शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्काच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:56 IST

आरमोरी तालुक्याच्या सिर्सी, कुकडी, नरोटी (चक), विहीरगाव, मोहटोला येथील शेतकऱ्यांना महसूल व वनजमीन वनहक्क प्राप्त असून या जमिनीवर अवैैध अतिक्रमण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : पेसा क्षेत्रातील जमीन परत मागितली;राज्यपालांना पाठविले पत्र

आॅनलाईन लोकमतवैरागड : आरमोरी तालुक्याच्या सिर्सी, कुकडी, नरोटी (चक), विहीरगाव, मोहटोला येथील शेतकऱ्यांना महसूल व वनजमीन वनहक्क प्राप्त असून या जमिनीवर अवैैध अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अवैैध अतिक्रमण हटवून कुकडी, सिर्सी वनहक्काच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून पेसाची जागा परत करावी, अशी मागणी पेसा गटग्रामसभा नरोटी चक यांनी राज्यपालांकडे केली आहे.विशेष ग्रामसभा नरोटी चक यांनी या पत्रात म्हटले आहे की, सर्वे नं. २४९, २६०, २६२, २६४, २६४/२, २६५, २६६, २५०, २५१, २५३, २४६, २९९ यावर नव्याने जानेवारी २०१६ मध्ये अतिक्रमण करणारे सतीश गजभिये व इतर २२ व्यक्तींनी येथील जंगलातील १०० एकर जागेवरील अवैैध वृक्षतोड करून वरील सर्वे नंबरवर नव्याने अतिक्रम केले. त्यांच्या या कृतीमुळे जंगलाच्या जैैवविविधतेचे नुकसान झाले आहे. वनहक्क कायदा आणि जैैवविविधता कायद्याचा त्यांनी भंग केला आहे. नियम डावलून येथील तलाठी डी. बी. रामटेके, बारसागडे, खोब्रागडे, मंडळ अधिकारी घरत यांनी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आदिवासी खातेदारांची शेतजमीन बेदखल करून संबंधित अतिक्रमणधारकांना मदत केली. पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भूमिहीन यांनाच जमीन देता येते. परंतु नरोटी चक या क्षेत्रात एकाच कुटुंबात ४५ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. आदिवासी अनुसूचित क्षेत्रातील मोहटोला, कुकडी, विहीरगाव, नरोटी चक, नरोटी माल जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी सरपंच विजया भुसारी, उपसरपंच विश्वेश्वर दर्राे, विश्वनाथ हलामी, शेषराव उसेंडी, पुरूषोत्तम किरंगे, दिगांबर दुर्गे, उमाजी भुसारी, शालिकराम मडावी, ममीता म्हशाखेत्री, घनश्याम फुकटे यांनी राज्यपालांकडे केली आहे. वन विभागाची आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाच्या ताब्यात आहे. परंतु महसुलाची लॉबी वन विभागाकवर भारी पडत असल्याने हा प्रश्न निकाली लागला नाही. अंदाजपत्रकीय अधिवेशनात या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. वन विभागाकडे जमीन परत झाल्यास अनेकांचे अतिक्रमण मोडीत निघणार आहे.बाहेरच्या लोकांचे अतिक्रमणनागपूर जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेल्या अनेक लोकांच्या नावे सर्वे नंबर आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नावे वनहक्क करण्यात आले आहे. आदिवासी भूधारक जमीन हस्तांतरणास मनाई असल्याचा उल्लेख असतानाही आदिवासी लोकांना धमकावून बळजबरीने सर्वे नंबरवर वहिवाट सुरू आहे.