शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:20 IST

देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते.

ठळक मुद्देशेतात जेसीबी चालविली : बोळधा येथे वन विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमतकोरेगाव/चोप : देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते. संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावूनही अतिक्रमण कायमच राहिले. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने संबंधित अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण हटविले. सदर कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास वडसा वन विभागचे सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे व वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार यांनी पोलीस बंदोबस्तात पार पाडली.बोळधा येथील सर्वे नंबर ४५६/१ मधील ३३.८२ हेक्टरपैकी १.७९१ हेक्टर इतक्या संरक्षित वन जमिनीवर बोळधा येथील रतीराम भिवा गायकवाड, मुरलीधर धर्मा मेश्राम, पुंडलिक तिमा गायकवाड, विश्वनाथ तुकाराम गायकवाड व गोपाल विनायक सुकारे या पाच शेतकºयांनी अतिक्रमण घेऊन पीक घेणे सुरू केले होते. शासन निर्णयानुसार पाचही शेतकºयांनी शेती कसणे सुरू केले. दरम्यान वन विभागांनी या शेतकºयांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजाविली. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने वनाधिकाºयांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने या संरक्षित वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले. या कारवाईमुळे जंगलात अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.संरक्षित वन जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याच्या मुद्यावर वनाधिकाºयांनी ठोस भूमिका घेतली. त्यानंतर पुढाकार घेऊन संरक्षित वनाची जागा आपल्या ताब्यात घेतली व त्यानंतर या ठिकाणी नाली खोदण्यात आली.जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे, वन परिक्षेत्राधिकारी एन. जी. चांदेवार, जांभुळे, क्षेत्र सहायक मेनेवार, माडावार, ठाकरे, कोसमसिले, वनपाल वंजारी, कुंभरे यांच्यासह वनरक्षक, वनमजूर आदींनी केली. सदर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान देसाईगंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. बहुप्रतिक्षेनंतर अतिक्रमण काढण्यात आले.स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी यापूर्वी आंदोलनबोळधा हे गाव देसाईगंज तालुक्यात वन जमीन अतिक्रमणाच्या जास्तीत जास्त भागाने व्यापला आहे. पाच वर्षांपूर्वी या अतिक्रमणधारकांच्या वाढत्या हिंमतीमुळे येथे मृतदेह पुरण्यासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे चक्क ग्रामपंचायत कार्यालयात मृतदेह नेऊन मशानभूमीची जागा मोकळी करा, नाही तर मृतदेह गावात पुरण्यासाठी परवानगी द्या, या मागणीकरिता आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर तत्कालीन पोलीस निरिक्षक दीपक निकम यांनी तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी यांना पाचारण करून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई त्यावेळी केली होती.