शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
2
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
3
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
4
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
5
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
6
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
7
New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
8
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
9
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
10
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
11
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
12
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
13
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
14
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
15
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
16
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
17
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने
18
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
19
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
20
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:40 IST

सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षांचे आवाहन : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही पंधरवाड्यानिमित्त जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी भुषविले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. पडघन, प्रा. नरेंद्र आरेकर, संजय नाकाडे, श्रीराम लहाने, संध्या येलेकर, विजया मने आदी उपस्थित होते.पुढे बोलताना भांडेकर म्हणाल्या, आपल्या लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीच्या मताला सारखेच महत्त्व आहे. राष्ट्रपतीच्या मताएवढेच मूल्य सामान्य नागरिकांच्या मतालाही आहे. आमच्या मताच्या माध्यमातून आपल्या पसंतीचे उमेदवार संसद व विधानसभेत पाठवू शकतो. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविताना कोणावरही अन्याय न होता, लाभार्थ्यांच्या दारापर्यंत योजना पोहोचतील, अशी यंत्रणा आपण लोकशाहीत तयार केली. मुलगा जन्माला आल्याबरोबर त्याची नोंद ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका येथे होते. तसेच प्रत्येक मुलगा १८ वर्षाचा झाल्याबरोबर मतदान कार्ड त्याच्या घरी पोहोचेल, अशी व्यवस्था होणे काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले.डॉ. संजय नाकाडे यांनी लोकशाहीत जनता मालक आहे. काम करणारी प्रशासकीय यंत्रणा सेवक आहे. परंतु सेवकांकडूनच मालकांना प्रशिक्षण देण्याचे, जागृत करण्याची गरज का भासावी, याचे आश्चर्य वाटते. निवडणूक आचार संहिता लागू करून निवडणुका कशा पारदर्शी पार पाडता येईल, याकडे विशेष लक्ष दिल्याने आज बऱ्यापैकी सुधारणा झाल्या आहेत. मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित राहू नये, असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. नरेंद्र आरेकर, श्रीराम लहाने, संध्या येलेकर, विजया मने यांनीही विचार मांडले. संचालन व आभार नायब तहसीलदार सुनील चडगुलवार यांनी मानले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद