शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
6
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
7
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
8
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
9
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
10
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
11
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
12
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
13
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
14
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
15
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
16
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
17
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
18
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
19
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
20
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार

अर्थ व वनमंत्र्यांकडून जिल्हावासीयांना अपेक्षा

By admin | Updated: November 4, 2014 22:39 IST

गडचिरोली या अतिमागास जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकच गडचिरोली जिल्ह्यात घेतली जावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना राज्याचे अर्थ व वनमंत्री

जनतेची मागणी : जिल्ह्यात मंत्रिमंडळाची बैठक व्हावीगडचिरोली : गडचिरोली या अतिमागास जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकच गडचिरोली जिल्ह्यात घेतली जावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आहे. गडचिरोली जिल्हा हा राज्यात विकासाच्याबाबत आजही इतर जिल्ह्याच्या तुलनेत ३० वर्ष मागे आहे. या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष १०० टक्क्यावर आहे. उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यात ४७ टक्क्यावर असलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. तसेच १२०० वर अधिक गावांमध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे गैरआदिवासी समाजाच्या नोकरीचे मार्ग बंद झाले आहे. गेल्या ४० वर्षांपासून काँग्रे्रस सरकार वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्नही सोडवू शकलेले नाही. २००८ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भामरागडवासीयांना पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. वनकायद्याच्या अडचणीमुळे ५ ते ७ मोठे व २० लहान सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्नही रखडलेला आहे. मागील पाच वर्षात आर. आर. पाटील यांच्या रूपाने जबाबदार व वजनदार पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला. मात्र त्यांना विकासाची प्रक्रिया गतिमान करता आली नाही. केवळ अधिकाऱ्यांचेच कीर्तन ऐकण्यात आर. आर. पाटील यांचा संपूर्ण कार्यकाळ निघून गेला. त्यामुळे आता भाजपप्रणित नव्या सरकारकडून गडचिरोली जिल्हावासीयांना मोठी आशा आहे. सुधीर मुनगंटीवार हे आक्रमक राजकीय नेते आहेत व दिलेला शब्द पाळणारे राजकीय नेते, अशी त्यांची ओळख आहे. गडचिरोली या मागास जिल्ह्याच्या सिंचन, रेल्वे, उद्योग व इतर महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी गडचिरोलीत नागपूर अधिवेशनाच्या काळात संपूर्ण मंत्रीमंडळाची एक साप्ताहिक बैठक व्हायला हवी, अशी मागणी या भागातील जनतेसह राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)