शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

आर्थिक दुर्बलतेमुळे बालकांनाही राेजगाराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अंकिसा : लहान मुले दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीची प्रतीक्षा करीत असतात. शाळेला सुट्टी लागताच अभ्यासाचा तणाव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अंकिसा : लहान मुले दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीची प्रतीक्षा करीत असतात. शाळेला सुट्टी लागताच अभ्यासाचा तणाव विसरून खेळणे-बागडण्यात वेळ घालवण्याची त्यांना हाैस असते. नातेवाइकांच्या गावाला जाऊन मनसाेक्त आनंद घेण्याची त्यांना ओढ असते. परंतु हे सर्व प्रत्येक मुले करू शकत नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असताना राेजगार शाेधावा लागताे, ही समस्या अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. अंकिसा परिसरात आर्थिक दुर्बलतेमुळे, बालकांनाही राेजगाराची चिंता सतावत असून त्यांना बालपण विसरून मजुरीला जावे लागत आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी नातेवाइकांच्या गावाला जातात. मागील वर्षीपासून काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या. सध्या पाचवीपासून महाविद्यालयीन वर्ग सुरू आहेत. परंतु इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग अद्यापही बंद आहेत. अशा स्थितीत मुलेसुद्धा कंटाळतात. काेराेनामुळे पिकनिक, सहलीला व दूरवर नातेवाइकांच्या गावाला जाऊ शकत नाही. आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले पालक पाल्यांवर बराच पैसा खर्च करून त्यांना साेयी-सुविधा उपलब्ध करून देतात. परंतु ज्या पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे, असे पालक स्वत: राेजगारासाठी भटकतात. साेबत आपल्या पाल्यानांही घेऊन जातात. त्यामुळे पालकांसह मुलांनाही राेजगाराचा शाेध असताे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ओढवलेल्या मजुरीच्या कामामुळे त्यांना बालपणाचा विसर पडून राेजगाराची चिंता अधिक सतावत असते.

बाॅक्स

पायाला चटके; मात्र चेहऱ्यावर आनंद

जिल्ह्याच्या अनेक भागात बालमजुरांची समस्या दिसून येते. अंकिसा परिसरात सुट्टीच्या दिवसात मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावणारी अनेक मुले दिसून येतात. उन्हाचे चटके लागत असले तरी पालक व पाल्य या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद मात्र दिसून येताे. काही मुलांच्या पायात चप्पल व अंगात पुरेशे कपडे दिसून येत नाही. कधी आजाराने ग्रासले तरी दु:ख विसरून कामे करणारी अनेक बालके दिसून येतात.