शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सुकाळ्याचा खोदतलाव फुटला

By admin | Updated: May 27, 2015 01:43 IST

जिल्हा वार्षिक योजनेतून वन्य पशुसंवर्धन निसर्ग संरक्षण योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात वडसा वन विभागात उपक्षेत्र वैरागड नियत क्षेत्र सुकाळा येथे ...

नैसर्गिक स्रोत आटले : वन्यप्राण्यांची लोकवस्तीकडे धाववैरागड : जिल्हा वार्षिक योजनेतून वन्य पशुसंवर्धन निसर्ग संरक्षण योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात वडसा वन विभागात उपक्षेत्र वैरागड नियत क्षेत्र सुकाळा येथे कक्ष क्र. ४५ मध्ये वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात तहाण भागविण्यासाठी खोदतळी बांधण्यात आली. पण १० दिवसांपूर्वी झालेल्या अकाली पावसामुळे हे खोदतळे बुजून गेले आहे. या खोदतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याला जागोजागी तडा गेल्या आहे. सभोवताल लावण्यात आलेले दगडाचे बांधही निघून गेले आहे. यात पाणी साठवणे कठीण झाले आहे. मे महिन्याच्या प्रारंभापासून वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले असून वन विभागाने तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यातदेखील पाण्याचा ठणठणात असल्यामुळे तहानलेले वन्यप्राणी लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. त्यातून ठिकठिकाणी प्राण्यांच्या शिकारीचा डाव साधल्या जात आहे.आरमोरी तालुक्यातील शिवणीच्या बांधावर रात्री तहान भागविण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांवर सापळे रचून शिकारीच्या घटना होत आहेत. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. तेंदू गोळा करणाऱ्या लोकांची जंगलात चौफेर गर्दी सुरू झाली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी भयभीत झाले असून मोकळ्या जागांकडे किंवा गावांकडे त्यांची धाव वाढली आहे. यातूनच प्राण्यांची शिकार होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. येत्या काही दिवसात बदल्यांचा सत्र वन विभागात सुरू होणार असल्याने अनेक अधिकारी, कर्मचारी याच कामात गुंतलेले आहेत. (वार्ताहर)