शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोतून ४७ कोटींचा रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:55 IST

२०१८-१९ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगाराचे शेती व्यतीरिक्त दुसरे साधन नसल्याने येथील बहुतांश मजूर शेती व शेतीवर आधारित रोजगारावर तसेच रोहयो कामांवर अवलंबून राहतात.

ठळक मुद्देसात महिन्यांतील स्थिती : इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागणी अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१८-१९ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगाराचे शेती व्यतीरिक्त दुसरे साधन नसल्याने येथील बहुतांश मजूर शेती व शेतीवर आधारित रोजगारावर तसेच रोहयो कामांवर अवलंबून राहतात. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात रोहयो कामांची मागणी अधिक आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. या कालावधीत येथील मजुरांना शेतीच्या माध्यमातून जवळपास चार महिन्यांचे रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर तेंदूपत्ता व बांबू कटाईच्या माध्यमातून जवळपास एखादी महिन्याचा रोजगार उपलब्ध होतो. हा कालावधी सोडला तर इतर कालावधीत रोजगारच उपलब्ध होत नाही. त्यातही दुर्गम व ग्रामीण भागात रोजगाराची समस्या गंभीर आहे. परिणामी या गावातील मजूर तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात रोजगारासाठी भटकंती करतात. तर काही मजूर मात्र गावातच रोहयोच्या कामावर जातात.रोजगार हमी योजनेच्या कायद्यात एखाद्या मजुराने कामाची मागणी करूनही त्याला रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायती व विभाग अगोदरच कामांना मंजुरी घेऊन ठेवतात. धानाचा हंगाम संपल्यानंतर रोहयोच्या कामांना सुरुवात केली जाते. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. तेवढी मजुरी मजुरांना देण्यात आली आहे. रोहयोच्या माध्यमातून रोजगार मिळत असल्याने बेरोजगारीचे संकट कमी होण्यास मदत होते.एक महिन्यानंतर मागणी वाढणारधान कापणीच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे. धान शेतीच्या माध्यमातून जवळपास पुन्हा एखादी महिना रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगारासाठी मजुरांना वनवन भटकावे लागते. या कालावधीत ग्रामपंचायती व इतर विभाग रोजगार हमीची कामे सुरू करतात. विशेष करून धानाच्या बांध्या तयार करणे, बंधारे बांधणे, कालवे दुरूस्त करणे आदी कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जातात. धान शेती निघल्यानंतर या कामांना वेग येणार आहे. शेतीची कामे संपत असल्याने रिकामा राहण्यापेक्षा मजूर रोहयो कामांना पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.९० टक्के मजुरांना वेळेवर मजुरीरोजगार हमी योजनेच्या कायद्यानुसार कामाची मजुरी १५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. संवर्ग विकास अधिकाऱ्यांना मस्टरला मान्यता दिल्यानंतर सरळ पैसे मजुराच्या बँक खात्यात जमा होतात. अकुशल कामासाठी रोहयो विभागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. त्यामुळे मस्टरची प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर पैसे जमा होतात. १५ दिवस उलटूनही मजुरी जमा होण्यास विलंब होत असल्यास संबंधित मजुराला व्याज द्यावी लागते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात वेळेवर मजुरी मिळण्याचे प्रमाण एकूण मजुरांच्या ८९.४२ टक्के एवढे आहे. काही तांत्रिक कारणांमुळे जवळपास १० टक्के मजुरांना रोहयो मजुरी वेळेवर मिळत नाही.