शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

एक लाख मजुरांना मिळाला रोजगार

By admin | Updated: July 24, 2015 01:27 IST

१ एप्रिल ते २२ जुलैपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.

रोहयोची कामगिरी : १७ लाख ८१ हजार मनुष्यदिवस कामगडचिरोली : १ एप्रिल ते २२ जुलैपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. या मजुरांना सुमारे १७ लाख ८१ हजार १५६ मनुष्य दिवस रोजगार मिळाला आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराची समस्या सुरुवातीपासूनच गंभीर आहे. शेतीच्या कालावधीत दोन महिने वगळता इतर कालावधीत रोजगारच मिळत नाही. रोजगार उपलब्ध नसल्याने याचा परिणाम उत्पन्नावर पडत होता. शहरातील शिकलेले तरूण रोजगारासाठी शहरात जात असले तरी निरक्षर व्यक्तीला रिकामे राहिल्याशिवाय पर्याय राहला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत काम मागणाऱ्या प्रत्येक मजुराला वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक झाले आहे. रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाच्या कालावधीत जून ते आॅक्टोबर या कालावधीपर्यंत रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगारासाठी वनवन भटकावे लागते. अशा नागरिकांसाठी रोजगार हमी योजना अत्यंत मोलाची ठरली आहे. अनेक नागरिक रोजगार हमी योजनेच्या कामाची आतुरतेने वाट बघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघायला मिळते. आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून ते २२ जुलैपर्यंत सुमारे १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या मजुरांना १७ लाख ८१ हजार १५६ मनुष्य दिवस रोजगार देण्यात आला आहे. सर्वाधिक २ लाख ५८ हजार ६६६ मनुष्य दिवस रोजगार चामोर्शी तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध झाला आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी दूर होण्यास फार मोठी मदत झाली आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेती उपयोगी कामे केली जातात. विशेषकरून बंधारा, मजगीचे काम, बोडी दुरूस्ती, तलावाचे खोलीकरण, पांदण रस्ता आदी कामे केली जातात. आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या शेतात मजगीची कामे करण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत पडीत असलेल्या जमिनीत शेतकरी उत्पन्न घेऊ लागले आहेत. परिणामी रोहयोमुळे शेतकरी व मजूरही सुखी झाला आहे. (नगर प्रतिनिधी)१८ कोटी रूपये थकले रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार उपलब्ध होत असला तरी या योजनेचे पैसे मजुरांना वेळेवर मिळत नाही, हा या योजनेचा सर्वात मोठा दोष मानल्या जातो. काम झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांशिवाय कधीकधी सहा महिने उलटूनही मजुरी उपलब्ध होत नाही. रोजगार हमी योजनेच्या एकूण कामापैकी सुमारे २ कोटी १४ लाख रूपये प्राप्त झाले नाही. यामध्ये अकुशल कामगारांचे ८५ लाख ९३ हजार तर रोजगार हमी योजनेच्या कामासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्यावरील १ कोटी २८ लाख ७७ हजार रूपयांचा समावेश आहे.