शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कारल्यावरील रोगांमुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 01:28 IST

कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे.

लाखो रूपयांचे उत्पादन बुडाले : हजारो रूपयांचे कीटकनाशक फवारूनही रोग आटोक्यात येईना पुरूषोत्तम भागडकर  देसाईगंज कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपये उत्पन्न मिळवून देणारे कारल्याचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने देसाईगंज तालुक्यातील कारले उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. देसाईगंज तालुका गाढवी नदीमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. अर्ध्या भागातील शेतीला इटियाडोह धरणाच्या पाण्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. तर अर्ध्या भागात सिंचनाची सुविधा नसल्याने यातील बहुतांश जमीन कोरडवाहू आहे. काही शेतकरी विहीर, कुपनलिका यांच्या माध्यमातून सिंचन करतात. पारंपरिक धान पिकाला बगल देत किन्हाळा, मोहटोला, डोंगरगाव (हलबी), पोटगाव, विहिरगाव, अरततोंडी, उसेगाव, कुरूड, कोंढाळा आदी गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती करण्यात सुरूवात केली. विशेष करून या भागात कारले पिकाची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नागपूरचे व्यापारी थेट गावी येऊन मालाची उचल करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजारपेठेपर्यंत माल नेण्याचा वेळ व खर्च वाचतो. दिवसेंदिवस कारले पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपयांचे उत्पादन कारले पिकाच्या माध्यमातून होत होते. यावर्षी मात्र वातावरण या पिकाच्या विरोधात आहे. अगदी लागवडीपासूनच कारले पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकरी आपल्या पध्दतीने किटकनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र दिवसेंदिवस कारले पीक रोगांचाच्या गर्तेत सापडत चालला आहे. उत्पादन तर सोडाच कीटकनाशकांवर झालेला हजारो रूपयांचा खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन नाही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुकास्तरावर कृषी विभाग असला तरी या विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या कधीच जाणून घेत नाही. केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे रंगविण्याचे काम या विभागाचे कर्मचारी व अधिकारी करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असतानाही एकाही कृषी सहायकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही. कृषी केंद्र चालक जे कीटकनाशक लिहून देतील, तेच कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, यासाठी शासन अनेक योजना राबविते. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून विविध पिकांचे उत्पादन घेत असतानाही कृषी विभागाचे अधिकारी मात्र त्यांना कोणतेही मार्गदर्शन करीत नसल्याचे विपरित परिस्थिती दिसून येत आहे.