शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कृपाळा गावाजवळ हत्तींचा धुडगूस; तीन महिला जखमी, थाेडक्यात बचावल्या

By गेापाल लाजुरकर | Updated: April 27, 2025 03:13 IST

चार दिवसांपासून वाकडी शेतशिवारात संचार : शिवणी परिसरात भरकटला हाेता कळप

गडचिराेली : रानटी हत्तींचा कळप शुक्रवारी रात्री गुरवळा जंगल परिसरातून वाकडी व पुढे शिवणी परिसरात दाखल झाला. विश्रांतीसाठी जंगलक्षेत्र न मिळाल्याने कळप भरकटला. दरम्यान, शनिवार, २६ एप्रिल राेजी सकाळी १०:३० च्या सुमारास पाेटफाेडी नदी परिसरात कपडे धुणाऱ्या पाच ते सहा महिला कळपाच्या कचाट्यात सापडल्याने यातील तीन महिला जखमी झाल्या. सुशीला टेमसू मेश्राम (४२), योगिता उमाजी मेश्राम (४०), पुष्पा निराजी वरखडे (४०) (सर्व रा. कृपाळा, ता. गडचिराेली) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.

गडचिराेली वन विभागातील वाकडी, म्हसली, कृपाळा, हिरापूर या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाचा संचार आहे. दरम्यान, शनिवार, २६ एप्रिल राेजी सकाळी हत्तींचा कळप भरकटला. सकाळी १०:३० वाजता हा कळप पाेटफाेडी नदी परिसरात आला. यावेळी नदीवर कृपाळा येथील सुशीला टेमसू मेश्राम, योगिता उमाजी मेश्राम, पुष्पा निराजी वरखडे या महिला कपडे धुत हाेत्या. हत्ती आल्याचे पाहून त्यांनी पळापळ सुरू केली. यावेळी तिन्ही महिला जखमी झाल्या. यापैकी याेगिता मेश्राम ह्या गंभीर जखमी झाल्या. तिन्ही महिला हत्तींच्या हल्ल्यात जखमी झाल्या की, जीवाच्या आकांताने पळताना जखमी झाल्या ही बाब चाैकशीनंतरच स्पष्ट हाेणार आहे. दरम्यान, जखमी महिलांना गडचिराेली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यापैकी याेगिता मेश्राम यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविल्याची माहिती आहे.हत्तींचा बंदाेबस्त न केल्यास आंदाेलनकृपाळा, म्हसेली परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रानटी हत्तींचा धुमाकूळ आहे. हत्तींनी मका, धान पीक व भाजीपाला पिकाची माेठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. आता हत्ती नागरिकांच्या जीवावरही उठले आहेत. त्यामुळे हत्तींचा लवकर बंदाेबस्त करावा, अन्यथा आंदाेलन केले जाईल, असा इशारा भाजपचे तालुका महामंत्री बंडूजी झाडे यांनी दिला आहे.मक्यासह धान पिकाचेही नासधूसतीन दिवसांपूर्वी हत्तींच्या कळपाने वाकडीचे माजी सरपंच चरणदास बोरकुटे यांच्या म्हसली येथील तीन एकर शेतातील पिकाची नासधूस केली. म्हसली येथील यशवंत झरकर यांच्या पिकाचेही नुकसान केले तसेच हिरापूरच्या चार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान केले हाेते. या भागात मका, धान व भाजीपाल्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.तिन्ही महिलांची प्रकृती गंभीर नाही, सामान्य आहे. महिलांवर हत्तींनी कशाप्रकारे हल्ला केला, याबाबत चाैकशी केली जाईल. सध्या महिलांवर याेग्य उपचार करण्यावर वन विभागाकडून भर दिला जात आहे. अधिकारी लक्ष ठेवून आहेत.- मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक, वन विभाग गडचिराेली

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीWomenमहिला