शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कारल्यावरील रोगांमुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 01:28 IST

कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे.

लाखो रूपयांचे उत्पादन बुडाले : हजारो रूपयांचे कीटकनाशक फवारूनही रोग आटोक्यात येईना पुरूषोत्तम भागडकर  देसाईगंज कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपये उत्पन्न मिळवून देणारे कारल्याचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने देसाईगंज तालुक्यातील कारले उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. देसाईगंज तालुका गाढवी नदीमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. अर्ध्या भागातील शेतीला इटियाडोह धरणाच्या पाण्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. तर अर्ध्या भागात सिंचनाची सुविधा नसल्याने यातील बहुतांश जमीन कोरडवाहू आहे. काही शेतकरी विहीर, कुपनलिका यांच्या माध्यमातून सिंचन करतात. पारंपरिक धान पिकाला बगल देत किन्हाळा, मोहटोला, डोंगरगाव (हलबी), पोटगाव, विहिरगाव, अरततोंडी, उसेगाव, कुरूड, कोंढाळा आदी गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती करण्यात सुरूवात केली. विशेष करून या भागात कारले पिकाची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नागपूरचे व्यापारी थेट गावी येऊन मालाची उचल करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजारपेठेपर्यंत माल नेण्याचा वेळ व खर्च वाचतो. दिवसेंदिवस कारले पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपयांचे उत्पादन कारले पिकाच्या माध्यमातून होत होते. यावर्षी मात्र वातावरण या पिकाच्या विरोधात आहे. अगदी लागवडीपासूनच कारले पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकरी आपल्या पध्दतीने किटकनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र दिवसेंदिवस कारले पीक रोगांचाच्या गर्तेत सापडत चालला आहे. उत्पादन तर सोडाच कीटकनाशकांवर झालेला हजारो रूपयांचा खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन नाही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुकास्तरावर कृषी विभाग असला तरी या विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या कधीच जाणून घेत नाही. केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे रंगविण्याचे काम या विभागाचे कर्मचारी व अधिकारी करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असतानाही एकाही कृषी सहायकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही. कृषी केंद्र चालक जे कीटकनाशक लिहून देतील, तेच कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, यासाठी शासन अनेक योजना राबविते. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून विविध पिकांचे उत्पादन घेत असतानाही कृषी विभागाचे अधिकारी मात्र त्यांना कोणतेही मार्गदर्शन करीत नसल्याचे विपरित परिस्थिती दिसून येत आहे.