शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:09 IST

तत्कालीन आघाडी शासनाची महत्त्वपूर्ण योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेकडे पाहिले जात होते. मात्र विद्यमान सरकारने या योजनेसाठीच्या निधीला कात्री लावल्याने या योजनेला घरघर लागली आहे.

ठळक मुद्देकुशल कामासाठी निधीचा अभाव : मजुराच्या खात्यात पैसे वळते होण्यास दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तत्कालीन आघाडी शासनाची महत्त्वपूर्ण योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेकडे पाहिले जात होते. मात्र विद्यमान सरकारने या योजनेसाठीच्या निधीला कात्री लावल्याने या योजनेला घरघर लागली आहे. कुशल कामासाठीचा निधी गेल्या अनेक महिन्यांपासून उपलब्ध झाला नाही. तसेच अकुशल कामाचा निधी उपलब्ध आहे. मात्र मजुरांच्या खात्यात आॅनलाईन प्रणालीद्वारे पैसे वळते करण्यास प्रचंड विलंब होत आहे. परिणामी मजूर त्रस्त झाले आहे.प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचे काम देण्याची हमी या योजनेतून सरकारने दिली आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने तसेच मजुरीची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने अनेक मजुरांनी रोहयोच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी १०० दिवसांचा रोजगार देण्याच्या उद्देशाला हरताळ फासल्या जात आहे.रोहयोच्या कुशल कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अपूर्ण कामे मोठ्या प्रमाणात आहेत. निधीच नसल्याने या कामाला प्रशासनाच्या वतीने गती देण्यास चालढकल केली जात आहे. रोहयो कामाचा निधी शासनाकडून थेट मिळतो. तालुकास्तरावरून मजुराच्या बँक खात्यात मजुरीचे पैसे एफटीपीद्वारे पैसे वळते केल्या जाते. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात न आल्याने सदर मजुराची रक्कम एक ते दीड महिन्याच्या कालावधीने बँक खात्यात जमा होत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच ग्रामीण भागासाठी रोजगार देणारी म्हणून ही योजना महत्त्वपूर्ण आहे. सदर योजनेअंतर्गत शेततळे, पांदण रस्ते, तलाव, बोडी, भातखाचर, रोपवाटिका, शौचालय व इतर कामे कार्यान्वित केली जातात. मात्र रोहयो कामासाठी केंद्र शासनाच्या वतीने निधी देण्यास कंजूषी होत असल्याने या कामांवर परिणाम झाला आहे.कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे वेतन प्रलंबितमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या १२ ही तालुक्यात जिल्हा व तालुकास्तरावर अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०१७ पासून वेतन अदा करण्यात आले नाही. नोव्हेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीतील वेतन प्रलंबित आहे. जिल्हा प्रशासनाकडे वेतनासाठीचा निधी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. प्रशासनानेही शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही.