शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्काच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:56 IST

आरमोरी तालुक्याच्या सिर्सी, कुकडी, नरोटी (चक), विहीरगाव, मोहटोला येथील शेतकऱ्यांना महसूल व वनजमीन वनहक्क प्राप्त असून या जमिनीवर अवैैध अतिक्रमण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : पेसा क्षेत्रातील जमीन परत मागितली;राज्यपालांना पाठविले पत्र

आॅनलाईन लोकमतवैरागड : आरमोरी तालुक्याच्या सिर्सी, कुकडी, नरोटी (चक), विहीरगाव, मोहटोला येथील शेतकऱ्यांना महसूल व वनजमीन वनहक्क प्राप्त असून या जमिनीवर अवैैध अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अवैैध अतिक्रमण हटवून कुकडी, सिर्सी वनहक्काच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून पेसाची जागा परत करावी, अशी मागणी पेसा गटग्रामसभा नरोटी चक यांनी राज्यपालांकडे केली आहे.विशेष ग्रामसभा नरोटी चक यांनी या पत्रात म्हटले आहे की, सर्वे नं. २४९, २६०, २६२, २६४, २६४/२, २६५, २६६, २५०, २५१, २५३, २४६, २९९ यावर नव्याने जानेवारी २०१६ मध्ये अतिक्रमण करणारे सतीश गजभिये व इतर २२ व्यक्तींनी येथील जंगलातील १०० एकर जागेवरील अवैैध वृक्षतोड करून वरील सर्वे नंबरवर नव्याने अतिक्रम केले. त्यांच्या या कृतीमुळे जंगलाच्या जैैवविविधतेचे नुकसान झाले आहे. वनहक्क कायदा आणि जैैवविविधता कायद्याचा त्यांनी भंग केला आहे. नियम डावलून येथील तलाठी डी. बी. रामटेके, बारसागडे, खोब्रागडे, मंडळ अधिकारी घरत यांनी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आदिवासी खातेदारांची शेतजमीन बेदखल करून संबंधित अतिक्रमणधारकांना मदत केली. पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भूमिहीन यांनाच जमीन देता येते. परंतु नरोटी चक या क्षेत्रात एकाच कुटुंबात ४५ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. आदिवासी अनुसूचित क्षेत्रातील मोहटोला, कुकडी, विहीरगाव, नरोटी चक, नरोटी माल जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी सरपंच विजया भुसारी, उपसरपंच विश्वेश्वर दर्राे, विश्वनाथ हलामी, शेषराव उसेंडी, पुरूषोत्तम किरंगे, दिगांबर दुर्गे, उमाजी भुसारी, शालिकराम मडावी, ममीता म्हशाखेत्री, घनश्याम फुकटे यांनी राज्यपालांकडे केली आहे. वन विभागाची आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाच्या ताब्यात आहे. परंतु महसुलाची लॉबी वन विभागाकवर भारी पडत असल्याने हा प्रश्न निकाली लागला नाही. अंदाजपत्रकीय अधिवेशनात या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. वन विभागाकडे जमीन परत झाल्यास अनेकांचे अतिक्रमण मोडीत निघणार आहे.बाहेरच्या लोकांचे अतिक्रमणनागपूर जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेल्या अनेक लोकांच्या नावे सर्वे नंबर आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नावे वनहक्क करण्यात आले आहे. आदिवासी भूधारक जमीन हस्तांतरणास मनाई असल्याचा उल्लेख असतानाही आदिवासी लोकांना धमकावून बळजबरीने सर्वे नंबरवर वहिवाट सुरू आहे.