शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मक्याला पाणी देताना घात, वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; शेतात हाेता दबा धरून

By गेापाल लाजुरकर | Updated: March 2, 2025 18:38 IST

गणपूर रै. येथील घटना

चामोर्शी (गडचिराेली) : मका पिकाला पाणी देण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना चामाेर्शी तालुक्याच्या गणपूर रै. येथे शनिवार, १ मार्च राेजी दुपारी चारच्या सुमारास घडली.

संतोष भाऊजी राऊत (वय ४७) गणपूर रै. असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. संताेष राऊत यांनी आपल्या शेतात मक्याची लागवड केलेली आहे. नेहमीप्रमाणे ते पिकाला पाणी लावण्याकरिता शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात गेले हाेते. दरम्यान, शेतातच दबा धरून बसलेल्या वाघाने संतोष यांच्यावर हल्ला करून ठार केले. सायंकाळ हाेऊनही ते घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शेतीच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा शेतातच त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.

परिसरात वाघाच्या पाऊलखुणा हाेत्या. याबाबतची माहिती वन परिक्षेत्र मार्कंडा कं. व चामाेर्शी पाेलिसांना देण्यात आली. वन विभाग व पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुलसिंग टोलिया यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक आझाद, मार्कंडा कं. चे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. इनवते, परविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी वानगे, काेनसरीचे क्षेत्रसहायक आत्राम, गुंडापल्लीचे आर. एल. बानोत करीत आहेत. घटनास्थळी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक अमुल कादबाने दाखल झाले होते.मृत संतोष राऊत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. घरातील कर्ता व्यक्ती कायमचा पडद्याआड झाल्याने कुटुंबावर शाेककळा पसरली आहे. दरम्यान, वनविभागाने ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत राऊत कुटुंबाला दिली, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी आर. बी. इनवते यांनी दिली.

 

टॅग्स :TigerवाघGadchiroliगडचिरोली