शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

टमाट्यांचे दर पाहून सर्वसामान्यांचे डोळे लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:52 IST

आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला. मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण चंद्रपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले.

ठळक मुद्दे८० ते १०० रुपये किलो : चंद्रपूर शहरातील लॉकडाऊनचा परिणाम, मागणीच्या तुलनेत आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मागील १५ दिवसांपासून टमाटेसह इतर पालेभाज्यांचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लाल होत आहेत. आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला.मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण चंद्रपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. परिणामी दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी येथील बाजारात चंद्रपूरच्या बाजारातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणल्या जातो. मात्र चंद्रपूर शहर लॉकडाऊन झाल्याने शुक्रवारी येथील बाजारात टमाट्याची आवक पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. परिणामी एकाही विक्रेत्याने प्रती किलो ८० रुपयांच्या खाली टमाटे विकले नाही. आजुबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांकडील भाजीपाला बाजारात आणण्यात आला. परिणामी पालेभाज्यांचेही भाव वाढले होते. चंद्रपूर शहरातील बाजारपेठ ३१ जुलैपर्यंत पूर्णत: बंद राहिल्यास आष्टी येथील बाजारात टमाटेचे भाव १२५ ते १५० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आष्टीच्या बाजारात चंद्रपूरच्या ठोक मार्केटमधून भाजीपाल्याची आवक दर आठवड्याला होत असते. मात्र तिथून आवक बंद झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत.चामोर्शी शहरात भरणाऱ्या दैनंदिन गुजरी बाजारातही गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव वधारलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून आवक बंद झाली आहे.गडचिरोलीतील गुजरी महागलीकोरोना लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गडचिरोली शहर व जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ दर रविवारला कडकडीत बंद असते. परिणामी गडचिरोलीच्या दैनंदिन गुजरी बाजारात शुक्रवारी व शनिवारला ग्राहकांची भाजीपाला खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथे भाजीपाल्याचे भाव वधारलेले असतात. १७ जुलै रोजी शुक्रवारला येथील दैनंदिन गुजरी बाजारात टमाटे ८० रुपये किलो दराने विकले जात होते. वांगे ४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये किलो, कोबी ८० रुपये किलो, आलू ४० रुपये किलो, कारले ८० रुपये किलो, चवळी शेंगा ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत. पालक, मेथी, चवळी, भाजी व कोथिंबीरचे भावही वाढले होते.

टॅग्स :vegetableभाज्याcorona virusकोरोना वायरस बातम्या