावा, तसेच शेतकऱ्यांना विहीर बांधून द्यावी, भारनियमनाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfireआग