शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीच्या कळपाने नष्ट केले १० एकरांतील धानाचे पुंजणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बुद्धे यांच्या शेतात रात्री हत्तींच्या कळपाने शिरकाव करून त्यांचे १० एकरातील धानपिक पूर्णतः संपविले, अशी माहिती त्या शेतकऱ्याने दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सतत चार दिवसांपासून पिकांची नासाडी करीत असलेल्या हत्तींनी सोमवारी (दि.२९) रात्री परिसरातील सर्वांत मोठे नुकसान केले असल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली. परंतु यावर कोणतीही उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले धानपिक व कडधान्यांचे नुकसान कसे थांबवावे, ही मोठी गंभीर समस्या झाली आहे. या जंगली हत्तींच्या कळपापासून पिकांचे रक्षण करणे सध्यातरी वनविभागाच्या आवाक्याबाहेर झाले आहे.गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बुद्धे यांच्या शेतात रात्री हत्तींच्या कळपाने शिरकाव करून त्यांचे १० एकरातील धानपिक पूर्णतः संपविले, अशी माहिती त्या शेतकऱ्याने दिली. बुद्धे हे रात्री आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शेतानजीक पाहणी करण्यासाठी गेले असता हत्तीच्या आवाजाने त्यांना तसेच माघारी फिरावे लागले. मंगळवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन बघितले असता धान कापून त्यांचे पुंजने करून ठेवलेल्या ठिकाणी हत्तींनी धिंगाणा घातला होता. पुंजण्यांचे नुकसान केले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने पंचनामे करून तशी मदत शासनाकडून मिळवून देऊ, असे सांत्वन केले.

शेतकऱ्यांची उडाली झोपचार महिने शेतात मेहनत करून हाताशी आलेले धानपीक आता विक्रीसाठी तयार होत आहे. अशात परिसरात हत्तींचा कळप आल्याने तो कधी आपल्या शेतात येईल व शेतमालाचे नुकसान करून जाईल, या भीतीने शेतकऱ्यांनी झोप उडाली आहे. हे संकट दूर करण्यासाठी सध्या कोणताही पर्याय नसून आता परिसरातील शेतकरी वनविभागावरच विश्वास ठेवून आहेत. लवकरात लवकर या संकटातून मुक्त करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी नाईट व्हिजन व ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. तसेच तीन पथक तयार केले आहेत. त्यात एक पथक सतत हत्तींच्या मागावर राहून देखरेख करते. दुसरे पथक नागरिकांमध्ये जनजागृती करते तर तिसरे पथक पंचनामे करून अहवाल सादर करते. - धर्मवीर सालविठ्ठल, विभागीय वनअधिकारी, देसाईगंज

 

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग