शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

५८४ अपंगांना मिळाले रोजगार हमी योजनचे काम

By admin | Updated: March 10, 2017 02:11 IST

ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे.

जनजागृतीची गरज : ग्रामीण भागातून मागणी कमीगडचिरोली : ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अपंग नागरिकांना रोजगारासाठी विशेष प्राधान्य दिले जाते. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५८४ अपंग मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतमजूर, अकुशल कामगार यांना बेकारीच्या कालावधीत रोजगार पुरविण्याचे काम केले जात आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत रोहयो योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अनेक योजना बंद केल्या. मात्र रोजगार हमी योजनेचे सकारात्मक परिणाम अजुनही दिसून येत असल्याने या योजनेत मात्र शासनाने कोणताही बदल न करता सदर योजना जशीच्या तशी सुरू ठेवली आहे. २०१६-१७ या वर्षात सुमारे ५ हजार ९५२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वाधिक १०० दिवसांचा रोजगार चामोर्शी तालुक्यातील १ हजार ३० कुटुंबांना उपलब्ध झाला आहे. चामोर्शी तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्या तुलनेने लहान असलेल्या धानोरा तालुक्यानेही १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात विशेष प्रगती केली आहे. धानोरा तालुक्यातील सुमारे ९४९ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे.रोहयोमध्ये अपंग नागरिकांनाही विशेष प्राधान्य दिले जात असल्याने अपंगाने कामाची मागणी केल्यानंतर त्याला रोजगार उपलब्ध करून दिल्या जाते. वर्षभरात ५८४ अपंगांना रोजगार रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र एकूण रोजगाराच्या तुलनेत हे प्रमाण अगदी नगन्य असल्याचे दिसून येत आहे. अपंग मजूर पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नाही. रोहयोचे काम मिळते, याची माहिती अपंग मजुरांना नाही. परिणामी ते कामाची मागणी करीत नसल्याचे आजपर्यंत दिसून आले. याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)