शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

एटापल्लीतील मीठ छत्तीसगड राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी करू लागले. यातही एकाच बॅगवर समाधान न ठेवता दोन ते तीन बॅग घेऊ लागले.

ठळक मुद्देदुचाकींवर सर्रास वाहतूक : प्रशासनाच्या सूचनेनंतरही जादा दरात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : छत्तीसगड राज्यातून निर्माण झालेले मीठ तुटवड्याचे लोण कोरची तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पसरले. त्यानंतर दुकानदारांकडून जादा दराने मिठाची विक्री सुरू झाली. एटापल्ली शहरात मीठ खरेदी करण्याकरिता छत्तीसगड राज्यातून अनेक नागरिक येत आहेत. दुचाकीवर शक्य असलेल्या मिठाच्या बॅग मांडून त्याची सर्रास वाहतूक होत असल्याने तालुक्यात मिठाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी करू लागले. यातही एकाच बॅगवर समाधान न ठेवता दोन ते तीन बॅग घेऊ लागले. मीठ तुटवड्याच्या या अफवेचे लोण संपूर्ण जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण व अतिदुर्गम भागातही पसरले. एटापल्ली तालुका छत्तीसगडला लागून आहे. त्यामुळे आधीच छत्तीसगडमध्ये मिठाचा तुटवडा असताना येथील अनेक नागरिक दुचाकी वाहनाने आड मार्गाने एटापल्ली तालुक्यात येऊन मिठाची खरेदी करीत आहेत. दुचाकीवर वाहनाच्या क्षमतेनुसार मिठाच्या बॅगा मांडल्या जात आहेत. एटापल्लीतील अनेक किराणा दुकानांमधून छत्तीसगड राज्यात मिठाची वाहतूक केली जात आहे. प्रत्येकजण चार ते पाच बॅगा नेत आहेत. पूर्वी मिठाचे दर १८० रुपये बॅगपर्यंत होते. परंतु आता प्रती बॅग २८० रुपयांच्या वर बॅगाची विक्री केली जात आहे. याबाबत नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग व मुख्याधिकारी अजय साळवे यांना लोकमत प्रतिनिधीने माहिती दिली असता, मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांनी किराणा दुकानात जाऊन जादा दराने मिठाची विक्री करू नका, अशा सूचना दिल्या. मात्र तरीही जादा दराने मिठाची विक्री सुरूच आहे.क्षमतेपेक्षा जास्त साठा निर्माण झाल्यास मागणी कमी होण्याची शक्यताजिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मिठाचा तुटवडा नसल्याचे जाहीर केले होते. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले. तरीसुद्धा किराणा दुकानांमध्ये मीठ खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या. आवश्यकतेपेक्षाही अधिक मिठाची खरेदी नागरिकांनी जादा दरात केली. त्यामुळे तीन ते चार महिने पुरेल एवढा साठा नागरिकांनी केला आहे. मागील आठ दिवसांपासून मीठ साठवणुकीचा प्रकार जिल्हाभर सुरू आहे. पुन्हा आठवडाभर सदर प्रकार सुरू राहिल्यास मिठाची मागणी कमी होऊ शकते. या कालावधीत दुकानदारांनी बाहेरून मिठाचा साठा बोलाविल्यास त्यांच्याकडील मीठ खरेदी करण्यास ग्राहक सुद्धा मिळणार नाही, पावसाळाभर त्यांच्याकडील मीठ दुकानात पडून राहू शकते, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा दुकानदार प्रशासनाच्या आवाहनाला न जुमानता चढत्या भावाने मिठाची विक्री करीत आहेत. ग्राहक मात्र खोट्या तुटवड्याच्या भीतीने मिठाची खरेदी करीत आहेत. एटापल्ली तालुक्यात जादा दराने मिठाची विक्री करणाºया दुकानदारांवर स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक