शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम लागवडीला रोजगार हमी योजनेचे बळ

By admin | Updated: October 29, 2014 22:50 IST

रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजूर मिळणार आहेत.

गडचिरोली : रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजूर मिळणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, गडचिरोली, आरमोरी तालुक्यात रेशीमचे उत्पादन घेतले जाते. यातून शेकडो नागरिकांना रोजगार मिळत आहे. आरमोरी येथे रेशीमचे स्वतंत्र कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. झाडांवर रेशीम किडे सोडून त्यांची देखभाल केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात ५०० हून अधिक हेक्टरवर रेशीमची शेती केल्या जाते. रेशीम उत्पादन हा शेतीशी संबंधित व्यवसाय असला तरी रेशीम उत्पादनाची कामे रोहयोच्या माध्यमातून करण्यास शासनाची परवानगी नव्हती. त्यामुळे रोहयो मजूर रेशीम उत्पादनाचे काम करतांना दिसून येत नव्हते. मात्र राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार रोहयो मजुरांना रेशीम उत्पादनाचेही काम दिले जाणार आहे. रेशीम उत्पादन हा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे रेशीमच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना जास्तीत जास्त रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. रेशीम किडे सोडणे, त्यांचे संगोपण करणे, झाडांची छाटणी करणे, रेशीम किडे गोळा करणे आदी कामांसाठी शेकडो मजुरांची गरज भासत होती. वेळेवर मजूर न मिळाल्याने वेळप्रसंगी तोटाही सहन करावा लागत होता. यातून आता रेशीम उत्पादकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यासाठी १ लाख ९६ हजाराचे अंदाजपत्रक तयार करावे लागणार असून त्यामध्ये नऊ हजार रूपये लाभार्थ्याचा भत्ता राहणार आहे. अजूनपर्यंत जिल्ह्यात लाभार्थ्यांची निवड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. (नगर प्रतिनिधी)