शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

३४ बोअरवेलचे खोदकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे.

ठळक मुद्देअहेरी नगर पंचायत : ४२ लाखांच्या निधीतून विविध वॉर्डांमध्ये पाण्याची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरातील विविध भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होत असे. नागरिक सकाळपासूनच जलस्त्रोतांवर पाण्याकरिता गर्दी करायचे. पाणी संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने शहरातील विविध वॉर्डात एकूण ३४ बोअरवेलच्या खोदकामास सुरूवात झाली आहे. ४२ लाख रूपयांच्या खर्चातून नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात येत आहे.अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. गेल्या आठ दिवसांत २० बोअरवेलचे खोदकाम झाले. उर्वरित बोअरवेलचे खोदकाम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. एकाचवेळी संपूर्ण शहरातील विविध भागात एवढ्या संख्येने बोअरवेलचे खोदकाम करणारी अहेरी ही राज्यातील पहिलीच नगर पंचायत आहे.१७ प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. नगर पंचायत हद्दीत समाविष्ट असलेल्या गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी तिन्ही गावात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण व्हायची. फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. येथील नागरिकांना गावालगतच्या नाल्यावरून पाणी आणावे लागत असे. अनेक दिवसांपासून नागरिकांनी बोअरवेल खोदकाम करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन या ठिकाणी बोअरवेलचे खोदकाम होत असल्याने नागरिकांची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.अहेरी शहरातील अनेक वॉर्डांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने अनेक दिवसांपासून पुढाकार घेतला. परंतु पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील कामे रखडली. अनेक कामे विचाराधीन आहेत. परंतु आता शहरातील मूलभूत समस्या प्राधान्याने लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल.- हर्षा ठाकरे, नगराध्यक्ष, नगर पंचायत अहेरी

टॅग्स :water shortageपाणीकपात