शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

हत्तीच्या कळपाने नष्ट केले १० एकरांतील धानाचे पुंजणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बुद्धे यांच्या शेतात रात्री हत्तींच्या कळपाने शिरकाव करून त्यांचे १० एकरातील धानपिक पूर्णतः संपविले, अशी माहिती त्या शेतकऱ्याने दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सतत चार दिवसांपासून पिकांची नासाडी करीत असलेल्या हत्तींनी सोमवारी (दि.२९) रात्री परिसरातील सर्वांत मोठे नुकसान केले असल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली. परंतु यावर कोणतीही उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले धानपिक व कडधान्यांचे नुकसान कसे थांबवावे, ही मोठी गंभीर समस्या झाली आहे. या जंगली हत्तींच्या कळपापासून पिकांचे रक्षण करणे सध्यातरी वनविभागाच्या आवाक्याबाहेर झाले आहे.गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बुद्धे यांच्या शेतात रात्री हत्तींच्या कळपाने शिरकाव करून त्यांचे १० एकरातील धानपिक पूर्णतः संपविले, अशी माहिती त्या शेतकऱ्याने दिली. बुद्धे हे रात्री आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शेतानजीक पाहणी करण्यासाठी गेले असता हत्तीच्या आवाजाने त्यांना तसेच माघारी फिरावे लागले. मंगळवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन बघितले असता धान कापून त्यांचे पुंजने करून ठेवलेल्या ठिकाणी हत्तींनी धिंगाणा घातला होता. पुंजण्यांचे नुकसान केले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने पंचनामे करून तशी मदत शासनाकडून मिळवून देऊ, असे सांत्वन केले.

शेतकऱ्यांची उडाली झोपचार महिने शेतात मेहनत करून हाताशी आलेले धानपीक आता विक्रीसाठी तयार होत आहे. अशात परिसरात हत्तींचा कळप आल्याने तो कधी आपल्या शेतात येईल व शेतमालाचे नुकसान करून जाईल, या भीतीने शेतकऱ्यांनी झोप उडाली आहे. हे संकट दूर करण्यासाठी सध्या कोणताही पर्याय नसून आता परिसरातील शेतकरी वनविभागावरच विश्वास ठेवून आहेत. लवकरात लवकर या संकटातून मुक्त करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी नाईट व्हिजन व ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. तसेच तीन पथक तयार केले आहेत. त्यात एक पथक सतत हत्तींच्या मागावर राहून देखरेख करते. दुसरे पथक नागरिकांमध्ये जनजागृती करते तर तिसरे पथक पंचनामे करून अहवाल सादर करते. - धर्मवीर सालविठ्ठल, विभागीय वनअधिकारी, देसाईगंज

 

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग