शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:20 IST

देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते.

ठळक मुद्देशेतात जेसीबी चालविली : बोळधा येथे वन विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमतकोरेगाव/चोप : देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते. संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावूनही अतिक्रमण कायमच राहिले. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने संबंधित अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण हटविले. सदर कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास वडसा वन विभागचे सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे व वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार यांनी पोलीस बंदोबस्तात पार पाडली.बोळधा येथील सर्वे नंबर ४५६/१ मधील ३३.८२ हेक्टरपैकी १.७९१ हेक्टर इतक्या संरक्षित वन जमिनीवर बोळधा येथील रतीराम भिवा गायकवाड, मुरलीधर धर्मा मेश्राम, पुंडलिक तिमा गायकवाड, विश्वनाथ तुकाराम गायकवाड व गोपाल विनायक सुकारे या पाच शेतकºयांनी अतिक्रमण घेऊन पीक घेणे सुरू केले होते. शासन निर्णयानुसार पाचही शेतकºयांनी शेती कसणे सुरू केले. दरम्यान वन विभागांनी या शेतकºयांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजाविली. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने वनाधिकाºयांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने या संरक्षित वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले. या कारवाईमुळे जंगलात अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.संरक्षित वन जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याच्या मुद्यावर वनाधिकाºयांनी ठोस भूमिका घेतली. त्यानंतर पुढाकार घेऊन संरक्षित वनाची जागा आपल्या ताब्यात घेतली व त्यानंतर या ठिकाणी नाली खोदण्यात आली.जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे, वन परिक्षेत्राधिकारी एन. जी. चांदेवार, जांभुळे, क्षेत्र सहायक मेनेवार, माडावार, ठाकरे, कोसमसिले, वनपाल वंजारी, कुंभरे यांच्यासह वनरक्षक, वनमजूर आदींनी केली. सदर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान देसाईगंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. बहुप्रतिक्षेनंतर अतिक्रमण काढण्यात आले.स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी यापूर्वी आंदोलनबोळधा हे गाव देसाईगंज तालुक्यात वन जमीन अतिक्रमणाच्या जास्तीत जास्त भागाने व्यापला आहे. पाच वर्षांपूर्वी या अतिक्रमणधारकांच्या वाढत्या हिंमतीमुळे येथे मृतदेह पुरण्यासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे चक्क ग्रामपंचायत कार्यालयात मृतदेह नेऊन मशानभूमीची जागा मोकळी करा, नाही तर मृतदेह गावात पुरण्यासाठी परवानगी द्या, या मागणीकरिता आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर तत्कालीन पोलीस निरिक्षक दीपक निकम यांनी तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी यांना पाचारण करून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई त्यावेळी केली होती.