शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

राज्य मार्गालाही अतिक्रमणाची वाळवी

By admin | Updated: November 22, 2015 01:27 IST

शहरातील आयटीआय ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली असून ...

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : आयटीआय ते रुग्णालयापर्यंत जागा बळकाविण्याचा आटापिटा सुरूगडचिरोली : शहरातील आयटीआय ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली असून काही नागरिकांनी जागा साफ करून त्यावर बल्ल्या गाडूून जागा आरक्षित करणे सुरू केले आहे. काही दुकानदारांनी दुकानही थाटले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून भविष्यात शहारातील अतिक्रमणाप्रमाणेच या मार्गावरीलही अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्ग तसेच अंतर्गत मार्गांवरीलही जागा बळकावून त्यावर दुकान थाटले आहेत. मात्र आयटीआय चौक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत आयटीआय, कृषी विज्ञान केंद्र वगळता एकही कार्यालय नसल्याने या ठिकाणी दुकान सुरू करण्यास फारसा वाव नव्हता. त्यामुळे या ठिकाणी अतिक्रमणाची समस्या आजपर्यंत निर्माण झाली नाही. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून या ठिकाणी कृषी महाविद्यालय झाले आहे. आयटीआयची प्रशस्त इमारत बांधण्यात आली असून या ठिकाणचे अभ्यासक्रमही वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आपसुकच वाढली आहे. त्याचबरोबर या परिसरातील लोकवस्तीमध्ये हळूहळू वाढ होत असल्याने या परिसरातही आता दिवसभर नागरिकांची गर्दी वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी आयटीआयच्या समोर काही नागरिकांनी अतिक्रमण करून जागा बळकावली होती. त्यावर आता अनेकांनी दुकानही थाटले आहे. हळूहळू या अतिक्रमणाचा विस्तार होत चालला आहे. आयटीआय ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुला मोठी झाडे व झुडूपे आहेत. काही कार्यालयांनी संरक्षण भिंत बांधली आहे. या ठिकाणचे झुडूपे व झाडे तोडून त्यावर माती, विटा, गोटे टाकून जागेचे सपाटीकरण केले जात आहे. काही नागरिकांनी झाडे, झुडूपे तोडून त्यावर बल्ल्या गाडून जागा आरक्षित केली आहे. त्यामुळे सहा महिन्यांत या ठिकाणची पूर्ण जागा अतिक्रमणात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी) पावसाचे पाणी वाहून जाण्यास निर्माण होणार अडथळाआयटीआय ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंतच्या राज्य महामार्गावर दोन्ही बाजूला शासकीय जागा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने राज्य महामार्गापासून २५ ते ३० मीटर जागा दोन्ही बाजूला सोडून दोन्ही बाजुला संरक्षण भिंत बांधली आहे. या संरक्षण भिंतीजवळून नाली खोदण्यात आली आहे. या नालीद्वारे या परिसरातील सांडपाणी, पावसाचे पाणी वाहून नेले जाते. मात्र अतिक्रमणधारकांनी नाल्याच बुजविणे सुरू केले आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाली बुजल्यास या परिसरातील पाणी डांबरी रस्त्यावरून वाहण्याची शक्यता आहे. अतिक्रमणाचा प्रश्न होणार गंभीरज्या नागरिकांनी यापूर्वी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची दमछाक उडत आहे. अतिक्रमण काढण्याची मोहीम संपल्यानंतर अतिक्रमण जैसे थे होत आहे. या ठिकाणीही अतिक्रमण करून दुकाने थाटल्यानंतर सदर अतिक्रमण काढणे प्रशासनासाठी फार मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने व नगर परिषदेने संयुक्त मोहीम राबवून या ठिकाणी लावण्यात येत असलेले अतिक्रमण तत्काळ हटवावे, जेणेकरून भविष्यातील संकट टाळता येईल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.