ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई : दमट वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भावगडचिरोली : पावसाळ्याला सुरूवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे व जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. त्याचप्रमाणे यावर्षीही दुसऱ्या आठवड्यात तब्बल चार दिवस पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारली आहे. उन्हाळ्याप्रमाणे दिवसा कडक ऊन पडत आहे. परिणामी पहिल्या पावसामुळे तलाव, नदी, नाले यांच्यामध्ये साचलेले पाणी पूर्णपणे आटले आहे. उन्हाळ्याप्रमाणेच हे सर्व जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ४८२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद सरकारदप्तरी करण्यात आली आहे. एकूण पावसाच्या हे प्रमाण २५ टक्के असल्याने सर्व आलबेल असल्याची नोंद सरकार दप्तरी झाली आहे. मात्र प्रत्यक्षात हा पाऊस केवळ चार दिवसांचा असून त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे संपूर्ण खरीप पिके धोक्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबारपेरणीलाही सुरूवात केली आहे. रोवणींचे कामे पूर्णपणे ठप्प पडली असून शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)डिझेल इंजिनने पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्नभामरागड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेताजवळ पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी डिझेल इंजिन, विद्युत मोटारपंपाचा वापर करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच प्रचंड प्रमाणात डिझेल इंजिनचा वापर केला जात असल्याचे चित्र भामरागड तालुक्यात बघायला मिळत आहे.पावसासाठी आरमोरीत देवाला साकडेजिल्ह्यात भरपूर पाऊस पडावा यासाठी आरमोरी शहरातील बर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील महादेव मंदिर, दत्तमंदिर, हनुमान मंदिर व माता मंदिरात जाऊन देवीदेवतांची पूजा-अर्चा केली. त्याचबरोबर भजनाच्या माध्यमातून देवाला साकडे घातले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते नंदू मने, किशोर गोंदोळे, सुनिल ठाकरे, बापू तिजारे, रमेश ठाकरे, आनंद कामडे, सुभाष धोटे, बंडू गायकवाड, भाग्यवान चोपकर, गणेश ठाकरे, मंगेश सोनकुसरे, गोपाल ठाकरे, घनशाम ठाकरे, बुधा नंदनवार, पांडुरंग ठाकरे, किसन ठाकरे, पांडुरंग सोरते, गीताबाई ठाकरे, विमल ठाकरे, प्रेमिला ठाकरे, बंडू मेश्राम, प्रभू माकडे, दिवाकर गरमडे, तुलाराम कामडे, अमर धार्मिक, परमेश्वर ठाकरे, रवी ठाकरे, विश्वनाथ दुमाने यांच्यासह आरमोरीतील अनेक भाविक सहभागी झाले होते.
दीड महिन्यानंतरही जलसाठे कोरडेठाकच
By admin | Updated: July 19, 2015 01:47 IST