शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

विद्युत निविदा प्रक्रिया स्थानिक स्तरावर होणार

By admin | Updated: August 12, 2014 23:44 IST

गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत विभागाच्या निविदा मंजुरीचे अधिकार विशेष बाब म्हणून गडचिरोली स्थानिकस्तरावर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री

वनपट्ट्याच्या कामाबाबत प्रशासनाचे कौतुक : उपमुख्यमंत्र्यांची आढावा बैठकीत घोषणागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत विभागाच्या निविदा मंजुरीचे अधिकार विशेष बाब म्हणून गडचिरोली स्थानिकस्तरावर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. गडचिरोली येथे विद्युत विभागाचे काम करतांना अनेक वेळा निविदा काढूनही कंत्राटदार मिळत नसून निविदा मंजुरीचे अधिकार मुंबई येथे असल्याने प्रस्तावास उशीर होतो, ही बाब लक्षात घेता हा निर्णय घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री आर. आर. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता व मुख्य वनसरंक्षक टी.एस.के. रेड्डी या बैठकीस उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीमधील ६० टक्के निधी बीडीएसवर प्राप्त करून दिला असल्याचे सांगून हा निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामास गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे निकाली काढण्यामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात पहिला असल्याचे नमूद करुन जिल्हा प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले. विद्युत विभागाच्या पेंडीग कनेक्शनबाबत बोलतांना लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यानी दिले. ग्रामीण भागात विद्युतीकरण करण्याच्या कामाच्या निविदा कंत्राटदार भरत नसल्याचे लक्षात येताच अजित पवार यांनी याबाबत माहिती घेतली. निविदा मंजूर करण्याचे अधिकार मुंबईला असल्याने प्रस्तावास विलंब होत असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यानी निदर्शनास आणून दिले. विशेष बाब म्हणून निविदा मंजुरीचे अधिकार गडचिरोली येथेच देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी विकास कामाचे सादरीकरण केले. शेती आणि वनविकासासाठी गडचिरोली जिल्हयास विशेष निधी प्राप्त करुन द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मानव विकास मध्ये १० टक्के ऐवजी २० टक्के निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी असेही त्यांनी नमूद केले. मानव विकास अंतर्गत प्राप्त होणारा निधी खर्च करण्यासाठीचा कालावधी वाढवून मिळावा असा आग्रह जिल्हाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री यांचेकडे धरला. नक्षल कृती कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये केवळ तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून तो अपुरा पडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वनहक्क पट्टे वाटप, सुवर्ण जयंती राजस्व अभियान, अगरबत्ती प्रकल्प, मावा नाटे मावा रोजगार , बांबु कला, शिल्पकला, टेरा कोटा, महाराष्ट्र दर्शन सहल, सुशिक्षित बेरोजगारांना वाहतूक सुविधा, कौशल्यावर आधारीत कार्यक्रम आदींबाबत जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत सविस्तर माहिती दिली. ४५ ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात आला असून यातून १ हजार कुटुंबांना रोजगार प्राप्त होत आहे. त्याचबरोबर अगरबत्तीसाठी लागणारी काडी तयार करण्याचा प्रकल्प कुरखेडा येथे सुरु केला. त्यातून ४० युवकांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आभार उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी मानले.