शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:40 IST

सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षांचे आवाहन : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही पंधरवाड्यानिमित्त जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी भुषविले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. पडघन, प्रा. नरेंद्र आरेकर, संजय नाकाडे, श्रीराम लहाने, संध्या येलेकर, विजया मने आदी उपस्थित होते.पुढे बोलताना भांडेकर म्हणाल्या, आपल्या लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीच्या मताला सारखेच महत्त्व आहे. राष्ट्रपतीच्या मताएवढेच मूल्य सामान्य नागरिकांच्या मतालाही आहे. आमच्या मताच्या माध्यमातून आपल्या पसंतीचे उमेदवार संसद व विधानसभेत पाठवू शकतो. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविताना कोणावरही अन्याय न होता, लाभार्थ्यांच्या दारापर्यंत योजना पोहोचतील, अशी यंत्रणा आपण लोकशाहीत तयार केली. मुलगा जन्माला आल्याबरोबर त्याची नोंद ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका येथे होते. तसेच प्रत्येक मुलगा १८ वर्षाचा झाल्याबरोबर मतदान कार्ड त्याच्या घरी पोहोचेल, अशी व्यवस्था होणे काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले.डॉ. संजय नाकाडे यांनी लोकशाहीत जनता मालक आहे. काम करणारी प्रशासकीय यंत्रणा सेवक आहे. परंतु सेवकांकडूनच मालकांना प्रशिक्षण देण्याचे, जागृत करण्याची गरज का भासावी, याचे आश्चर्य वाटते. निवडणूक आचार संहिता लागू करून निवडणुका कशा पारदर्शी पार पाडता येईल, याकडे विशेष लक्ष दिल्याने आज बऱ्यापैकी सुधारणा झाल्या आहेत. मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित राहू नये, असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. नरेंद्र आरेकर, श्रीराम लहाने, संध्या येलेकर, विजया मने यांनीही विचार मांडले. संचालन व आभार नायब तहसीलदार सुनील चडगुलवार यांनी मानले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद