शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

शाळांमधील सुविधांचे मूल्यांकन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:39 IST

जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोणत्या सुविधा आहेत व कशाची कमतरता आहे, याची माहिती यु-डायस पोर्टलवर भरली जात होती. मात्र मागील दोन वर्षांपासून माहिती भरली नसल्याने शाळांमध्ये नेमक्या कोणत्या सोयीसुविधा आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे.

ठळक मुद्देयु-डायस प्रणाली ठप्प : नियोजन करताना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोणत्या सुविधा आहेत व कशाची कमतरता आहे, याची माहिती यु-डायस पोर्टलवर भरली जात होती. मात्र मागील दोन वर्षांपासून माहिती भरली नसल्याने शाळांमध्ये नेमक्या कोणत्या सोयीसुविधा आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना शाळेमध्ये असलेल्या सोयीसुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. शाळेमध्ये असलेल्या सोयीसुविधांवरून शाळेचा दर्जा ठरविला जातो. त्यामुळे प्रत्येक शाळेत किमान सोयीसुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्या नसतील तर त्या उपलब्ध करून देणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे. शाळेमध्ये कोणत्या भौतिक सुविधा आहेत, याची माहिती दोन वर्षापूर्वीपर्यंत यु-डायसवर भरली जात होती. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्या शाळेमध्ये कोणती सुविधा नाही, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत होती. २०१६-१७ या वर्षातील माहिती भरण्यात आली. मात्र त्यानंतर २०१८-१९ मध्ये माहितीच भरण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्या शाळेमध्ये कशाची आवश्यकता आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी अनभिज्ञ आहेत. यावर्षी यु-डायसमध्ये मुख्याध्यापकांनी माहिती भरली आहे. यु-डायस प्रणालीमध्ये भरलेली माहिती थेट मंत्रालयातही बघता येते. एखाद्या जिल्ह्यातील शाळांना नेमक्या कोणत्या सुविधांची गरज आहे, हे लक्षात येते. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करून निधी उपलब्ध करून देता येते. मात्र यु-डायसअभावी माहिती पाठविणे सुध्दा बंद झाले आहे.नागरिकांच्या मागणीनुसार बांधकामयु-डायस प्रणालीचे काम ठप्प असल्याने कोणत्या शाळेमध्ये कशाची कमतरता आहे, याची माहिती जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे गावातील नागरिक, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्याकडून प्राप्त होणाºया मागणीनुसार जिल्हा परिषद कार्यवाही करते. एखाद्या शाळेमध्ये शौचालय बांधकामाची गरज असेल तर तशी मागणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, नागरिक यांच्याकडून झाल्यानंतर त्याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेत मंजूर केला जातो. त्यानंतर त्या ठिकाणी बांधकाम केले जाते. अशा पध्दतीने सद्य:स्थितीत काम भागविले जात आहे.

टॅग्स :Schoolशाळा