शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

गडचिरोलीतील गाव पाटलाचे नऊ जणांचे कुटूंब रात्रीतून रहस्यमरित्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 16:33 IST

धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या भटमरयान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांची मुले, सुना व नातवंडे असे संपूर्ण कुटुंबातील नऊ जण एका रात्रीतून बेपत्ता झाले आहेत.

नक्षल्यांची धमकी की पोलिसांचा जाच? गावकऱ्यांमध्ये तर्कवितर्काला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या भटमरयान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांची मुले, सुना व नातवंडे असे संपूर्ण कुटुंबातील नऊ जण एका रात्रीतून बेपत्ता झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून ते कुठे गेले आहेत आणि कोणत्या अवस्थेत आहेत याची कोणालाच माहिती नसल्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले आहे.शंकर आचला यांची गावात जवळपास ५० एकर शेती आहे. त्यांचा मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासह मानापूर (दे) येथे राहतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्र मांकाचा मुलगा आणि सुनांसह ते भटमरयान येथे राहतात. ५ दिवसांपूर्वी ते आपली दोन्ही विवाहित मुले, दोन सुना, तीन नातवंड आणि पत्नी यांच्यासह घराला कुलूप लावून रात्री गायब झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे पाळीव प्राणीही घराच्या आवारात बेवारस अवस्थेत आहेत. ते असे अचानक कुठे गेले, कशामुळे गेले याबाबत कोणालाच माहिती नाही. गावातील त्यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत आहेत.प्राप्त माहितीनुसार, आचला यांच्याकडे आधी नक्षल्यांचे जाणे-येणे असायचे. त्यातून ८ दिवसांपूर्वीच पोलीस त्यांच्याकडे चौकशीसाठी आले होते. नक्षल्यांबद्दल आम्हाला माहिती द्या, नाहीतर तुमच्या कुटुंबाला नक्षल समर्थक म्हणून अटक करू असा दम पोलिसांनी भरला होता, अशी चर्चा गावात आहे. मात्र यासंदर्भात पोलिसांना विचारले असता आचला हे नक्षल्यांच्या भितीने कुठेतरी गेले असल्याचे ते म्हणाले.

आचला कुटुंबियांना पोलिसांनी नाही तर नक्षल्यांनी धमकावले आहे. त्या भितीतून ते सुरक्षित स्थळी कुठेतरी गेले आहेत. ते नेमके कुठे आहेत याची आम्हालाही माहिती नाही. खरे म्हणजे गावकऱ्यांनीच आचला यांच्याबद्दल नक्षल्यांचे कान भरले आहेत. त्यामुळे त्या कुटुंबियांवर ही वेळ आली आहे.- रणजित पाटीलउपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा

टॅग्स :naxaliteनक्षलवादी