शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

कृपाळा गावाजवळ हत्तींचा धुडगूस; तीन महिला जखमी, थाेडक्यात बचावल्या

By गेापाल लाजुरकर | Updated: April 27, 2025 03:13 IST

चार दिवसांपासून वाकडी शेतशिवारात संचार : शिवणी परिसरात भरकटला हाेता कळप

गडचिराेली : रानटी हत्तींचा कळप शुक्रवारी रात्री गुरवळा जंगल परिसरातून वाकडी व पुढे शिवणी परिसरात दाखल झाला. विश्रांतीसाठी जंगलक्षेत्र न मिळाल्याने कळप भरकटला. दरम्यान, शनिवार, २६ एप्रिल राेजी सकाळी १०:३० च्या सुमारास पाेटफाेडी नदी परिसरात कपडे धुणाऱ्या पाच ते सहा महिला कळपाच्या कचाट्यात सापडल्याने यातील तीन महिला जखमी झाल्या. सुशीला टेमसू मेश्राम (४२), योगिता उमाजी मेश्राम (४०), पुष्पा निराजी वरखडे (४०) (सर्व रा. कृपाळा, ता. गडचिराेली) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.

गडचिराेली वन विभागातील वाकडी, म्हसली, कृपाळा, हिरापूर या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाचा संचार आहे. दरम्यान, शनिवार, २६ एप्रिल राेजी सकाळी हत्तींचा कळप भरकटला. सकाळी १०:३० वाजता हा कळप पाेटफाेडी नदी परिसरात आला. यावेळी नदीवर कृपाळा येथील सुशीला टेमसू मेश्राम, योगिता उमाजी मेश्राम, पुष्पा निराजी वरखडे या महिला कपडे धुत हाेत्या. हत्ती आल्याचे पाहून त्यांनी पळापळ सुरू केली. यावेळी तिन्ही महिला जखमी झाल्या. यापैकी याेगिता मेश्राम ह्या गंभीर जखमी झाल्या. तिन्ही महिला हत्तींच्या हल्ल्यात जखमी झाल्या की, जीवाच्या आकांताने पळताना जखमी झाल्या ही बाब चाैकशीनंतरच स्पष्ट हाेणार आहे. दरम्यान, जखमी महिलांना गडचिराेली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यापैकी याेगिता मेश्राम यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविल्याची माहिती आहे.हत्तींचा बंदाेबस्त न केल्यास आंदाेलनकृपाळा, म्हसेली परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रानटी हत्तींचा धुमाकूळ आहे. हत्तींनी मका, धान पीक व भाजीपाला पिकाची माेठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. आता हत्ती नागरिकांच्या जीवावरही उठले आहेत. त्यामुळे हत्तींचा लवकर बंदाेबस्त करावा, अन्यथा आंदाेलन केले जाईल, असा इशारा भाजपचे तालुका महामंत्री बंडूजी झाडे यांनी दिला आहे.मक्यासह धान पिकाचेही नासधूसतीन दिवसांपूर्वी हत्तींच्या कळपाने वाकडीचे माजी सरपंच चरणदास बोरकुटे यांच्या म्हसली येथील तीन एकर शेतातील पिकाची नासधूस केली. म्हसली येथील यशवंत झरकर यांच्या पिकाचेही नुकसान केले तसेच हिरापूरच्या चार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान केले हाेते. या भागात मका, धान व भाजीपाल्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.तिन्ही महिलांची प्रकृती गंभीर नाही, सामान्य आहे. महिलांवर हत्तींनी कशाप्रकारे हल्ला केला, याबाबत चाैकशी केली जाईल. सध्या महिलांवर याेग्य उपचार करण्यावर वन विभागाकडून भर दिला जात आहे. अधिकारी लक्ष ठेवून आहेत.- मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक, वन विभाग गडचिराेली

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीWomenमहिला