शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

३४ बोअरवेलचे खोदकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे.

ठळक मुद्देअहेरी नगर पंचायत : ४२ लाखांच्या निधीतून विविध वॉर्डांमध्ये पाण्याची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरातील विविध भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होत असे. नागरिक सकाळपासूनच जलस्त्रोतांवर पाण्याकरिता गर्दी करायचे. पाणी संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने शहरातील विविध वॉर्डात एकूण ३४ बोअरवेलच्या खोदकामास सुरूवात झाली आहे. ४२ लाख रूपयांच्या खर्चातून नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात येत आहे.अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. गेल्या आठ दिवसांत २० बोअरवेलचे खोदकाम झाले. उर्वरित बोअरवेलचे खोदकाम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. एकाचवेळी संपूर्ण शहरातील विविध भागात एवढ्या संख्येने बोअरवेलचे खोदकाम करणारी अहेरी ही राज्यातील पहिलीच नगर पंचायत आहे.१७ प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. नगर पंचायत हद्दीत समाविष्ट असलेल्या गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी तिन्ही गावात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण व्हायची. फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. येथील नागरिकांना गावालगतच्या नाल्यावरून पाणी आणावे लागत असे. अनेक दिवसांपासून नागरिकांनी बोअरवेल खोदकाम करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन या ठिकाणी बोअरवेलचे खोदकाम होत असल्याने नागरिकांची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.अहेरी शहरातील अनेक वॉर्डांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने अनेक दिवसांपासून पुढाकार घेतला. परंतु पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील कामे रखडली. अनेक कामे विचाराधीन आहेत. परंतु आता शहरातील मूलभूत समस्या प्राधान्याने लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल.- हर्षा ठाकरे, नगराध्यक्ष, नगर पंचायत अहेरी

टॅग्स :water shortageपाणीकपात