शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

३४ बोअरवेलचे खोदकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे.

ठळक मुद्देअहेरी नगर पंचायत : ४२ लाखांच्या निधीतून विविध वॉर्डांमध्ये पाण्याची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरातील विविध भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होत असे. नागरिक सकाळपासूनच जलस्त्रोतांवर पाण्याकरिता गर्दी करायचे. पाणी संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने शहरातील विविध वॉर्डात एकूण ३४ बोअरवेलच्या खोदकामास सुरूवात झाली आहे. ४२ लाख रूपयांच्या खर्चातून नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात येत आहे.अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. गेल्या आठ दिवसांत २० बोअरवेलचे खोदकाम झाले. उर्वरित बोअरवेलचे खोदकाम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. एकाचवेळी संपूर्ण शहरातील विविध भागात एवढ्या संख्येने बोअरवेलचे खोदकाम करणारी अहेरी ही राज्यातील पहिलीच नगर पंचायत आहे.१७ प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. नगर पंचायत हद्दीत समाविष्ट असलेल्या गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी तिन्ही गावात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण व्हायची. फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. येथील नागरिकांना गावालगतच्या नाल्यावरून पाणी आणावे लागत असे. अनेक दिवसांपासून नागरिकांनी बोअरवेल खोदकाम करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन या ठिकाणी बोअरवेलचे खोदकाम होत असल्याने नागरिकांची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.अहेरी शहरातील अनेक वॉर्डांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने अनेक दिवसांपासून पुढाकार घेतला. परंतु पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील कामे रखडली. अनेक कामे विचाराधीन आहेत. परंतु आता शहरातील मूलभूत समस्या प्राधान्याने लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल.- हर्षा ठाकरे, नगराध्यक्ष, नगर पंचायत अहेरी

टॅग्स :water shortageपाणीकपात