शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अर्थ व वनमंत्र्यांकडून जिल्हावासीयांना अपेक्षा

By admin | Updated: November 4, 2014 22:39 IST

गडचिरोली या अतिमागास जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकच गडचिरोली जिल्ह्यात घेतली जावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना राज्याचे अर्थ व वनमंत्री

जनतेची मागणी : जिल्ह्यात मंत्रिमंडळाची बैठक व्हावीगडचिरोली : गडचिरोली या अतिमागास जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकच गडचिरोली जिल्ह्यात घेतली जावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आहे. गडचिरोली जिल्हा हा राज्यात विकासाच्याबाबत आजही इतर जिल्ह्याच्या तुलनेत ३० वर्ष मागे आहे. या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष १०० टक्क्यावर आहे. उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यात ४७ टक्क्यावर असलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. तसेच १२०० वर अधिक गावांमध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे गैरआदिवासी समाजाच्या नोकरीचे मार्ग बंद झाले आहे. गेल्या ४० वर्षांपासून काँग्रे्रस सरकार वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्नही सोडवू शकलेले नाही. २००८ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भामरागडवासीयांना पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. वनकायद्याच्या अडचणीमुळे ५ ते ७ मोठे व २० लहान सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्नही रखडलेला आहे. मागील पाच वर्षात आर. आर. पाटील यांच्या रूपाने जबाबदार व वजनदार पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला. मात्र त्यांना विकासाची प्रक्रिया गतिमान करता आली नाही. केवळ अधिकाऱ्यांचेच कीर्तन ऐकण्यात आर. आर. पाटील यांचा संपूर्ण कार्यकाळ निघून गेला. त्यामुळे आता भाजपप्रणित नव्या सरकारकडून गडचिरोली जिल्हावासीयांना मोठी आशा आहे. सुधीर मुनगंटीवार हे आक्रमक राजकीय नेते आहेत व दिलेला शब्द पाळणारे राजकीय नेते, अशी त्यांची ओळख आहे. गडचिरोली या मागास जिल्ह्याच्या सिंचन, रेल्वे, उद्योग व इतर महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी गडचिरोलीत नागपूर अधिवेशनाच्या काळात संपूर्ण मंत्रीमंडळाची एक साप्ताहिक बैठक व्हायला हवी, अशी मागणी या भागातील जनतेसह राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)