शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बदलीनंतरही कर्मचारी ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची तसेच कुटुंबाजवळ राहण्याची संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे दुर्गम भागातून बदली झालेले आरोग्य कर्मचारी आनंदी होते.

ठळक मुद्देतीन महिने उलटले : दुर्गम भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून महिन्यात ७० आरोग्य सेवक, ९० आरोग्य सेविका आणि १५ आरोग्य सहायिकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्या होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा हिरमोड होत आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची तसेच कुटुंबाजवळ राहण्याची संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे दुर्गम भागातून बदली झालेले आरोग्य कर्मचारी आनंदी होते. मात्र बदलीला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारमुक्त केले नाही. आरोग्य विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जोपर्यंत नवीन कर्मचारी रूजू होत नाही, तोपर्यंत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. कार्यरत कर्मचाऱ्याला भारमुक्त केल्यास दुसरा कर्मचारी रूजू न झाल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडेल, अशी भीती वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटत आहे.सामान्य भागातून दुर्गम भागात बदली झालेले कर्मचारी विविध कारणे सांगून ज्या दुर्गम भागात बदली झाली, त्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करीत आहेत. सामान्य भागातील कर्मचारी दुर्गम भागात रूजू झाले नसल्याने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रखडली आहे. सर्वच कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र भारमुक्त केले जात नसल्याने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी खितपत पडून राहावे लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना त्याच भागात सेवा द्यावी लागत आहे.सामान्य भागातील कर्मचाऱ्यांची मनमानीकोणत्याही कर्मचाऱ्यांची तर दर तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची कधीच तीन वर्षांच्या अंतराने नियमित बदली होत नाही. सामान्य भागात कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपली बदली दुर्गम भागात होणार नाही, यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. यात ते यशस्वीही होत असल्याने याचा फटका दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही कर्मचारी १० ते १५ वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देत आहेत. सामान्य भागातील कर्मचारी मात्र जुगाड लावून दुर्गम भागात बदली टाळत असल्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :TransferबदलीHealthआरोग्य