शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कंबलपेठातील कुक्कुटपालन केंद्र हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

कंबलपेठा गावाच्या जवळच व्यावसायिकाने कुकुटपालन केंद्राची इमारत बांधून या ठिकाणी कुक्कुटपालन सुरू केले. कुक्कुटपालन केंद्रातील दुर्गंधी गावातील नागरिकांना असहय्य होत होती. अनेक नागरिकांच्या प्रकृती बिघडल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी या गावातील २० पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती बिघडल्याने गावातच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. कुक्कुटपालन केंद्र हटवावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देपाठपुराव्याला यश : अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील कंबलपेठा गावाजवळ असलेले कुक्कुटपालन केंद्र हटवावे, असे निर्देश अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे येथील कुकुटपालन केंद्राबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.कंबलपेठा गावाच्या जवळच व्यावसायिकाने कुकुटपालन केंद्राची इमारत बांधून या ठिकाणी कुक्कुटपालन सुरू केले. कुक्कुटपालन केंद्रातील दुर्गंधी गावातील नागरिकांना असहय्य होत होती. अनेक नागरिकांच्या प्रकृती बिघडल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी या गावातील २० पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती बिघडल्याने गावातच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. कुक्कुटपालन केंद्र हटवावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे केली. तसेच लोकमतनेही वृत्त प्रकाशित करून सदर कुक्कुटपालन केंद्र कसे घातक आहे, याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.अहेरीचे उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वत: १२ नोव्हेंबर रोजी कंबलपेठा येथे जाऊन पाहणी केली. गावात पोहोचताच दुर्गंधी येण्यास सुरूवात झाली. स्वत: गुप्ता यांनी नाकावर रूमाल ठेवून गावातील नागरिकांशी चर्चा केली तसेच परिस्थितीची पाहणी केली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांनी सदर कुकुटपालन केंद्र ठेवण्याचे निर्देश कुकुटपालन मालकाला दिले आहेत. याबाबतचे पत्र गुरूवारी निर्गमित केले आहे.अंकिसा येथील व्यंकटेश्वर येनगंटी यांनी पदाचा दुरूपयोग करून गावाजवळ कुकुटपालन केंद्र उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविले. वीज जोडणीही करवून घेतली. मात्र नागरिकांच्या विरोधानंतर आता कुक्कुटपालन केंद्र बंद पाडावे लागणार आहे.