शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

टमाट्यांचे दर पाहून सर्वसामान्यांचे डोळे लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:52 IST

आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला. मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण चंद्रपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले.

ठळक मुद्दे८० ते १०० रुपये किलो : चंद्रपूर शहरातील लॉकडाऊनचा परिणाम, मागणीच्या तुलनेत आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मागील १५ दिवसांपासून टमाटेसह इतर पालेभाज्यांचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लाल होत आहेत. आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला.मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण चंद्रपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. परिणामी दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी येथील बाजारात चंद्रपूरच्या बाजारातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणल्या जातो. मात्र चंद्रपूर शहर लॉकडाऊन झाल्याने शुक्रवारी येथील बाजारात टमाट्याची आवक पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. परिणामी एकाही विक्रेत्याने प्रती किलो ८० रुपयांच्या खाली टमाटे विकले नाही. आजुबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांकडील भाजीपाला बाजारात आणण्यात आला. परिणामी पालेभाज्यांचेही भाव वाढले होते. चंद्रपूर शहरातील बाजारपेठ ३१ जुलैपर्यंत पूर्णत: बंद राहिल्यास आष्टी येथील बाजारात टमाटेचे भाव १२५ ते १५० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आष्टीच्या बाजारात चंद्रपूरच्या ठोक मार्केटमधून भाजीपाल्याची आवक दर आठवड्याला होत असते. मात्र तिथून आवक बंद झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत.चामोर्शी शहरात भरणाऱ्या दैनंदिन गुजरी बाजारातही गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव वधारलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून आवक बंद झाली आहे.गडचिरोलीतील गुजरी महागलीकोरोना लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गडचिरोली शहर व जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ दर रविवारला कडकडीत बंद असते. परिणामी गडचिरोलीच्या दैनंदिन गुजरी बाजारात शुक्रवारी व शनिवारला ग्राहकांची भाजीपाला खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथे भाजीपाल्याचे भाव वधारलेले असतात. १७ जुलै रोजी शुक्रवारला येथील दैनंदिन गुजरी बाजारात टमाटे ८० रुपये किलो दराने विकले जात होते. वांगे ४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये किलो, कोबी ८० रुपये किलो, आलू ४० रुपये किलो, कारले ८० रुपये किलो, चवळी शेंगा ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत. पालक, मेथी, चवळी, भाजी व कोथिंबीरचे भावही वाढले होते.

टॅग्स :vegetableभाज्याcorona virusकोरोना वायरस बातम्या