शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

देसाईगंज तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:37 IST

देसाईगंज : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना शहरात व तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शक ...

देसाईगंज : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना शहरात व तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याने शहरात ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

व्यापारीदृष्ट्या देसाईगंज शहर हे तालुक्यातील अति महत्त्वाचे शहर आहे. तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यातील नागरिक खरेदी, विक्रीच्या संबंधाने देसाईगंज शहरात अवागमन करीत आहेत. सध्या सर्वच व्यापार उद्दीम ज्या ठिकाणाहून चालओ. ते नागपूर शहर हे कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरलेले आहे. दररोज त्या ठिकाणाहून भाजीपालापासून अनेक ट्रान्सपोर्टने माल देसाईगंजात पोहोचत आहे. शहरातील मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, गुजरी बाजार, बसस्टॉप परिसर या ठिकाणी विद्यार्थीवर्गापासून, तर आबाल वृद्धापर्यंत तोबा गर्दी होताना दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या कालावधीत एखाद्याची मयत झाल्यासही २० पेक्षा अधिक नागरिकांना अंत्यविधीला उपस्थित राहता येणार नाही. लग्न संभारंभात ५० पेक्षा अधिक नागरिकांना भाग घेता येणार नाही. मास्कचा वापर केल्याशिवाय दुकानात प्रवेश घेता येणार नाही. खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य केले आहे. मात्र, देसाईगंज तालुक्यात नियम धाब्यावर बसवत लग्नकार्य, सामूहीक भोजनाचे कार्यक्रम, अंत्यविधीला शेकडो नागरिकांची उपस्थिती हे प्रकार सुरु आहेत. प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून हे सगळे बघत आहे.

जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाला मार्गदर्शक नियमावली देऊनही त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. नागरिक नियमांना बगल देत स्वैरपणे वागत असल्याने शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.