शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

रोहयोतून ४७ कोटींचा रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:55 IST

२०१८-१९ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगाराचे शेती व्यतीरिक्त दुसरे साधन नसल्याने येथील बहुतांश मजूर शेती व शेतीवर आधारित रोजगारावर तसेच रोहयो कामांवर अवलंबून राहतात.

ठळक मुद्देसात महिन्यांतील स्थिती : इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागणी अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१८-१९ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगाराचे शेती व्यतीरिक्त दुसरे साधन नसल्याने येथील बहुतांश मजूर शेती व शेतीवर आधारित रोजगारावर तसेच रोहयो कामांवर अवलंबून राहतात. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात रोहयो कामांची मागणी अधिक आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. या कालावधीत येथील मजुरांना शेतीच्या माध्यमातून जवळपास चार महिन्यांचे रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर तेंदूपत्ता व बांबू कटाईच्या माध्यमातून जवळपास एखादी महिन्याचा रोजगार उपलब्ध होतो. हा कालावधी सोडला तर इतर कालावधीत रोजगारच उपलब्ध होत नाही. त्यातही दुर्गम व ग्रामीण भागात रोजगाराची समस्या गंभीर आहे. परिणामी या गावातील मजूर तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात रोजगारासाठी भटकंती करतात. तर काही मजूर मात्र गावातच रोहयोच्या कामावर जातात.रोजगार हमी योजनेच्या कायद्यात एखाद्या मजुराने कामाची मागणी करूनही त्याला रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायती व विभाग अगोदरच कामांना मंजुरी घेऊन ठेवतात. धानाचा हंगाम संपल्यानंतर रोहयोच्या कामांना सुरुवात केली जाते. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. तेवढी मजुरी मजुरांना देण्यात आली आहे. रोहयोच्या माध्यमातून रोजगार मिळत असल्याने बेरोजगारीचे संकट कमी होण्यास मदत होते.एक महिन्यानंतर मागणी वाढणारधान कापणीच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे. धान शेतीच्या माध्यमातून जवळपास पुन्हा एखादी महिना रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगारासाठी मजुरांना वनवन भटकावे लागते. या कालावधीत ग्रामपंचायती व इतर विभाग रोजगार हमीची कामे सुरू करतात. विशेष करून धानाच्या बांध्या तयार करणे, बंधारे बांधणे, कालवे दुरूस्त करणे आदी कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जातात. धान शेती निघल्यानंतर या कामांना वेग येणार आहे. शेतीची कामे संपत असल्याने रिकामा राहण्यापेक्षा मजूर रोहयो कामांना पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.९० टक्के मजुरांना वेळेवर मजुरीरोजगार हमी योजनेच्या कायद्यानुसार कामाची मजुरी १५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. संवर्ग विकास अधिकाऱ्यांना मस्टरला मान्यता दिल्यानंतर सरळ पैसे मजुराच्या बँक खात्यात जमा होतात. अकुशल कामासाठी रोहयो विभागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. त्यामुळे मस्टरची प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर पैसे जमा होतात. १५ दिवस उलटूनही मजुरी जमा होण्यास विलंब होत असल्यास संबंधित मजुराला व्याज द्यावी लागते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात वेळेवर मजुरी मिळण्याचे प्रमाण एकूण मजुरांच्या ८९.४२ टक्के एवढे आहे. काही तांत्रिक कारणांमुळे जवळपास १० टक्के मजुरांना रोहयो मजुरी वेळेवर मिळत नाही.