शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अखेर कंबलपेठातील कुक्कुटपालन केंद्र हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

कंबलपेठा गावाच्या जवळच व्यावसायिकाने कुकुटपालन केंद्राची इमारत बांधून या ठिकाणी कुक्कुटपालन सुरू केले. कुक्कुटपालन केंद्रातील दुर्गंधी गावातील नागरिकांना असहय्य होत होती. अनेक नागरिकांच्या प्रकृती बिघडल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी या गावातील २० पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती बिघडल्याने गावातच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. कुक्कुटपालन केंद्र हटवावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देपाठपुराव्याला यश : अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील कंबलपेठा गावाजवळ असलेले कुक्कुटपालन केंद्र हटवावे, असे निर्देश अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे येथील कुकुटपालन केंद्राबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.कंबलपेठा गावाच्या जवळच व्यावसायिकाने कुकुटपालन केंद्राची इमारत बांधून या ठिकाणी कुक्कुटपालन सुरू केले. कुक्कुटपालन केंद्रातील दुर्गंधी गावातील नागरिकांना असहय्य होत होती. अनेक नागरिकांच्या प्रकृती बिघडल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी या गावातील २० पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती बिघडल्याने गावातच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. कुक्कुटपालन केंद्र हटवावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे केली. तसेच लोकमतनेही वृत्त प्रकाशित करून सदर कुक्कुटपालन केंद्र कसे घातक आहे, याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.अहेरीचे उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वत: १२ नोव्हेंबर रोजी कंबलपेठा येथे जाऊन पाहणी केली. गावात पोहोचताच दुर्गंधी येण्यास सुरूवात झाली. स्वत: गुप्ता यांनी नाकावर रूमाल ठेवून गावातील नागरिकांशी चर्चा केली तसेच परिस्थितीची पाहणी केली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांनी सदर कुकुटपालन केंद्र ठेवण्याचे निर्देश कुकुटपालन मालकाला दिले आहेत. याबाबतचे पत्र गुरूवारी निर्गमित केले आहे.अंकिसा येथील व्यंकटेश्वर येनगंटी यांनी पदाचा दुरूपयोग करून गावाजवळ कुकुटपालन केंद्र उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविले. वीज जोडणीही करवून घेतली. मात्र नागरिकांच्या विरोधानंतर आता कुक्कुटपालन केंद्र बंद पाडावे लागणार आहे.