शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

वीज तारांच्या स्पर्शाने तीन बैल ठार

By admin | Updated: March 9, 2017 01:32 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून छत्तीसगडमधील भिलाईपर्यंत गेलेल्या ४०० केव्ही टॉवर लाईनच्या जीवंत तारांचा स्पर्श

भीमपूर येथील घटना : टॉवर लाईनच्या तारा तुटल्या कोरची : चंद्रपूर जिल्ह्यातून छत्तीसगडमधील भिलाईपर्यंत गेलेल्या ४०० केव्ही टॉवर लाईनच्या जीवंत तारांचा स्पर्श झाल्याने तीन बैल जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तालुक्यातील भीमपूर येथे घडली. भिलाईकडे जाणारी ३१७ क्रमांकाची टॉवर लाईन भीमपूर येथून टाकण्यात आली असून, या लाईनवर ७६५ केव्हीचा व्होल्टेज आहे. या टॉवरलाईनद्वारे भिलाईवरुन वर्धा जिल्ह्याला वीजपुरवठा केला जातो. भीमपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे अवघ्या ३०० मीटर अंतरावर पटाची दाण आहे. त्यावरुनच ही टॉवर लाईन गेली आहे. बुधवारी दुपारी काही बैल चरत असताना तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोन बैल जागीच ठार झाले. काही वेळानंतर एक बैल जंगलातून परत येत असताना तारांचा स्पर्श होऊन तोही मृत्युमुखी पडला. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी येथील पॉवर ग्रीडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बैल मालकांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या तेंदू हंगामापूर्वी खूटकटाईचे काम सुरु आहे. नागरिक या कामासाठी जंगलात जातात. परंतु बुधवारी नागरिक दुसऱ्या मार्गाने जंगलात गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मंगळवारी रात्री कोरची तालुक्यात वादळासह सुमारे ६५ मिमी पाऊस झाला. त्यामुळे वीज तारा तुटल्या असाव्यात, असा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे कोरची तालुक्यात आंबा, चना, तूर, गहू इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच विटाभट्टी मालकांनाही मोठा फटका बसला आहे. (प्रतिनिधी)