शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या उसंतीने जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:23 IST

आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होती.

ठळक मुद्देरोवणीच्या कामांना वेग : शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा; पूर ओसरला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होती. तसेच आष्टी येथील वैनगंगा नदीला पूर आल्याने चंद्रपूर-आष्टी मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने पूर परिस्थिती ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आता ग्रामीण भागात धानपीक रोवणीच्या कामाला वेग आला आहे.२७ जुलैपासून ३ आॅगस्टपर्यंत संततधार पाऊस जिल्हाभरात बरसला. ४ आॅगस्टला पावसाने उसंत दिली. त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल घडून नागपंचमीच्या दिवशी ५ आॅगस्टला दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. संततधार पावसामुळे धानपिकाची रोवणी व शेतातील इतर कामे खोळंबली होती. मात्र पुन्हा मंगळवारी पावसाने उसंत घेतली. मंगळवारी गडचिरोली शहरास जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. यापूर्वी मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे गडचिरोली, आरमोरी शहरासह अनेक भाग जलमय झाले होते. सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसाळ्यातील सुरूवातीच्या तीन नक्षत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान पुनर्वसू नक्षत्रात २७ जुलैपासून पाच ते सहा दिवस संततधार पाऊस बरसला. या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकही सुखावले. मात्र पाऊस थांबत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने सर्व नागरिकांचा जीव भांड्यात पडला.बड्या शेतकऱ्यांचा गुत्था पद्धतीवर भरसुरूवातीच्या टप्प्यात पाऊस न झाल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात धान पिकाच्या रोवणीच्या कामास विलंब झाला. दरम्यान पाऊस होताच सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी रोवणीच्या कामास प्रारंभ करण्यासाठी लगबग सुरू केली. मात्र महिला मजूर मिळत नसल्याने जिल्ह्यातील बड्या शेतकऱ्यांनी आपले रोवणी काम गुत्था पध्दतीने हाती घेतले आहे. पऱ्हे खोदणे व रोवणी करणे ही दोन्ही कामे महिला मजूर करीत आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करून सकाळपासून महिला मजुरांकडून रोवणीचे काम सुरू आहे. अनेक बड्या शेतकऱ्यांनी यंदा गुत्था पध्दतीवर भर दिला आहे. पुरूष मजुरांचेही मजुरीचे भाव वाढल्याने महिला मजुरांना प्राधान्य दिले जात आहे.