शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

कारल्यावरील रोगांमुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 01:28 IST

कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे.

लाखो रूपयांचे उत्पादन बुडाले : हजारो रूपयांचे कीटकनाशक फवारूनही रोग आटोक्यात येईना पुरूषोत्तम भागडकर  देसाईगंज कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपये उत्पन्न मिळवून देणारे कारल्याचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने देसाईगंज तालुक्यातील कारले उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. देसाईगंज तालुका गाढवी नदीमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. अर्ध्या भागातील शेतीला इटियाडोह धरणाच्या पाण्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. तर अर्ध्या भागात सिंचनाची सुविधा नसल्याने यातील बहुतांश जमीन कोरडवाहू आहे. काही शेतकरी विहीर, कुपनलिका यांच्या माध्यमातून सिंचन करतात. पारंपरिक धान पिकाला बगल देत किन्हाळा, मोहटोला, डोंगरगाव (हलबी), पोटगाव, विहिरगाव, अरततोंडी, उसेगाव, कुरूड, कोंढाळा आदी गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती करण्यात सुरूवात केली. विशेष करून या भागात कारले पिकाची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नागपूरचे व्यापारी थेट गावी येऊन मालाची उचल करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजारपेठेपर्यंत माल नेण्याचा वेळ व खर्च वाचतो. दिवसेंदिवस कारले पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपयांचे उत्पादन कारले पिकाच्या माध्यमातून होत होते. यावर्षी मात्र वातावरण या पिकाच्या विरोधात आहे. अगदी लागवडीपासूनच कारले पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकरी आपल्या पध्दतीने किटकनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र दिवसेंदिवस कारले पीक रोगांचाच्या गर्तेत सापडत चालला आहे. उत्पादन तर सोडाच कीटकनाशकांवर झालेला हजारो रूपयांचा खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन नाही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुकास्तरावर कृषी विभाग असला तरी या विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या कधीच जाणून घेत नाही. केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे रंगविण्याचे काम या विभागाचे कर्मचारी व अधिकारी करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असतानाही एकाही कृषी सहायकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही. कृषी केंद्र चालक जे कीटकनाशक लिहून देतील, तेच कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, यासाठी शासन अनेक योजना राबविते. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून विविध पिकांचे उत्पादन घेत असतानाही कृषी विभागाचे अधिकारी मात्र त्यांना कोणतेही मार्गदर्शन करीत नसल्याचे विपरित परिस्थिती दिसून येत आहे.