शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

एटापल्लीतील मीठ छत्तीसगड राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी करू लागले. यातही एकाच बॅगवर समाधान न ठेवता दोन ते तीन बॅग घेऊ लागले.

ठळक मुद्देदुचाकींवर सर्रास वाहतूक : प्रशासनाच्या सूचनेनंतरही जादा दरात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : छत्तीसगड राज्यातून निर्माण झालेले मीठ तुटवड्याचे लोण कोरची तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पसरले. त्यानंतर दुकानदारांकडून जादा दराने मिठाची विक्री सुरू झाली. एटापल्ली शहरात मीठ खरेदी करण्याकरिता छत्तीसगड राज्यातून अनेक नागरिक येत आहेत. दुचाकीवर शक्य असलेल्या मिठाच्या बॅग मांडून त्याची सर्रास वाहतूक होत असल्याने तालुक्यात मिठाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी करू लागले. यातही एकाच बॅगवर समाधान न ठेवता दोन ते तीन बॅग घेऊ लागले. मीठ तुटवड्याच्या या अफवेचे लोण संपूर्ण जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण व अतिदुर्गम भागातही पसरले. एटापल्ली तालुका छत्तीसगडला लागून आहे. त्यामुळे आधीच छत्तीसगडमध्ये मिठाचा तुटवडा असताना येथील अनेक नागरिक दुचाकी वाहनाने आड मार्गाने एटापल्ली तालुक्यात येऊन मिठाची खरेदी करीत आहेत. दुचाकीवर वाहनाच्या क्षमतेनुसार मिठाच्या बॅगा मांडल्या जात आहेत. एटापल्लीतील अनेक किराणा दुकानांमधून छत्तीसगड राज्यात मिठाची वाहतूक केली जात आहे. प्रत्येकजण चार ते पाच बॅगा नेत आहेत. पूर्वी मिठाचे दर १८० रुपये बॅगपर्यंत होते. परंतु आता प्रती बॅग २८० रुपयांच्या वर बॅगाची विक्री केली जात आहे. याबाबत नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग व मुख्याधिकारी अजय साळवे यांना लोकमत प्रतिनिधीने माहिती दिली असता, मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांनी किराणा दुकानात जाऊन जादा दराने मिठाची विक्री करू नका, अशा सूचना दिल्या. मात्र तरीही जादा दराने मिठाची विक्री सुरूच आहे.क्षमतेपेक्षा जास्त साठा निर्माण झाल्यास मागणी कमी होण्याची शक्यताजिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मिठाचा तुटवडा नसल्याचे जाहीर केले होते. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले. तरीसुद्धा किराणा दुकानांमध्ये मीठ खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या. आवश्यकतेपेक्षाही अधिक मिठाची खरेदी नागरिकांनी जादा दरात केली. त्यामुळे तीन ते चार महिने पुरेल एवढा साठा नागरिकांनी केला आहे. मागील आठ दिवसांपासून मीठ साठवणुकीचा प्रकार जिल्हाभर सुरू आहे. पुन्हा आठवडाभर सदर प्रकार सुरू राहिल्यास मिठाची मागणी कमी होऊ शकते. या कालावधीत दुकानदारांनी बाहेरून मिठाचा साठा बोलाविल्यास त्यांच्याकडील मीठ खरेदी करण्यास ग्राहक सुद्धा मिळणार नाही, पावसाळाभर त्यांच्याकडील मीठ दुकानात पडून राहू शकते, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा दुकानदार प्रशासनाच्या आवाहनाला न जुमानता चढत्या भावाने मिठाची विक्री करीत आहेत. ग्राहक मात्र खोट्या तुटवड्याच्या भीतीने मिठाची खरेदी करीत आहेत. एटापल्ली तालुक्यात जादा दराने मिठाची विक्री करणाºया दुकानदारांवर स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक