शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

एटापल्लीतील मीठ छत्तीसगड राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी करू लागले. यातही एकाच बॅगवर समाधान न ठेवता दोन ते तीन बॅग घेऊ लागले.

ठळक मुद्देदुचाकींवर सर्रास वाहतूक : प्रशासनाच्या सूचनेनंतरही जादा दरात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : छत्तीसगड राज्यातून निर्माण झालेले मीठ तुटवड्याचे लोण कोरची तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पसरले. त्यानंतर दुकानदारांकडून जादा दराने मिठाची विक्री सुरू झाली. एटापल्ली शहरात मीठ खरेदी करण्याकरिता छत्तीसगड राज्यातून अनेक नागरिक येत आहेत. दुचाकीवर शक्य असलेल्या मिठाच्या बॅग मांडून त्याची सर्रास वाहतूक होत असल्याने तालुक्यात मिठाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी करू लागले. यातही एकाच बॅगवर समाधान न ठेवता दोन ते तीन बॅग घेऊ लागले. मीठ तुटवड्याच्या या अफवेचे लोण संपूर्ण जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण व अतिदुर्गम भागातही पसरले. एटापल्ली तालुका छत्तीसगडला लागून आहे. त्यामुळे आधीच छत्तीसगडमध्ये मिठाचा तुटवडा असताना येथील अनेक नागरिक दुचाकी वाहनाने आड मार्गाने एटापल्ली तालुक्यात येऊन मिठाची खरेदी करीत आहेत. दुचाकीवर वाहनाच्या क्षमतेनुसार मिठाच्या बॅगा मांडल्या जात आहेत. एटापल्लीतील अनेक किराणा दुकानांमधून छत्तीसगड राज्यात मिठाची वाहतूक केली जात आहे. प्रत्येकजण चार ते पाच बॅगा नेत आहेत. पूर्वी मिठाचे दर १८० रुपये बॅगपर्यंत होते. परंतु आता प्रती बॅग २८० रुपयांच्या वर बॅगाची विक्री केली जात आहे. याबाबत नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग व मुख्याधिकारी अजय साळवे यांना लोकमत प्रतिनिधीने माहिती दिली असता, मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांनी किराणा दुकानात जाऊन जादा दराने मिठाची विक्री करू नका, अशा सूचना दिल्या. मात्र तरीही जादा दराने मिठाची विक्री सुरूच आहे.क्षमतेपेक्षा जास्त साठा निर्माण झाल्यास मागणी कमी होण्याची शक्यताजिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मिठाचा तुटवडा नसल्याचे जाहीर केले होते. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले. तरीसुद्धा किराणा दुकानांमध्ये मीठ खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या. आवश्यकतेपेक्षाही अधिक मिठाची खरेदी नागरिकांनी जादा दरात केली. त्यामुळे तीन ते चार महिने पुरेल एवढा साठा नागरिकांनी केला आहे. मागील आठ दिवसांपासून मीठ साठवणुकीचा प्रकार जिल्हाभर सुरू आहे. पुन्हा आठवडाभर सदर प्रकार सुरू राहिल्यास मिठाची मागणी कमी होऊ शकते. या कालावधीत दुकानदारांनी बाहेरून मिठाचा साठा बोलाविल्यास त्यांच्याकडील मीठ खरेदी करण्यास ग्राहक सुद्धा मिळणार नाही, पावसाळाभर त्यांच्याकडील मीठ दुकानात पडून राहू शकते, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा दुकानदार प्रशासनाच्या आवाहनाला न जुमानता चढत्या भावाने मिठाची विक्री करीत आहेत. ग्राहक मात्र खोट्या तुटवड्याच्या भीतीने मिठाची खरेदी करीत आहेत. एटापल्ली तालुक्यात जादा दराने मिठाची विक्री करणाºया दुकानदारांवर स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक