शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

महामार्गाच्या कामात खोदण्यावरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:39 IST

मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. जवळपास दीड किमीपर्यंतचा मार्ग मधेमधे खोदण्यात आला आहे. मात्र सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम अजुनही सुरुवात झाले नाही. रहदारीसाठी अर्धाच मार्ग शिल्लक असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

ठळक मुद्देवाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त : तीन महिने उलटूनही सिमेंट काँक्रिटीकरण झालेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. जवळपास दीड किमीपर्यंतचा मार्ग मधेमधे खोदण्यात आला आहे. मात्र सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम अजुनही सुरुवात झाले नाही. रहदारीसाठी अर्धाच मार्ग शिल्लक असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत.धानोरा मार्गावरील स्नेहनगरापासून राष्ट्रीय महामार्गाच्या खोदकामाला सुरूवात झाली. जवळपास तीन महिन्यांपूर्वी खोदकाम सुरू झाले. काही दिवसानंतर खोदकाम बंद पडले. मागील दोन महिन्यांपासून सातत्याने काम सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने एक बाजू खोदली जात आहे. स्नेहनगर ते मूल मार्गावरील तलावापर्यंत मधेमधे मार्ग खोदण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिक्रमणाची समस्या असल्याने त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले नाही. तसेच बाजुला नालीचेही बांधकाम सोबतच केले जात आहे. ५२ हजार लोकसंख्येच्या गडचिरोली शहरात चार प्रमुख मार्गांवरच वाहतुक मोठ्या प्रमाणात राहते. त्यातही धानोरा मार्गावर बसस्थानक व मूल मार्गावर जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व विविध कार्यालये असल्याने या मार्गावरून सर्वाधिक वाहतूक राहते. वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन महामार्गाचे खोदकाम झाल्याबरोबर त्या ठिकाणी गिट्टी टाकून सिमेंट काँक्रीटीकरण करणे आवश्यक होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून केवळ एक बाजू खोदून ठेवण्याचे काम केले जात आहे. मात्र सिमेंट काँक्रीटीकरणाचा अजूनपर्यंत पत्ता नाही. ज्या ठिकाणावरून कामाला सुरूवात झाली होती. त्या ठिकाणी मागील तीन दिवसांपासून गिट्टी टाकण्याचे काम सुरू आहे.मुख्य मार्गाला लागूनच शहरात जाणारे मार्ग आहेत. त्याही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे जड वाहन, चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना मुख्य चौकातूनच आपल्या घराकडे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ व पेट्रोल खर्च होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.अतिक्रमण कायमकेवळ अर्धा मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याने अतिक्रमण काढणे आवश्यक होते. मात्र नगर परिषद व बांधकाम विभागानेही याकडे कायमचे दुर्लक्ष केले आहे. पूर्वीप्रमाणेच अजुनही रस्त्यावर दुकाने थाटून व्यवसाय चालविला जात आहे. काही ठिकाणी विजेचे खांब रस्त्यावर आले आहेत. अशा ठिकाणी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पाच ते दहा मिनिटातच वाहनांची मोठी रांग दोन्ही बाजुला लागते. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नगर परिषद व बांधकाम विभागाने अतिक्रमीत दुकाने हटविणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यात साचणार डबकेमहामार्गाच्या सध्याच्या कामाची गती लक्षात घेतली तर पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रीटीकरणचे काम पूर्ण होईल काय? याबाबत शंका निर्माण होत आहे. जुन्या मार्गाच्या तुलनेत जवळपास दोन ते तीन फूट खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट झाले नाही तर खोदलेल्या ठिकाणी पावसाळ्याचे पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील नाल्यांचे पाणी या ठिकाणी जमा झाल्यास दुर्गंधी पसरू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी काम होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.महामार्ग प्राधीकरणचे दुर्लक्षराष्ट्रीय महामार्गाच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे आहे. मात्र येथील विभागाचे बांधकामावर कोणतेच नियंत्रण नाही. गडचिरोली विभागाचा प्रभार नागपूर येथील अधीक्षक अभियंता मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दोन विभागाचा कारभार असल्याने तेही गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे काम केले जात आहे. मागील दोन महिन्यांपासून गडचिरोली शहरात वाहतुकीची कोंडी होत असताना बांधकाम विभागाला याबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग