शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत निविदा प्रक्रिया स्थानिक स्तरावर होणार

By admin | Updated: August 12, 2014 23:44 IST

गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत विभागाच्या निविदा मंजुरीचे अधिकार विशेष बाब म्हणून गडचिरोली स्थानिकस्तरावर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री

वनपट्ट्याच्या कामाबाबत प्रशासनाचे कौतुक : उपमुख्यमंत्र्यांची आढावा बैठकीत घोषणागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत विभागाच्या निविदा मंजुरीचे अधिकार विशेष बाब म्हणून गडचिरोली स्थानिकस्तरावर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. गडचिरोली येथे विद्युत विभागाचे काम करतांना अनेक वेळा निविदा काढूनही कंत्राटदार मिळत नसून निविदा मंजुरीचे अधिकार मुंबई येथे असल्याने प्रस्तावास उशीर होतो, ही बाब लक्षात घेता हा निर्णय घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री आर. आर. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता व मुख्य वनसरंक्षक टी.एस.के. रेड्डी या बैठकीस उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीमधील ६० टक्के निधी बीडीएसवर प्राप्त करून दिला असल्याचे सांगून हा निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामास गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे निकाली काढण्यामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात पहिला असल्याचे नमूद करुन जिल्हा प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले. विद्युत विभागाच्या पेंडीग कनेक्शनबाबत बोलतांना लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यानी दिले. ग्रामीण भागात विद्युतीकरण करण्याच्या कामाच्या निविदा कंत्राटदार भरत नसल्याचे लक्षात येताच अजित पवार यांनी याबाबत माहिती घेतली. निविदा मंजूर करण्याचे अधिकार मुंबईला असल्याने प्रस्तावास विलंब होत असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यानी निदर्शनास आणून दिले. विशेष बाब म्हणून निविदा मंजुरीचे अधिकार गडचिरोली येथेच देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी विकास कामाचे सादरीकरण केले. शेती आणि वनविकासासाठी गडचिरोली जिल्हयास विशेष निधी प्राप्त करुन द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मानव विकास मध्ये १० टक्के ऐवजी २० टक्के निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी असेही त्यांनी नमूद केले. मानव विकास अंतर्गत प्राप्त होणारा निधी खर्च करण्यासाठीचा कालावधी वाढवून मिळावा असा आग्रह जिल्हाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री यांचेकडे धरला. नक्षल कृती कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये केवळ तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून तो अपुरा पडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वनहक्क पट्टे वाटप, सुवर्ण जयंती राजस्व अभियान, अगरबत्ती प्रकल्प, मावा नाटे मावा रोजगार , बांबु कला, शिल्पकला, टेरा कोटा, महाराष्ट्र दर्शन सहल, सुशिक्षित बेरोजगारांना वाहतूक सुविधा, कौशल्यावर आधारीत कार्यक्रम आदींबाबत जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत सविस्तर माहिती दिली. ४५ ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात आला असून यातून १ हजार कुटुंबांना रोजगार प्राप्त होत आहे. त्याचबरोबर अगरबत्तीसाठी लागणारी काडी तयार करण्याचा प्रकल्प कुरखेडा येथे सुरु केला. त्यातून ४० युवकांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आभार उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी मानले.