शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बदलीनंतरही कर्मचारी ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची तसेच कुटुंबाजवळ राहण्याची संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे दुर्गम भागातून बदली झालेले आरोग्य कर्मचारी आनंदी होते.

ठळक मुद्देतीन महिने उलटले : दुर्गम भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून महिन्यात ७० आरोग्य सेवक, ९० आरोग्य सेविका आणि १५ आरोग्य सहायिकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्या होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा हिरमोड होत आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची तसेच कुटुंबाजवळ राहण्याची संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे दुर्गम भागातून बदली झालेले आरोग्य कर्मचारी आनंदी होते. मात्र बदलीला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारमुक्त केले नाही. आरोग्य विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जोपर्यंत नवीन कर्मचारी रूजू होत नाही, तोपर्यंत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. कार्यरत कर्मचाऱ्याला भारमुक्त केल्यास दुसरा कर्मचारी रूजू न झाल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडेल, अशी भीती वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटत आहे.सामान्य भागातून दुर्गम भागात बदली झालेले कर्मचारी विविध कारणे सांगून ज्या दुर्गम भागात बदली झाली, त्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करीत आहेत. सामान्य भागातील कर्मचारी दुर्गम भागात रूजू झाले नसल्याने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रखडली आहे. सर्वच कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र भारमुक्त केले जात नसल्याने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी खितपत पडून राहावे लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना त्याच भागात सेवा द्यावी लागत आहे.सामान्य भागातील कर्मचाऱ्यांची मनमानीकोणत्याही कर्मचाऱ्यांची तर दर तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची कधीच तीन वर्षांच्या अंतराने नियमित बदली होत नाही. सामान्य भागात कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपली बदली दुर्गम भागात होणार नाही, यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. यात ते यशस्वीही होत असल्याने याचा फटका दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही कर्मचारी १० ते १५ वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देत आहेत. सामान्य भागातील कर्मचारी मात्र जुगाड लावून दुर्गम भागात बदली टाळत असल्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :TransferबदलीHealthआरोग्य