शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत निविदा प्रक्रिया स्थानिक स्तरावर होणार

By admin | Updated: August 12, 2014 23:44 IST

गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत विभागाच्या निविदा मंजुरीचे अधिकार विशेष बाब म्हणून गडचिरोली स्थानिकस्तरावर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री

वनपट्ट्याच्या कामाबाबत प्रशासनाचे कौतुक : उपमुख्यमंत्र्यांची आढावा बैठकीत घोषणागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत विभागाच्या निविदा मंजुरीचे अधिकार विशेष बाब म्हणून गडचिरोली स्थानिकस्तरावर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. गडचिरोली येथे विद्युत विभागाचे काम करतांना अनेक वेळा निविदा काढूनही कंत्राटदार मिळत नसून निविदा मंजुरीचे अधिकार मुंबई येथे असल्याने प्रस्तावास उशीर होतो, ही बाब लक्षात घेता हा निर्णय घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री आर. आर. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता व मुख्य वनसरंक्षक टी.एस.के. रेड्डी या बैठकीस उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीमधील ६० टक्के निधी बीडीएसवर प्राप्त करून दिला असल्याचे सांगून हा निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामास गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे निकाली काढण्यामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात पहिला असल्याचे नमूद करुन जिल्हा प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले. विद्युत विभागाच्या पेंडीग कनेक्शनबाबत बोलतांना लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यानी दिले. ग्रामीण भागात विद्युतीकरण करण्याच्या कामाच्या निविदा कंत्राटदार भरत नसल्याचे लक्षात येताच अजित पवार यांनी याबाबत माहिती घेतली. निविदा मंजूर करण्याचे अधिकार मुंबईला असल्याने प्रस्तावास विलंब होत असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यानी निदर्शनास आणून दिले. विशेष बाब म्हणून निविदा मंजुरीचे अधिकार गडचिरोली येथेच देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी विकास कामाचे सादरीकरण केले. शेती आणि वनविकासासाठी गडचिरोली जिल्हयास विशेष निधी प्राप्त करुन द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मानव विकास मध्ये १० टक्के ऐवजी २० टक्के निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी असेही त्यांनी नमूद केले. मानव विकास अंतर्गत प्राप्त होणारा निधी खर्च करण्यासाठीचा कालावधी वाढवून मिळावा असा आग्रह जिल्हाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री यांचेकडे धरला. नक्षल कृती कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये केवळ तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून तो अपुरा पडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वनहक्क पट्टे वाटप, सुवर्ण जयंती राजस्व अभियान, अगरबत्ती प्रकल्प, मावा नाटे मावा रोजगार , बांबु कला, शिल्पकला, टेरा कोटा, महाराष्ट्र दर्शन सहल, सुशिक्षित बेरोजगारांना वाहतूक सुविधा, कौशल्यावर आधारीत कार्यक्रम आदींबाबत जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत सविस्तर माहिती दिली. ४५ ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात आला असून यातून १ हजार कुटुंबांना रोजगार प्राप्त होत आहे. त्याचबरोबर अगरबत्तीसाठी लागणारी काडी तयार करण्याचा प्रकल्प कुरखेडा येथे सुरु केला. त्यातून ४० युवकांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आभार उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी मानले.