शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्याने लावली धानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:26 IST

रेगडी तलावाचे पाणी न मिळाल्याने धान पीक करपले. प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या तालुक्यातील दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकºयाने आपल्या शेतातील धान पिकालाच आग लावली.

ठळक मुद्दे दोटकुलीतील घटना : चामोर्शी तालुक्यातील धान करपले

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : रेगडी तलावाचे पाणी न मिळाल्याने धान पीक करपले. प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या तालुक्यातील दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील धान पिकालाच आग लावली.दोटकुली हे गाव चामोर्शी तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव आहे. सदर गाव वैनगंगा नदीला लागून आहे. या गावापर्यंत कन्नमवार जलाशयाचा कालवा गेला आहे. मात्र सदर गाव सर्वात शेवटी आहे. त्यामुळे या गावापर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच अनेक ठिकाणी कालवा बुजला असतानाही सिंचन विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दोटकुली गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. कालवा दुरूस्त करावा तसेच पाणी शेवटच्या शेतकऱ्याला पोहोचेल या दृष्टीने नियोजन याबाबत अनेकवेळा निवेदन देऊनही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी दोटकुलीसह घारगाव या गावांमधील अनेक शेतकऱ्यांचे धान पिक करपले. हातात आलेले पाणी करपताना बघून शेतकरी हवालदील झाला आहे. मागील वर्षी तुडतुडा रोगाने धान उद्धवस्त केले तर यावर्षी पाण्याअभावी धान करले. धान रोवणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाण्याअभावी दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकऱ्याचे दोन एकरातील पीक करपले. त्यामुळे निराश झालेल्या साईनाथने उभ्या धानपिकाला आग लावली. ही बाब माहित झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, माजी पं.स. सदस्य प्रमोद भगत, पं. स. सदस्य धर्मशिला सहारे, सरपंच जानकिराम ढोबे, कवलू पुटकमवार, सतीश पुटकमवार, प्रमोद सहारे, नोमजी सातपुते, नरेंद्र पोरटे, मोरोती ढोबे यांनी शेताची पाहणी केली. ढोबे यांच्या शेताजवळीलही शेतकऱ्यांचे धान करपले आहे.चामोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील धानपीक करपले आहे. त्यामुळे चामोर्शी तालुका दुष्काळ घोषित करावा, तसेच शेतकऱ्यांना विहीर बांधून द्यावी, भारनियमनाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfireआग