शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:40 IST

सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षांचे आवाहन : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही पंधरवाड्यानिमित्त जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी भुषविले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. पडघन, प्रा. नरेंद्र आरेकर, संजय नाकाडे, श्रीराम लहाने, संध्या येलेकर, विजया मने आदी उपस्थित होते.पुढे बोलताना भांडेकर म्हणाल्या, आपल्या लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीच्या मताला सारखेच महत्त्व आहे. राष्ट्रपतीच्या मताएवढेच मूल्य सामान्य नागरिकांच्या मतालाही आहे. आमच्या मताच्या माध्यमातून आपल्या पसंतीचे उमेदवार संसद व विधानसभेत पाठवू शकतो. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविताना कोणावरही अन्याय न होता, लाभार्थ्यांच्या दारापर्यंत योजना पोहोचतील, अशी यंत्रणा आपण लोकशाहीत तयार केली. मुलगा जन्माला आल्याबरोबर त्याची नोंद ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका येथे होते. तसेच प्रत्येक मुलगा १८ वर्षाचा झाल्याबरोबर मतदान कार्ड त्याच्या घरी पोहोचेल, अशी व्यवस्था होणे काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले.डॉ. संजय नाकाडे यांनी लोकशाहीत जनता मालक आहे. काम करणारी प्रशासकीय यंत्रणा सेवक आहे. परंतु सेवकांकडूनच मालकांना प्रशिक्षण देण्याचे, जागृत करण्याची गरज का भासावी, याचे आश्चर्य वाटते. निवडणूक आचार संहिता लागू करून निवडणुका कशा पारदर्शी पार पाडता येईल, याकडे विशेष लक्ष दिल्याने आज बऱ्यापैकी सुधारणा झाल्या आहेत. मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित राहू नये, असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. नरेंद्र आरेकर, श्रीराम लहाने, संध्या येलेकर, विजया मने यांनीही विचार मांडले. संचालन व आभार नायब तहसीलदार सुनील चडगुलवार यांनी मानले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद