शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरकल व चकीनगट्टात सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

अहेरी-भामरागड मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर मिरकल व चकीनगट्टा हे गावे आहेत. या गावांचा समावेश मेडपल्ली ग्राम पंचायतमध्ये होतो. दोन्ही गावात जवळपास दीडशे घरे असून ६०० च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे.

ठळक मुद्देमूलभूत सोयींचा अभाव : रस्ते, आरोग्य, शिक्षण, कव्हरेजची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मिरकल व चकीनगट्टा गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. हे दोन्ही गावे नक्षलग्रस्त असल्याने या गावांचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अहेरी-भामरागड मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर मिरकल व चकीनगट्टा हे गावे आहेत. या गावांचा समावेश मेडपल्ली ग्राम पंचायतमध्ये होतो. दोन्ही गावात जवळपास दीडशे घरे असून ६०० च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे. घनदाट जंगलातून पायवाटेने नागरिकांना आवागमन करावे लागते. भरपूर दाट जंगल असल्याने हिंस्त्र पशुंपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही गावाच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.जंगलव्याप्त परिसर असल्याने अनेक भागात वीज पुरवठा नेहमी खंडित होतो. अनेकदा दोन ते तीन दिवस पूर्ववत होत नाही. मिरकल येथे जिल्हा परिषद शाळा आहे. परंतु येथे मोजकेच विद्यार्थी असल्याने शिक्षकही नियमित येत नाही. आरोग्य, शिक्षण व अन्य सोयीसुविधांसाठी नागरिकांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीदरम्यान राजकीय नेते गावकऱ्यांना विकासकामांचे आश्वासन देतात परंतु निवडणुकीनंतर आश्वासन पाळत नाही. रूग्णांना रूग्णालयात नेण्याकरिता अहेरी-भामरागड या मुख्य मार्गावर यावे लागते. त्यानंतर येथून बस किंवा खासगी वाहनांच्या सहाय्याने रूग्णालय गाठून उपचार घ्यावा लागतो. या भागात भ्रमणध्वनी कव्हरेजचाही अभाव असल्याने नागरिक समस्याग्रस्त जीवन जगत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास