शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘खावटी’चा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात समित्या स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

उपविभागीयस्तरावर समिती गठीत करण्यात आले असून येथे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गावपातळीवरील कमिट्यांमध्ये ग्रामसेवक, तलाठी व शासकीय आश्रमशाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे. आश्रमशाळांचे शिक्षक तसेच गृहपाल येत्या काही दिवसात आदिम जमातीची लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष फिरून योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करणार आहेत. सोबतच अर्ज भरून घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणाचे काम सुरू होणार क आदिवासी व महसूल प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सन २०२०-२१ या वर्षापासून खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास विभाग व महसूल प्रशासन कामाला लागले आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी उपविभागीयस्तरावर व गावपातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीनही प्रकल्प कार्यालयामार्फत खावटी अनुदान योजनेची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास महामंडळ व महसूल प्रशासन या तीनही विभागाच्या समन्वयातून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.उपविभागीयस्तरावर समिती गठीत करण्यात आले असून येथे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गावपातळीवरील कमिट्यांमध्ये ग्रामसेवक, तलाठी व शासकीय आश्रमशाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे. आश्रमशाळांचे शिक्षक तसेच गृहपाल येत्या काही दिवसात आदिम जमातीची लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष फिरून योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करणार आहेत. सोबतच अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर पोस्टाचे खाते उघडण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम वळती करण्यात येणार आहे.अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी योजनेचा लाभ देण्यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास विभागाने ९ सप्टेंबर व ३० सप्टेंबर २०२० रोजी दोन शासन निर्णय निर्गमित केले. त्यानुसार कोविड विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपतकालीन परिस्थितीत आदिवासी कुटुंबांना मदत देण्यासाठी १०० टक्के रोखीने खावटी कर्ज वाटप करण्याच्या निर्णयातून सुट देण्यात आली.ही योजना सन २०२०-२१ पासून पुन्हा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ५० टक्के रोख व ५० टक्के वस्तू स्वरूपात लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. यापूर्वी आदिवासी कुटुंबांसाठी असलेली खावटी योजना शासनाने सन२०१३-१४ पासून बंद केली होती. आता तीच योजना पूनर्जिवित करून नव्या पद्धतीने राबविण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आदिवासाी विकास विभागाचे संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या क्षेत्रातील परितक्त्या, घटस्फोटीत महिला, विधवा, कुमारी माता, भूमीही शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलाचे संगोपन करणारे कुटुंब यांची प्रकल्पनिहाय यादी तयार करून ही यादी ग्रामस्तरीय समिती सोपवावी, त्यांच्याकडून अर्ज भरून घ्यावे, असे या योजनेच्या शासननिर्णयात नमूद आहे.वस्तूरूपात असा मिळणार लाभआदिवासी जमातीच्या पात्र कुटुंबांना दोन हजार रुपये किमतीचे धान्य आपल्या किराणा स्वरूपात वस्तू मिळणार आहेत. यामध्ये मटकी, चवळी, हरभरा, वटाना, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती आदींचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या