शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

पाणलोटच्या कामांवर ५४ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाते. जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होत असतो. या निधीतून पाणलोटाची कामे केली जाते.

ठळक मुद्देबोडी, बंधारा व मजगीतून सिंचन सुविधा : कृषी विभागाकडून गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १९८० च्या वनकायद्यान्वये जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे शासनाच्या सिंचन विकासाच्या विविध योजनेतून शेती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मजगी, बोडी नूतनीकरण, मातीनाला बांध, वळण बंधारा आदींच्या कामावर दोन वर्षात एकूण ५४ लाख ८३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाते. जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होत असतो. या निधीतून पाणलोटाची कामे केली जाते.जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून सन २०१८-१९ या वर्षात गडचिरोली तालुक्यात एक, मुलचेरा तालुक्यात एक व आरमोरी तालुक्यात दोन अशी पाणलोटाची एकूण चार कामे करण्यात आली. या कामांवर ३६.५७ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील कामांवर ९.८६ लाख, मुलचेरातील ८ लाख ४४ हजार व आरमोरीतील दोन कामांवर १८.२७ लाख रुपयांचा खर्च प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.सन २०१९-२० या वर्षात केवळ सिरोंचा तालुक्यात पाणलोटाची दोन कामे करण्यात आली. या कामांवर १८.२६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. सन २०१८-१९ व २०१९-२० हे दोन वर्ष मिळून एकूण पाणलोटांच्या कामावर ५४.८३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.पाणलोट क्षेत्रातील जमिनीचा उपयोग सध्या कसा केला जात आहे, याचा अभ्यास करणे व जमिनीच्या उपयोगीता क्षमतेनुसार भविष्यात जमिनीचा उपयोग कसा करावा, याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. जमिनीच्या होणाऱ्या उपयोगावर, त्यावर घेतली जाणारी पीक, पीक लागवडीची पद्धत यावर त्या पाणलोट क्षेत्रातील पाणलोटाचा वापर जलअंत:सरण व निचरा अवलंबून असतो. जमिनीची होणारी धूप, धुपेचा प्रकार, धुपेची तीव्रता देखील काही प्रमाणात यावरून ठरत असते. पाणलोटाची कामे झालेल्या क्षेत्रात पावसाचे पाणी अधिकाधिक जिरविले जाते. त्यामुळे जमिनीची जलधारणा व निचरा, सुपिकता वाढत असते. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणलोट विकासाच्या कामातून शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढली असून याचा फायदा विविध पीक घेण्यासाठी होत आहे.अखर्चीत ४३ लाखांचा निधी डीपीसीकडे वळतागतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०१९-२० मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी उपयोजनेतून ९८.६४ लाख रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला. या निधीमधून मजगी, बोडी नूतनीकरण, माती नाला बांध, वळण बंधारा आदी जलसंधारणाची कामे ३६ पाणलोटात करण्यात आली. या कामांवर ५४.८३ लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र उर्वरित निधी ई टेंडरींग प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे तसेच गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा निधी खर्च करता आला नाही. परिणामी अखर्चीत ४३.८१ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे समर्पित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.धडक सिंचन विहिर योजनेतून भाजीपाल्याची लागवडशासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना व धडक सिंचन विहीर योजनेतून शेतकºयांना अनुदानावर सिंचन विहिरीचा लाभ दिला जातो. गडचिरोली, चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील बºयाच शेतकºयांनी सदर दोन्ही योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेतला. सिंचन विहिरीवर मोटारपंप बसवून या माध्यमातून आता रबी हंगामात भाजीपाला पिकाची लागवड करणे शेतकºयाने सुरू केले आहे. सद्य:स्थितीत गडचिरोली, चामोर्शी शहरातील दैनंदिन गुजरी बाजारात शेतकºयांच्या शेतातूनच भाजीपाल्याची आवक होत आहे. पूर्वी हा सर्व भाजीपाला नागपूर शहरातून वाहनाद्वारे आणला जात होता. वैरागड परिसरातही पालेभाज्यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक