शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दीड महिन्यानंतरही जलसाठे कोरडेठाकच

By admin | Updated: July 19, 2015 01:47 IST

पावसाळ्याला सुरूवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे व जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई : दमट वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भावगडचिरोली : पावसाळ्याला सुरूवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे व जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. त्याचप्रमाणे यावर्षीही दुसऱ्या आठवड्यात तब्बल चार दिवस पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारली आहे. उन्हाळ्याप्रमाणे दिवसा कडक ऊन पडत आहे. परिणामी पहिल्या पावसामुळे तलाव, नदी, नाले यांच्यामध्ये साचलेले पाणी पूर्णपणे आटले आहे. उन्हाळ्याप्रमाणेच हे सर्व जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ४८२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद सरकारदप्तरी करण्यात आली आहे. एकूण पावसाच्या हे प्रमाण २५ टक्के असल्याने सर्व आलबेल असल्याची नोंद सरकार दप्तरी झाली आहे. मात्र प्रत्यक्षात हा पाऊस केवळ चार दिवसांचा असून त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे संपूर्ण खरीप पिके धोक्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबारपेरणीलाही सुरूवात केली आहे. रोवणींचे कामे पूर्णपणे ठप्प पडली असून शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)डिझेल इंजिनने पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्नभामरागड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेताजवळ पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी डिझेल इंजिन, विद्युत मोटारपंपाचा वापर करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच प्रचंड प्रमाणात डिझेल इंजिनचा वापर केला जात असल्याचे चित्र भामरागड तालुक्यात बघायला मिळत आहे.पावसासाठी आरमोरीत देवाला साकडेजिल्ह्यात भरपूर पाऊस पडावा यासाठी आरमोरी शहरातील बर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील महादेव मंदिर, दत्तमंदिर, हनुमान मंदिर व माता मंदिरात जाऊन देवीदेवतांची पूजा-अर्चा केली. त्याचबरोबर भजनाच्या माध्यमातून देवाला साकडे घातले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते नंदू मने, किशोर गोंदोळे, सुनिल ठाकरे, बापू तिजारे, रमेश ठाकरे, आनंद कामडे, सुभाष धोटे, बंडू गायकवाड, भाग्यवान चोपकर, गणेश ठाकरे, मंगेश सोनकुसरे, गोपाल ठाकरे, घनशाम ठाकरे, बुधा नंदनवार, पांडुरंग ठाकरे, किसन ठाकरे, पांडुरंग सोरते, गीताबाई ठाकरे, विमल ठाकरे, प्रेमिला ठाकरे, बंडू मेश्राम, प्रभू माकडे, दिवाकर गरमडे, तुलाराम कामडे, अमर धार्मिक, परमेश्वर ठाकरे, रवी ठाकरे, विश्वनाथ दुमाने यांच्यासह आरमोरीतील अनेक भाविक सहभागी झाले होते.