शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

दीड महिन्यानंतरही जलसाठे कोरडेठाकच

By admin | Updated: July 19, 2015 01:47 IST

पावसाळ्याला सुरूवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे व जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई : दमट वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भावगडचिरोली : पावसाळ्याला सुरूवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे व जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. त्याचप्रमाणे यावर्षीही दुसऱ्या आठवड्यात तब्बल चार दिवस पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारली आहे. उन्हाळ्याप्रमाणे दिवसा कडक ऊन पडत आहे. परिणामी पहिल्या पावसामुळे तलाव, नदी, नाले यांच्यामध्ये साचलेले पाणी पूर्णपणे आटले आहे. उन्हाळ्याप्रमाणेच हे सर्व जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ४८२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद सरकारदप्तरी करण्यात आली आहे. एकूण पावसाच्या हे प्रमाण २५ टक्के असल्याने सर्व आलबेल असल्याची नोंद सरकार दप्तरी झाली आहे. मात्र प्रत्यक्षात हा पाऊस केवळ चार दिवसांचा असून त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे संपूर्ण खरीप पिके धोक्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबारपेरणीलाही सुरूवात केली आहे. रोवणींचे कामे पूर्णपणे ठप्प पडली असून शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)डिझेल इंजिनने पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्नभामरागड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेताजवळ पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी डिझेल इंजिन, विद्युत मोटारपंपाचा वापर करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच प्रचंड प्रमाणात डिझेल इंजिनचा वापर केला जात असल्याचे चित्र भामरागड तालुक्यात बघायला मिळत आहे.पावसासाठी आरमोरीत देवाला साकडेजिल्ह्यात भरपूर पाऊस पडावा यासाठी आरमोरी शहरातील बर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील महादेव मंदिर, दत्तमंदिर, हनुमान मंदिर व माता मंदिरात जाऊन देवीदेवतांची पूजा-अर्चा केली. त्याचबरोबर भजनाच्या माध्यमातून देवाला साकडे घातले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते नंदू मने, किशोर गोंदोळे, सुनिल ठाकरे, बापू तिजारे, रमेश ठाकरे, आनंद कामडे, सुभाष धोटे, बंडू गायकवाड, भाग्यवान चोपकर, गणेश ठाकरे, मंगेश सोनकुसरे, गोपाल ठाकरे, घनशाम ठाकरे, बुधा नंदनवार, पांडुरंग ठाकरे, किसन ठाकरे, पांडुरंग सोरते, गीताबाई ठाकरे, विमल ठाकरे, प्रेमिला ठाकरे, बंडू मेश्राम, प्रभू माकडे, दिवाकर गरमडे, तुलाराम कामडे, अमर धार्मिक, परमेश्वर ठाकरे, रवी ठाकरे, विश्वनाथ दुमाने यांच्यासह आरमोरीतील अनेक भाविक सहभागी झाले होते.