शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

पावसाच्या उसंतीने जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:23 IST

आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होती.

ठळक मुद्देरोवणीच्या कामांना वेग : शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा; पूर ओसरला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होती. तसेच आष्टी येथील वैनगंगा नदीला पूर आल्याने चंद्रपूर-आष्टी मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने पूर परिस्थिती ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आता ग्रामीण भागात धानपीक रोवणीच्या कामाला वेग आला आहे.२७ जुलैपासून ३ आॅगस्टपर्यंत संततधार पाऊस जिल्हाभरात बरसला. ४ आॅगस्टला पावसाने उसंत दिली. त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल घडून नागपंचमीच्या दिवशी ५ आॅगस्टला दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. संततधार पावसामुळे धानपिकाची रोवणी व शेतातील इतर कामे खोळंबली होती. मात्र पुन्हा मंगळवारी पावसाने उसंत घेतली. मंगळवारी गडचिरोली शहरास जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. यापूर्वी मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे गडचिरोली, आरमोरी शहरासह अनेक भाग जलमय झाले होते. सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसाळ्यातील सुरूवातीच्या तीन नक्षत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान पुनर्वसू नक्षत्रात २७ जुलैपासून पाच ते सहा दिवस संततधार पाऊस बरसला. या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकही सुखावले. मात्र पाऊस थांबत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने सर्व नागरिकांचा जीव भांड्यात पडला.बड्या शेतकऱ्यांचा गुत्था पद्धतीवर भरसुरूवातीच्या टप्प्यात पाऊस न झाल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात धान पिकाच्या रोवणीच्या कामास विलंब झाला. दरम्यान पाऊस होताच सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी रोवणीच्या कामास प्रारंभ करण्यासाठी लगबग सुरू केली. मात्र महिला मजूर मिळत नसल्याने जिल्ह्यातील बड्या शेतकऱ्यांनी आपले रोवणी काम गुत्था पध्दतीने हाती घेतले आहे. पऱ्हे खोदणे व रोवणी करणे ही दोन्ही कामे महिला मजूर करीत आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करून सकाळपासून महिला मजुरांकडून रोवणीचे काम सुरू आहे. अनेक बड्या शेतकऱ्यांनी यंदा गुत्था पध्दतीवर भर दिला आहे. पुरूष मजुरांचेही मजुरीचे भाव वाढल्याने महिला मजुरांना प्राधान्य दिले जात आहे.